एक्स्प्लोर

अकोलेत निळवंडेचं पाणी पेटलं... आवर्तन थांबविण्यासाठी शरद पवार गटाचे चाकबंद आंदोलन, महिलांचा पाण्यात उड्या मारण्याचा इशारा

Nilwande Dam : निळवंडे धरणाच्या निकृष्ट कालव्यांच्या कामाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चाकबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी पाण्यात उड्या मारण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

अकोले : निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) निकृष्ट कालव्यांच्या कामाविरोधात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे (Sunita Bhangare) यांच्या नेतृत्वात चाकबंद आंदोलन केले. यावेळी हातात दगड घेऊन कुलूप तोडण्यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. आवर्तन बंद केले नाही तर पाण्यात उड्या मारण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

धरणाच्या निकृष्ट कालव्यांच्या कामा विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. निळवंडे धरणाच्या चाकापर्यंत आंदोलक पोहचले होते. अनेक वेळा मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने आंदोलन करण्यात आले असून हातात दगड घेऊन कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना गेट जवळ रोखून धरले मात्र डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

प्रशासनाकडून वेळ मारून नेण्याचे काम

यावेळी सुनीता भांगरे म्हणाल्या की,  दोन वर्षापासून या ठिकाणी उजवा आणि डावा या दोन्ही तालुक्याला पाणी सुरू आहे. परंतु या विभागाने पाणी पाटात सोडले आहे की, घरात सोडले आहे ते कळत नाही. आम्ही तिसऱ्यांदा आंदोलन करत आहोत. मात्र, प्रशासन केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे. मागच्या वेळेस आम्ही आंदोलन केले तेव्हा सांगितले की, दुसऱ्या रोटेशन चालू करू तेव्हा पाटाचे काँक्रिटीकरण होणार आणि पूल बांधणार, मात्र कुठलेही काम झालेले नाही. फक्त वेळ मारून नेण्याचे काम प्रशासन करत आहे. आज आम्ही हे पाणी बंद करणार आहोत. 

...तर पाण्यात उड्या मारण्याचा इशारा

शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले आहे. मुलांना शाळेत जात येत नाही. आमची मागणी आहे की, ते मागच्या वेळेस झालेल्या पंचनाम्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा. पुन्हा आवर्तन सुरु होण्याआधी काँक्रिटीकरण आणि पुलाचे काम झाले पाहिजे. आज पाणी बंद केले नाही तर आम्ही सर्व महिला या पाण्यात उड्या मारू, असा इशारा सुनिता भांगरे यांनी यावेळी दिला. 

...म्हणून आज बहीण झाली लाडकी

यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेले  तरुण उमेदवार अमित भांगरे म्हणाले की, अडीच वर्षापासून शेतकऱ्याच्या हिताचा एकही निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार फक्त योजना आणण्यात व्यस्त आहे. लाडकी बहीण योजना काढली. लोकसभेच्या निवडणुकीला पडली मतांची खडकी म्हणून आज आमच्या बहिणी झाल्यात यांच्यासाठी लाडकी, अशी परिस्थिती राज्यभरात झाली आहे. आम्हाला दीड हजार रुपयांची लाचारी नको. आमच्या मनगटात ताकद आहे. शेतकरी उद्ध्वस्त करायचे काम करू नका. वावरात पाणी तुंबत आहे तरी तुमचे लक्ष जात नाही. तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई देत नाही. तुम्ही कशासाठी सरकार चालवत आहात याचे उत्तर शासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

आणखी वाचा 

रोहित पाटलांनंतर विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरूण उमेदवार जाहीर, राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरले

महत्त्वाच्या बातम्या

Lokshahir Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी
Ahilyanagar Crime News : संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget