एक्स्प्लोर

Beed News : अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळले, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात 

Beed News : बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. परंतु, अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

बीड : अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कुठे अतिवृष्टी, तर कुठे गोगलगायमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं सरकारकडून मदतही जाहीर केली. मात्र ही मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकायचे कोणी असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतोय. सरकार स्थापन होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय. तरी देखील राज्यात कुठेच पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकणार कोण? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

बीड जिल्ह्यातील चौसळा गावच्या शीला ताठे यांनी साडेतीन एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीपासून मशागतीपर्यंत मोठा खर्च झाला. उगवून आलेलं सोयाबीन हिरवं गार होतं. त्यामुळं दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र पावसाचा मोठा खंड पडला आणि या कोरडवाहू जमिनीतल्या पिक वाळून गेलं. आता पाऊस पडला असला तरी या सोयाबीनला त्याचा फार काही उपयोग होणार नाही, असं शिला ताठे सांगतात.  

जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  शेती पिकांच मोठं नुकसान झालंय. या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात आली. मात्र या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शेतकरी वर्गातून रोष व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे 25 टक्के आग्रीम पीक विम्याच्या रकमेतून बीड जिल्ह्यातील सत्तेचाळीस महसूल मंडळ वगळण्यात आल्यानं आता आपली व्यथा मांडायची कुणापुढे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.  

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी धनंजय मुंडे देखील त्यांच्यासोबत होते. बीड जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान हे गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे झालं. तर पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे. एवढं होऊनही शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती. मात्र बीड जिल्ह्याच्या नशिबी पुन्हा एकदा निराशाच आलीय.  

बीड जिल्ह्यात यापूर्वीही कधी अतिवृष्टीमुळे तर कधी कमी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यावर्षी तर नव्यानेच गोगलगायचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळल्यामुळे अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि यावर आता बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रशासनाला सूचना केल्या आहेत. 

सरकार कोणाचेही असो अस्मानी संकटासोबतच सुलताने संकटाचा सामना करणे हे या शेतकऱ्यांसाठी नवीन नाही. मात्र आता आपली कैफियत मानण्यासाठी हक्काचा पालकमंत्री नसल्याची खंत शेतकऱ्यांमध्ये आहे.  केवळ जिल्ह्याचा विकास निधीच नाही तर प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा पालकमंत्री असणे गरजेचे आहे हे शिंदे फडणवीस सरकारला सांगायचे कोणी ? असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.  

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Lad : 'दोन दिवसात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाला GR पोहोचतील, ज्यांची फी घेतल्या त्या परत करू'; भाजप नेते प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द
'दोन दिवसात राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयाला GR पोहोचतील, ज्यांची फी घेतल्या त्या परत करू'; भाजप नेते प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द, चर्चेत नेमकं काय ठरलं?
Beed Crime News :अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; बीडच्या माजलगावात प्रशासनाची धावपळ
अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; बीडच्या माजलगावात प्रशासनाची धावपळ
Tukaram Mundhe : ना पथक आलं, ना कारवाई झाली; पण तुकाराम मुंढेंच्या 'सिंघम' स्टाईल नावामुळे परळीत सकाळपासूनच शुकशुकाट! धाकानं पान टपऱ्या बंद
ना पथक आलं, ना कारवाई झाली; पण तुकाराम मुंढेंच्या 'सिंघम' स्टाईल नावामुळे परळीत सकाळपासूनच शुकशुकाट! धाकानं पान टपऱ्या बंद
Beed Crime : लग्नानंतर बायको गर्भवती राहिली, रुग्णालयात उपचारादरम्यान भयावह सत्य समोर आलं; बीडच्या माजलगावमध्ये नवऱ्यासह आई-वडील अन् सासू-सासर्‍यावर गुन्हे दाखल
लग्नानंतर बायको गर्भवती राहिली, रुग्णालयात उपचारादरम्यान भयावह सत्य समोर आलं; बीडच्या माजलगावमध्ये नवऱ्यासह आई-वडील अन् सासू-सासर्‍यावर गुन्हे दाखल

व्हिडीओ

Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : भाजप म्हणते कोणाचंही बटन दाबा, माणूस आमच्याकडेच येणार, आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : देशाला आणि आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Iran War Live Update: युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
Share Market : शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी, सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?
शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी, सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?
Rohit Sharma: टीम इंडियाच्या हिटमॅन पर्वाचा उद्या अस्त होणार? रोहित कारकिर्दीतील शेवटचा वनडे खेळणार? बीसीसीआयने सुद्धा मेसेज दिल्याची चर्चा रंगली
टीम इंडियाच्या हिटमॅन पर्वाचा उद्या अस्त होणार? रोहित कारकिर्दीतील शेवटचा वनडे खेळणार? बीसीसीआयने सुद्धा मेसेज दिल्याची चर्चा रंगली
Shivsena UBT : ओमराजे निंबाळकरांचा सांगलीहून जाऊन त्यांचा प्रचार केला, अहोरात्र झटलो त्याचा हिशोब चुकता करणार, ठाकरेंच्या तालुकाप्रमुखांचा इशारा
गद्दारांनो ठाकरे कधी संपत नसतात..., ठाकरेंच्या मेळाव्यासाठी आलेले शिवसैनिक प्रचंड संतापले
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
Thane Politics : टीडीआरनंतर आता डेटा सेंटर घोटाळा, ठाणेकरांचा जीव धोक्यात; ॲमेझॉनच्या प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
टीडीआरनंतर आता डेटा सेंटर घोटाळा, ठाणेकरांचा जीव धोक्यात; ॲमेझॉनच्या प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
Embed widget