एक्स्प्लोर

जामखेड येथे जात पंचायतीचा 'जाच'; डावरी समाजाच्या जातपंचायतीच्या 22 पंचांवर गुन्हा दाखल, कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करत ठोठावला होता दीड लाखांचा दंड

जामखेड येथील आरोळे वस्ती येथे चव्हाण कुटुंबीय राहायला आहे. या कुटुंबातील मोहन चव्हाण यांची मुलगी पूजा हिचा विवाह सासवड येथील रमेश शिंदे याच्यासोबत 2018 मध्ये झाला होता.

 अहमदनगर: पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र आजही जातपंचायतच्या जोखडातून मुक्त झालेला नाही, अशीच घटना अहमदनगरच्या (Ahmednagar) जामखेड तालुक्यातून समोर आली आहे. मुलीला नांदवण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधामध्ये पोलिसात तक्रार देणाऱ्या एका कुटुंबाला जातपंचायतने तीन लाखांचा दंड ठोठावत, डवरी गोसावी जातीतून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड (Jamkhed News)  पोलीस ठाण्यामध्ये 22 पंचांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध आणि निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

जामखेड येथील आरोळे वस्ती येथे चव्हाण कुटुंबीय राहायला आहे. या कुटुंबातील मोहन चव्हाण यांची मुलगी पूजा हिचा विवाह सासवड येथील रमेश शिंदे याच्यासोबत 2018 मध्ये झाला होता. दोन वर्ष नांदवल्यानंतर पूजा हिला सासरच्या मंडळींनी माहेरी आणून सोडले. त्यामुळे मोहन चव्हाण आणि कुटुंबियांनी पूजा हिच्या सासरच्या मंडळींना वारंवार समजावून सांगितले. मात्र तरी देखील त्यांनी तिला नांदवण्यास नकार दिलायाबाबत मोहन चव्हाण यांनी कर्जत येथे भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर पूजा हिच्या सासरच्या मंडळींनी हे प्रकरण जातपंचायतमध्ये बसून मिटवू असं सांगितलं. जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथे 22 पंच न्यायनिवाडासाठी बसले, त्यावेळी पंचांनी  तुम्ही पोलिसात तक्रार का दाखल केली असं म्हणत तीन लाख रुपये दंड भरा, असे सांगण्यात आले. दंड न भरल्यास डवरी गोसावी समाजातून बहिष्कार टाकू, असा  निर्णय  देण्यात आला. दरम्यान मोहन चव्हाण यांनी जात पंचायतीचा निर्णय आपल्याला मान्य नाही असं जातपंचायतीला सांगितले.  त्यामुळे  पंचांनी त्यांना जातीतून बहिष्कृत केल्याचा मोहन चव्हाण यांचा आरोप आहे, तशी फिर्याद त्यांनी जामखेड पोलिसात दिली आहे.

असाच प्रकार मोहन चव्हाण यांच्या चुलत मामा नारायण सावंत यांच्यासोबत देखील झाला आहे. ऊस तोड मजूर म्हणून काम करणारी त्यांची मुलगी आपल्या कुटुंबासोबत पालात झोपली असता त्यांच्या समाजातील तीन मुलांनी तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत तिने सोनई पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र तिच्या सासरच्या मंडळीनी पोलिसात जाण्यास विरोध केला. आपल्याच जातीतील मुलांच्या विरोधात तक्रार करू नको यासाठी तिच्यावर आणि तिच्या वडिलांवर दबाव टाकला असा तिच्या वडिलांचा आरोप आहे. दरम्यान वडिल पोलिसात तक्रार दाखल करण्याबाबत ठाम असल्याने त्यांनी तक्रार दाखल केली म्हणून तिला माहेरी सोडून दिले.  तिच्या वडिलांना जातीतून बहिष्कृत केले.

शाहू , फुले , आंबेडकरांच्या या महाराष्ट्र आजही जात पंचायतीच्या जोखडातून मुक्त झालेला नाही. त्यामुळे केवळ कायदे करून भागणार नाही तर कायद्याची योग्य अंमलबजावणी करत अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंनिसच्या रंजना गावंदे यांनी केली आहे.

 जात पंचायतीचे हे जोखड पिढ्यानपिढ्या पुढे चालत असून ही पद्धत बंद व्हायला हवी असं या पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.जेव्हा अशा जात पंचायती भरवल्या जातात तेव्हा पोलीस किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी पोहचतात त्यावेळी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात येते. शक्यतो एखाद्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतरच जात पंचायत भरवली जाते आणि कायद्याची दिशाभूल केली जाते असंही नातेवाईक सांगतात. हुंड्यासाठी किंवा इतर कारणांसाठी मुलींचा छळ करायाचा आणि उलट त्यांच्याच कुटुंबियांना दंड ठोठायाचा हा कोणत्या न्याय? असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. जातपंचायतीच्या पंचाविरोधात केवळ गुन्हे दाखल करून भागणार नाही तर या कायद्याचा अंमलबजावणी योग्य पध्दतीने करून कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 10 March 2025Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाहीAjit Pawar On Ladki Bahin : 2025-26 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद : अजित पवारABP Majha Marathi News Headlines 02.00 PM TOP Headlines 02.00 PM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
Maharashtra Budget 2025: नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
Embed widget