एक्स्प्लोर

Beed News : अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळले, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात 

Beed News : बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. परंतु, अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

बीड : अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कुठे अतिवृष्टी, तर कुठे गोगलगायमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं सरकारकडून मदतही जाहीर केली. मात्र ही मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकायचे कोणी असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतोय. सरकार स्थापन होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय. तरी देखील राज्यात कुठेच पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकणार कोण? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

बीड जिल्ह्यातील चौसळा गावच्या शीला ताठे यांनी साडेतीन एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीपासून मशागतीपर्यंत मोठा खर्च झाला. उगवून आलेलं सोयाबीन हिरवं गार होतं. त्यामुळं दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र पावसाचा मोठा खंड पडला आणि या कोरडवाहू जमिनीतल्या पिक वाळून गेलं. आता पाऊस पडला असला तरी या सोयाबीनला त्याचा फार काही उपयोग होणार नाही, असं शिला ताठे सांगतात.  

जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  शेती पिकांच मोठं नुकसान झालंय. या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात आली. मात्र या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शेतकरी वर्गातून रोष व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे 25 टक्के आग्रीम पीक विम्याच्या रकमेतून बीड जिल्ह्यातील सत्तेचाळीस महसूल मंडळ वगळण्यात आल्यानं आता आपली व्यथा मांडायची कुणापुढे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.  

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी धनंजय मुंडे देखील त्यांच्यासोबत होते. बीड जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान हे गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे झालं. तर पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे. एवढं होऊनही शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती. मात्र बीड जिल्ह्याच्या नशिबी पुन्हा एकदा निराशाच आलीय.  

बीड जिल्ह्यात यापूर्वीही कधी अतिवृष्टीमुळे तर कधी कमी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यावर्षी तर नव्यानेच गोगलगायचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळल्यामुळे अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि यावर आता बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रशासनाला सूचना केल्या आहेत. 

सरकार कोणाचेही असो अस्मानी संकटासोबतच सुलताने संकटाचा सामना करणे हे या शेतकऱ्यांसाठी नवीन नाही. मात्र आता आपली कैफियत मानण्यासाठी हक्काचा पालकमंत्री नसल्याची खंत शेतकऱ्यांमध्ये आहे.  केवळ जिल्ह्याचा विकास निधीच नाही तर प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा पालकमंत्री असणे गरजेचे आहे हे शिंदे फडणवीस सरकारला सांगायचे कोणी ? असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.  

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed : मस्साजोगच्या सरपंचपदासाठी उद्या मतदान, भाऊ-बहिणीचा आईसाठी प्रचार, गावकऱ्यांना अश्रू अनावर
मस्साजोगच्या सरपंचपदासाठी उद्या मतदान, भाऊ-बहिणीचा आईसाठी प्रचार, गावकऱ्यांना अश्रू अनावर
केज नगरपंचायतमध्ये घरकुल योजनेत सव्वाचार कोटींचा घोटाळा, सहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 
केज नगरपंचायतमध्ये घरकुल योजनेत सव्वाचार कोटींचा घोटाळा, सहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 
वाल्मिकला नवी डिश टीव्ही, व्हिआयपी सुविधा; बीड तुरुंगातील कैद्याची आणखी ऑडिओ क्लिप व्हायरल
वाल्मिकला नवी डिश टीव्ही, व्हिआयपी सुविधा; बीड तुरुंगातील कैद्याची आणखी ऑडिओ क्लिप व्हायरल
Jaydutt Kshirsagar: माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधान परिषद निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह; भाजप प्रवेशासाठी आध्यात्मिक अन् राजकीय आघाड्यांवर मोर्चेबांधणी
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधान परिषद निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह; भाजप प्रवेशासाठी आध्यात्मिक अन् राजकीय आघाड्यांवर मोर्चेबांधणी

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget