Aurangabad Partial Lockdown: औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?
वाढत्या कोरोना केसेसमुळे औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.औरंगाबादमध्ये 11 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत निर्बंध लादण्यात येणार आहे.

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून लॉकडाऊनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. आता त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला आहे. येत्या 11 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन असणार आहे. तर प्रत्येक शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच या कालावधीमध्ये रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे देखील चव्हाण म्हणाले.
औरंगाबादमध्ये लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला आहे का? औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन असणार आहे. तर प्रत्येक शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
औरंगाबाद लॅाकडाऊनमध्ये कोणकोणते निर्बंध असतील? या अंशतः लॉकडाऊनमध्ये धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलतरण तलाव, क्रीडा मैदाने (मात्र सरावासाठी चालू असतील), शाळा, महाविद्यालये पूर्णतः बंद असतील. यात महत्वाचे म्हणजे मंगल कार्यालय, सभागृह यात होणारे सर्व लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आली आहे. शनिवार व रविवारच्या लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय सेवा, मीडिया ऑफिस, दूध विक्री, भाजीपाला, फळविक्री सुरू राहील.
औरंगाबादचा लॅाकडाऊन कधीपर्यंत असेल? येत्या 11 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन असणार आहे.
चार एप्रिलनंतर लॅाकडाऊन वाढेल का? 11 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत या कालावधीमध्ये रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे देखील चव्हाण म्हणाले.
हॅाटेल-रेस्टॅारंट/बार सुरु असतील का? हॉटेल, बार रात्री 9 नंतर बंद राहणार तर 9 पर्यंतही 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
शाळा कॅालेज सुरु राहणार की बंद? या काळात शाळा, महाविद्यालय बंद राहणार.
सार्वजनिक समारंभ तसंच लग्न किंवा मुंज यासारख्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी काय निर्देश आहेत? ज्यांचं लग्न पूर्वीच ठरले आहेत, त्यांना रजिस्टर लग्न करण्याचा सल्ला. तर इतर कौटुंबिक कार्यक्रमांवरही निर्बंध.
जीवनावश्यक सामान/किराणा सामानाची दुकाने सुरु राहतील का? किराणा सुरू राहणार, मात्र मॉल बंद.
15 दिवसांनी कोरोना टेस्ट बंधनकारक खाजगी व कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक 15 दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र सर्वांनी सोबत बाळगावे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
Before You Go
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
महत्त्वाच्या बातम्या






















