एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय, आता मैदान सोडायचं नाही; बीडमधून मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange Patil : माझा समाज मोठा होऊ नये यासाठी सर्व जण एकवटले आहेत. जातीच्या लढाईत 29 तारखेला उतरायचे आहे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत (Mumbai Morcha) धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची आज रविवारी (दि. 24) निर्णायक इशारा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय. 

मनोज जरांगे म्हणाले की, बीडचे मराठे एकत्र येत आहेत. गडबडीने समाजाचे वाटोळं होत आहे. आता पुढचा काळ लढायचा आहे. समाजाला आवाहन आहे की, आपली ताकद मोठी आहे. आता विचार करून पुढे लढायचे आहे. बीडचे रूप पाहून सरकार बेजार होईल. 29 तारखेला चलो मुंबई... आपल्याला शांततेत जायचं आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केला.

फडणवीस साहेब मी मुंबईत येतोय

आम्ही शांततेत आरक्षण मागत आहोत. बीडमध्ये तुम्हाला दंगल घडवायची होती का? सत्ता बदलणार आहे. त्यावेळी आम्ही नक्की लक्षात ठेवू, असा इशारा त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. पोलीस देवेंद्र फडणवीस यांचं ऐकतात आणि आम्हाल त्रास देतात. सत्ता पालट झाली तर मी सोडणार नाही. फडणवीस साहेब मी मुंबईत येत आहे. तुमच्या घरा बाहेर येत आहे. विनाकारण डवचू नका, मराठा शांत आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. 

मुंबईला येण्याची हौस नाही

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, पोलिसांना आम्ही त्रास दिला नाही. आरक्षण दिले नाही तर... मुंबईत गेल्यावर सांगतो... आता सरकारची पळापळी सुरू झाली आहे. मुंबईला येण्याची हौस नाही. आमचा प्रश्न मार्गी लावा. आम्ही मुंबईला येणार नाही.  आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. महादेव मुंडे यांच्या हत्येचे मारेकरी पकडून दाखवा, असे आव्हान त्यांनी यावेळी सरकारला दिले.

जाळपोळ करणारी पैदास आपली नाही

29 ऑगस्ट मुंबईला जायचं आहे. 27 तारखेला अंतरवाली सराटीवरून निघायचं आहे. यावेळी मान खाली जाईल, असं काहीही करू नका. आपल्याला दगडफेक जाळपोळ करायची नाही. मुंबईला शांततेत जायचं आहे. कोणी जाळपोळ केलीच तर एकानेही पळायचं नाही. जाळपोळ करणारी पैदास आपली नाही. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले आहे. त्यांनी पाठवलेले लोक दगडफेक करतील. पण, आपण तसे करायचे नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी मराठा समाजाला केले. 

ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय

बीड जिल्ह्यातील समाजाने घरी थांबायचं नाही. ही शेवटची फाईट आहे. विजयाचा गुलाल लावायचा आहे. आता माघार नाही. मैदान सोडायचं नाही. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्यांना सांगायचे. तसेच सर्वांना सांगायचं की, मुंबईला जायचे आहे. डॉक्टर, श्रीमंत मराठे एवढ्या वेळी तुमच्या गाड्या मुंबईला जाण्यासाठी द्या. नेत्या मागे पळू नका. राजकीय नेत्याला बळी पडून मुंबईला येण्यासाठी थांबवू नका. माझा समाज मोठा होऊ नये यासाठी सर्व जण एकवटले आहेत. जातीच्या लढाईत 29 तारखेला उतरायचे आहे. मुंबईत खेकड्या सारखे दगड आहेत. मुंबईत एकदा गेलोच तर नक्की आरक्षण मिळणार, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

आणखी वाचा 

Manoj Jarange : सत्ता बदलत असते, त्याच्या जीवावर उड्या मारू नका; मनोज जरांगेंचा बीडमधून एल्गार, देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स, भाजप आमदाराचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे, म्हणाले..
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स, भाजप आमदाराचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे, म्हणाले..
Embed widget