एक्स्प्लोर

Amol Kolhe : तो गट म्हणजे अजित पवार मित्र मंडळ; अमोल कोल्हेंचा जोरदार हल्लाबोल

Amol Kolhe News : खा. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 'अजित पवार मित्र मंडळ' असा उल्लेख केला आहे. तसेच खा. सुजय विखेंवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Amol Kolhe अहमदनगर : येथील पिंपळगाव माळवी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ शुकृवारी खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (NCP Ajit Pawar Group) अजित पवार मित्र मंडळ असा उल्लेख केला आहे. तसेच खा. सुजय विखेंवर (Sujay Vikhe-Patil) देखील अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. 

महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत, त्यापैकी उद्धव ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नऊ खासदार आहेत. बाकीचे भाजपचे, शिंदे गटाचे आणि अजित पवार मित्र मंडळाचे 39 खासदार आहेत. हे 39 खासदार कांदा निर्यात बंदीवर का बोलले नाही? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला. अद्याप निवडणूक आयोगाचा (Election Commission) निकाल लागलेला नाही त्यामुळे पक्षाचे नाव घेता येणार नाही. त्यांना मित्रमंडळच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी अजित पवार गटाला लगावला आहे. 

सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल

अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर होतंय म्हणून तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी साखर वाटत आहेत. मात्र ते ज्या वेळेला साखर वाटायला येतात तेव्हा त्यांना आधी हा प्रश्न विचारा की , केवळ साखर देऊन आमची तोंड बंद करण्यापेक्षा जेव्हा कांद्याची निर्यात बंदी सरकारने लादली तेव्हा तुमचं तोंड संसदेत का उघडलं नाही? असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

त्यांनी करोडोंची साखर वाटली का?

एकीकडे मागच्या आठ ते दहा महिन्यांमध्ये दुधाचे दर पाडून त्यांनी शेतकऱ्यांच्या खिशातून करोडो रुपये काढून घेतले. आता काय त्यांनी करोडोंची साखर वाटली का? असा सवाल करत खा. अमोल कोल्हे यांनी हिशोब मांडत खा. सुजय विखेंना चिमटा काढला आहे.

अशा लोकांना श्रीराम कसे पावतील?

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी गुरुवारी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात त्यांनी अजित पवार आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “प्रभू श्रीराम हे आमचे दैवत आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू श्रीरामांनी वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवास पत्करला होता. आज मात्र पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना श्रीराम कसे पावतील? जनता सूज्ञ आहे, असा हल्लाबोल त्यांनी अजित पवारांवर केला. 

भाजपवर हल्लाबोल

प्रभू श्रीराम हे जनतेच्या मनात आहेत. प्रत्येकाच्या हृदयात आहेत. चार खांद्यावर जातानाही जय राम श्रीराम जय जय राम असे म्हटले जाते. दोन माणसे भेटतात तेव्हा राम राम म्हणतात. माणसे जोडणारा राम भारताच्या मनात आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर रामभक्त ते मान्य करणार नाहीत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

इतर महत्वाच्या बातम्या

Amol Kolhe Speech : निवडणुकीच्या आधी वचनं, मग चुनावी जुमला सांगून टाळायचं, प्रभू श्रीराम कसे पावतील?; अमोल कोल्हेंचा बाण

Nashik News : दुर्दैवी! नाशिकमधील 'त्या' गॅस गळतीत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू; चार दिवस मृत्यूशी झुंज अपयशी

 

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget