एक्स्प्लोर

Akola Water Crisis : अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर; माझाच्या बातमीनंतर आमदार नितीन देशमुखांवर गावकऱ्यांची माफी मागण्याची वेळ

Akola Water Crisis अकोला : 'एबीपी माझा'ने अकोला जिल्ह्यातील उगवा गावातल्या पाणीटंचाईची भीषण दाहकता दाखवली होती. 'माझा'च्या या बातमीनंतर उगवा गावासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय.

Akola Water Crisis अकोला : 'एबीपी माझा'ने अकोला जिल्ह्यातील उगवा गावातल्या पाणीटंचाईची भीषण (Water Crisis) दाहकता दाखवली होती. 'माझा'च्या या बातमीनंतर उगवा गावासह (Ugwa Village) जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय. 'माझा' च्या बातमीची दखल थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलीय. त्यांनी या संदर्भात लगेच तातडीची पाऊले उचलत गावकऱ्यांना पाणी देण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत. उगवा हे गाव अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात येतंय. दरम्यान, या गावातील पाणीटंचाई प्रकरणी बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी उगवावाशियांची माफी मागितलीये. या गावाला पाणी न मिळण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपलीच असल्याचं आमदार देशमुख म्हणालेय.

मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील 69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार देशमुखांनी केलाय. पुढच्या सहा महिन्यांमध्ये उगवा गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविणार असल्याचं आमदार देशमुख यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणालेय.

69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार- नितीन देशमुख

दरम्यान, 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असतांना बाळापूर मतदारसंघातील 69 गावांसाठी 219 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातील पाणी यासाठी आरक्षित करण्यात आलं होतंय.‌ मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने या योजनेला स्थगिती दिलीय. त्यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वान धरणातील पाण्याच्या आरक्षण निर्णयाला स्थगिती दिलीय. त्यानंतर आमदार देशमुखांनी अकोला ते नागपूरमधील फडणवीस यांच्या बंगल्यापर्यंत या प्रश्नावरून पदयात्रा काढली होती. मात्र देशमुख यांचं आंदोलन नागपूरात मोडून काढण्यात आलं होतं. यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरक्षण स्थगितीच्या निर्णयाला रद्द केलं होतं. फडणवीस आणि त्यावेळच्या सरकारने हा निर्णय घेतला नसता तर आज उगवा गावासह मतदारसंघातील 69 गावांना पिण्याचे गोड पाणी मिळालं असतं असा टोला यावेळी आमदार देशमुखांनी लगावलाय.

दरम्यान 2019 मध्ये उगवा गावाला आपण 64 खेडी पाणीपुरवठा योजनेत लोकांना पाणी मिळावं म्हणून अवैधपणे समाविष्ट केल्याचा  गौप्यस्फोट आमदार देशमुख यांनी यावेळी केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

विदर्भात सूर्याचा प्रकोप! चंद्रपुरात देशात सर्वाधिक तापमानाची नोंद, राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
RR vs RCB Live Score Update :कोहली-पाटीदारचा अनुभव की जैस्वाल-वैभव सूर्यवंशीची वादळं... आज कोणाचं नशीब चमकणार?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
RR vs RCB LIVE IPL 2026 : कोहली-पाटीदारचा अनुभव की जैस्वाल-वैभव सूर्यवंशीची वादळं... आज कोणाचं नशीब चमकणार?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
Embed widget