एक्स्प्लोर

बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम, नेमकं खरं काय?

Badlapur School Crime News: महासंचालक कार्यालयातून एक पत्रक काढत अनेक पोलीस निरक्षकांची बदली करण्यात आली आहे.

Badlapur School Crime News: बदलापूर अत्याचार प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा रविंद्र शितोळे यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी निलंबनाची कारवाईचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र असे असताना काल (23 ऑगस्ट) रोजी शुभदा शितोळे यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शुभदा शितोळे यांच्यावर कारवाई नक्की करण्यात आलीय की नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

महासंचालक कार्यालयातून एक पत्रक काढत अनेक पोलीस निरक्षकांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणातील निलंबित (Badlapur Crime News) शुभदा शितोळे (Subhada Shitole) यांचंही नाव आहे. शुभदा शितोळेंची ठाण्याहून मुंबईत शहरात बदली करण्यात आली आहे. शासनाच्या या दोन पत्रांमुळे नेमकं शुभदा शितोळे यांच्याबाबत ठाणे पोलीस आयुक्तांनी नेमका काय निर्णय घेतला आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

आंदोलकांसमोर मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले होते?

आंदोलकांसमोर मंत्री गिरीश महाजन यांनीही संबधित अधिकार्यावर निलंबनाच्या कारवाईची ग्वाही दिली होती. मात्र महासंचालकांकडून शुभदा शितोळेंच्या बदलीचा आदेश निघाल्याने आता संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या बदलीसाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी मागवण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पोलीस दलात 14 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

लोक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का?, न्यायालयाचा सवाल

उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर काल (22 ऑगस्ट) तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांना देखील झाडल्याचं समोर आलं आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात (Badlapur School Crime News) लोक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का?, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी आपलं ब्रिदवाक्य लक्षात घ्यावं. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' याचा अर्थ समजून घ्या, अशी समज देखील न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिली.  हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, प्रश्न शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा आहे. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे, असे खडेबोलही न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहे. 

संबंधित बातमी:

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? बदलापूर प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना झाडलं, सुनावणीतील 10 मोठे मुद्दे

संबंधित व्हिडीओ-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Embed widget