एक्स्प्लोर

Lumpy: औरंगाबादेत लम्पीचा साठा संपला, सुमारे वीस हजार जनावरे अजूनही लसीकरणापासून वंचित

Lumpy Vaccine: औरंगाबाद जिल्ह्यात एकूण गोवंश पशुधनांची संख्या 5 लाख 38 हजार 572 आहे.

Lumpy Skin Disease: राजस्थानसह देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या जनावरांमधील लम्पी आजार महाराष्ट्रातील गोवंशीय जनावरांमध्ये सुद्धा आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासनाने जनावरांना लसीकरण (Lumpy Skin Disease Vaccine) करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांना सुद्धा लम्पी त्वचा रोगापासून संरक्षण देण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र अद्यापही सुमारे वीस हजार जनावरं लसीकरणापासून वंचित असताना, जिल्ह्याला मिळालेला लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम रखडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात एकूण गोवंश पशुधनांची संख्या 5 लाख 38 हजार 572 आहे. लम्पीचा फैलाव लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्याला एकूण 5  लाख 22  हजार लसींचा साठा उपलब्ध करून दिला होता. दरम्यान 7 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील 5 लाख 18 हजार 923जनावरांचे लसीकरण झाले आहे. हे प्रमाण 97  टक्के आहे. जिल्ह्यात अद्यापही सुमारे 20  हजार जनावरे लसीकरणापासून वंचित आहेत. आता प्रशासनाकडे उरलेला लसीचा साठा कधी प्राप्त होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील औरंगाबाद, सोयगाव, कन्नड, सिल्लोड, आणि खुलताबाद या 5  तालुक्यांत लसीकरण पूर्ण झालेले आहे. तर गंगापूर, पैठण, फुलंब्री आणि वैजापूर या तालुक्यांमध्ये लसीकरण अद्यापही बाकी आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये लम्पीचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढला आहे. ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील 107  गावांमध्ये 1298  जनावरांना लम्पी प्रादुर्भाव झाला. यापैकी 1208 जनावरे उपचाराअंती पूर्णपणे बरी झाली असून, 95 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

घाबरून जाण्याचे कारण नाही...

इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ल्म्पीचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला नाही. त्यातच प्रशासनाने आणि सरकराने वेळीच लसीकरण सुरु केल्याने परिस्थिती आटोक्यात असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचं प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. सोबतच शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

प्रशांत बंब यांच्याकडून स्वखर्चाने लसीकरण...

एकीकडे जिल्ह्यातील लम्पीच्या लसीचा साठा संपला असतांना दुसरीकडे, मागील काही दिवसात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी स्वखर्चाने 80 हजार जनावरांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे जर एका आमदाराला एवढ्या मोठ्याप्रमाणावर खाजगी लसी उपलब्ध होत असतील, तर प्रशासनाला लसी कशा मिळत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

महत्वाच्या बातम्या...

काय सांगता! एकट्या आमदाराने संपूर्ण तालुक्यातील 'लम्पी लसीकरण' केलं स्वखर्चाने

Radhakrishna Vikhe Patil : लम्पीमुळं राज्यात 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जीपणा करु नये, विखे पाटलांच्या सूचना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Sambhajiraje Chhatrapati :स्मारकासाठी कोर्टातून स्थगिती मिळवणाऱ्या वकिलांना शोधावंABP Majha Headlines :  5 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीABP Majha Headlines :  4 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Embed widget