एक्स्प्लोर

Aurangabad: जोरजोरात ओरडणारे सोमय्या, चित्रा वाघ आता कुठे आहेत, सत्तेसाठी एवढी लाचारी: जलील

Aurangabad News: केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.

Imtiaz Jaleel: देशातील केंद्रीय यंत्रणा आणि राज्यातील सत्तांतरावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सोबतच भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. राज्यात भाजपची सत्ता नसतांना जोरजोरात ओरडणारे किरीट सोमय्या (Bhagwat Karad) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) आता कुठे आहेत असा खोचक टोलाही जलील यांनी लगावला आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी ही टीका केली आहे. 

यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, मी सुरवातीपासूनच बोलत आहे की, ईडीचा उपयोग फक्त राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. त्यामुळे सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांचा ज्याप्रकारे दुरुपयोग होत आहे ते देशासाठी खूपच घातक आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जे मंत्री झाले आहेत त्या लोकांच्याविरुद्ध जोरजोरात ओरडणारे किरीट सोमय्या साहेब आता गप्प झाले आहे. महिलांवर अत्याचार झाला आहे त्यामुळे आम्ही हे करणार, ते करणार म्हणणाऱ्या चित्रा वाघ यासुद्धा आता गप्प बसल्या आहेत. म्हणजे इतकी लाचारी कशासाठी तर फक्त सत्तेसाठी असल्याचा टोला जलील यांनी लगावला आहे. 

मोदींना राखी बांधल्याने भावना गवळींवरील ईडीची कारवाई टळली?

याचवेळी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधलेल्या राखीवरून सुद्धा जलील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. बहुतेक आम्हाला संधी मिळाली असती किंवा येणाऱ्या अधिवेशनात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणार आहे की, ज्या भावना गवळींच्या विरोधात ईडीची कारवाई झाली आहे त्यांचे आता तुम्ही भाऊ झाला आहात. त्यामुळे आता भाऊ त्यांचे रक्षण करणार आहे. आता कुणीही त्यांना हात लावणार नाही, ईडी किंवा कोणतेही तपास यंत्रणा आता येणार नाही, असे जलील म्हणाले. 

दानवे-करडांवरही निशाणा 

याचवेळी जलील यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. ममता बनर्जी रेल्वे मंत्री असतांना सर्वकाही त्यांनी आपल्याकडे नेलं होतं. लालूप्रसाद यांनी सुद्धा तेच केले. आता रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आहेत त्यामुळे तुम्हीतरी आमच्यासाठी काहीतरी करा असा टोला जलील यांनी लगावला. तर संपूर्ण देशाच्या बँका माझ्या हातात असल्याचं सांगणाऱ्या भागवत कराड यांनी औरंगाबाद आणि गावात तरी बँका सुरु कराव्यात. काही नवीन योजना आणाव्यात, असाही टोला जलील यांनी लगावला.  

महत्वाच्या बातम्या...

Aurangabad Bhondubaba : औरंगाबादच्या 'भोंदूबाबा'ची अखेर पोलिसांकडून चौकशी, जवाबही घेतला

Imtiyaz Jalil: केंद्राची आदर्श ग्रामविकास योजना फालतू, उगाच टाईमपास; जलील यांची टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget