एक्स्प्लोर

Akola Water Crisis : अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर; माझाच्या बातमीनंतर आमदार नितीन देशमुखांवर गावकऱ्यांची माफी मागण्याची वेळ

Akola Water Crisis अकोला : 'एबीपी माझा'ने अकोला जिल्ह्यातील उगवा गावातल्या पाणीटंचाईची भीषण दाहकता दाखवली होती. 'माझा'च्या या बातमीनंतर उगवा गावासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय.

Akola Water Crisis अकोला : 'एबीपी माझा'ने अकोला जिल्ह्यातील उगवा गावातल्या पाणीटंचाईची भीषण (Water Crisis) दाहकता दाखवली होती. 'माझा'च्या या बातमीनंतर उगवा गावासह (Ugwa Village) जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय. 'माझा' च्या बातमीची दखल थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलीय. त्यांनी या संदर्भात लगेच तातडीची पाऊले उचलत गावकऱ्यांना पाणी देण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत. उगवा हे गाव अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात येतंय. दरम्यान, या गावातील पाणीटंचाई प्रकरणी बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी उगवावाशियांची माफी मागितलीये. या गावाला पाणी न मिळण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपलीच असल्याचं आमदार देशमुख म्हणालेय.

मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील 69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार देशमुखांनी केलाय. पुढच्या सहा महिन्यांमध्ये उगवा गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविणार असल्याचं आमदार देशमुख यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणालेय.

69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार- नितीन देशमुख

दरम्यान, 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असतांना बाळापूर मतदारसंघातील 69 गावांसाठी 219 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातील पाणी यासाठी आरक्षित करण्यात आलं होतंय.‌ मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने या योजनेला स्थगिती दिलीय. त्यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वान धरणातील पाण्याच्या आरक्षण निर्णयाला स्थगिती दिलीय. त्यानंतर आमदार देशमुखांनी अकोला ते नागपूरमधील फडणवीस यांच्या बंगल्यापर्यंत या प्रश्नावरून पदयात्रा काढली होती. मात्र देशमुख यांचं आंदोलन नागपूरात मोडून काढण्यात आलं होतं. यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरक्षण स्थगितीच्या निर्णयाला रद्द केलं होतं. फडणवीस आणि त्यावेळच्या सरकारने हा निर्णय घेतला नसता तर आज उगवा गावासह मतदारसंघातील 69 गावांना पिण्याचे गोड पाणी मिळालं असतं असा टोला यावेळी आमदार देशमुखांनी लगावलाय.

दरम्यान 2019 मध्ये उगवा गावाला आपण 64 खेडी पाणीपुरवठा योजनेत लोकांना पाणी मिळावं म्हणून अवैधपणे समाविष्ट केल्याचा  गौप्यस्फोट आमदार देशमुख यांनी यावेळी केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

विदर्भात सूर्याचा प्रकोप! चंद्रपुरात देशात सर्वाधिक तापमानाची नोंद, राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget