एक्स्प्लोर

Relationship Tips : ब्रेकअपनंतर लगेचच नवीन नातं सुरू करताय? थांबा.. दुष्परिणाम जाणून घ्या, स्वत:साठी थोडा वेळ द्या! 

Relationship Tips : नात्याचा शेवट झाल्यानंतर दुसरं नातं सुरू करण्यात काहीच गैर नाही. मात्र यासाठी तुम्ही स्वत:ला वेळ द्यावा. ब्रेकअपनंतर नवीन नातेसंबंध सुरू करणे कसे तणावपूर्ण आहे हे जाणून घ्या.

Relationship Tips : असं म्हणतात ना..नातं तोडायला दोन मिनिटंही लागत नाही, पण तेच नातं जोडायला बराच वेळ लागतो. त्याचप्रमाणे प्रेम करणं तसं सोप्प आहे. पण ते निभावणं तितकीच कठीण.. प्रेमात जोडीदाराकडून छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मन दुखणे सामान्य आहे. परंतु काहीवेळा समस्या इतकी गंभीर होते की, तुम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. सध्या ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पण यानंतर, जेव्हा शून्यतेची भावना निर्माण होते, तेव्हा लोक त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी किंवा भावनिक समाधानासाठी नवीन नातेसंबंध शोधू लागतात. रिलेशनशिप तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, एका नात्याचा शेवट झाल्यानंतर दुसरं नातं सुरू करण्यात काहीच गैर नाही. मात्र यासाठी तुम्ही स्वत:ला वेळ द्यावा. एक नाते संपल्यानंतर लगेचच दुसरे नाते सुरू केल्याने तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त तणाव आणि दुःख होऊ शकते. ब्रेकअपनंतर नवीन नातेसंबंध कसे सुरू करणे तणावपूर्ण आहे हे जाणून घ्या..


रिबाउंड रिलेशनशिप म्हणजे काय?

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार मनोचिकित्सक डॉ. युवराज पंत सांगतात की, रोमँटिक ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच एखाद्याच्या भावना समजून घेतल्याशिवाय आणि न जाणता स्वतःला दुस-या नात्यात जोडणे याला रिबाउंड रिलेशनशिप म्हणतात. यामुळे व्यक्ती थोड्या काळासाठी का होईल तणाव आणि नैराश्यात अडकण्यापासून तर वाचते. मात्र त्याच वेळी, एखाद्याला नवीन नातेसंबंधात स्वतःला जुळवून घेण्यास आणि स्वीकारण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घाईघाईने सुरू झालेले नाते काहीवेळा तुमच्यासाठी दुहेरी तणावाचे कारण बनू शकते. त्यामुळे स्वत:साठी वेळ काढणे गरजेचे आहे. ब्रेकअप म्हणजे तुमच्या भूतकाळातील नातेसंबंधातून शिकण्याची संधी आहे. अशा स्थितीत याला स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. 


रिबाउंड नाते कसे सुरू होते?

सहसा, अशा संबंधांमध्ये स्थिरतेचा अभाव असतो आणि व्यक्ती स्वत: ला आनंदी ठेवण्यासाठी जबरदस्तीने प्रयत्न करू लागते. भावनेच्या कमतरतेमुळे दोन व्यक्ती एकत्र असतानाही क्वालिटी टाइम एन्जॉय करू शकत नाहीत. पहिले नाते तुटल्यानंतर लोकांमध्ये एकटेपणा वाढू लागतो, ज्यावर मात करण्यासाठी लोक घाईघाईने नातेसंबंध पुनस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. जर्नल ऑफ सोसायटी अँड पर्सनल रिलेशनशिप्सनुसार, पूर्वीच्या जोडीदाराच्या आयुष्यातील भावनिक आणि व्यावहारिक अंतर भरून काढण्यासाठी रिबाउंड संबंध तयार केले जातात. संशोधनात असे आढळून आले आहे की, सामाजिक नकार लोकांना नवीन नातेसंबंध निर्माण करण्यास प्रवृत्त करतो. संशोधनानुसार, एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याच्या जुन्या जोडीदारासारख्याच गोष्टी आणि सवयी दिसू लागल्यावर, त्याला/तिला जीवनात समाविष्ट करून, एक पुनर्संबंधित नाते सुरू होते.

ब्रेकअपनंतर लगेचच नवीन नातं सुरू करणं तुमच्यासाठी या 4 मार्गांनी हानिकारक ठरू शकतं.

भावनांकडे दुर्लक्ष

प्रत्येक व्यक्तीच्या भावना वेगवेगळ्या असतात. ब्रेकअप नंतर, स्वत: सोबत वेळ घालवणे महत्वाचे आहे जेणेकरून आपण सर्व जुन्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकाल. आपल्या भावनांवर लक्ष केंद्रित न करता आणि जुने नाते ज्या कारणांमुळे तुटले ते समजून न घेता, व्यक्ती नवीन नात्यात अडकू लागते. चिंतनावर वेळ न घालवता नवीन नात्यात उडी मारल्याने तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. यामध्ये तुम्ही तुमच्या नवीन पार्टनरसोबत लगेत भावनिकरित्या कनेक्ट होऊ शकत नाही.

तुलनात्मक वागणूक 

एकीकडे लोकांना ब्रेकअप होण्याची घाई असते, तर दुसरीकडे नवीन नात्यात येण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागत नाही. यामुळे तुमच्या आयुष्यातील तणाव कमी होऊ शकतो. पण माणूस भूतकाळ पूर्णपणे विसरून पुढे जाऊ शकत नाही. आत्मपरीक्षणासाठी वेळेअभावी माणूस जुन्या आठवणीतून बाहेर पडू शकत नाही, उलट तो आपल्या कालची आजच्या काळाशी तुलना करू लागतो. यामुळे नवीन नातेसंबंधांमध्ये समृद्धी येत नाही.

खूप अपेक्षा

नवीन नात्यात आल्यानंतर जोडीदाराकडून व्यक्तीच्या अपेक्षा आणि इच्छा वाढू लागतात. ब्रेकअपनंतर, आता एखाद्या व्यक्तीला नवीन जोडीदाराचे लक्ष हवे असते, त्याला नवीन नातेसंबंधातील प्रत्येक क्षण विशेष वाटावा अशी इच्छा असते. पण प्रत्यक्षात प्रेम हे घेण्याबद्दल नसून देण्याबद्दल असते आणि प्रत्येक व्यक्तीचे वागणे वेगळे असते. काही लोक आनंदी मूडचे असतात, तर काहींना शांत किंवा एकटे राहणे आवडते. आता, नकळत एखाद्याशी नातेसंबंध निर्माण करण्यापूर्वी, आपण या सर्व गोष्टींबद्दल माहिती मिळवू शकत नाही. अशा परिस्थितीत नवीन जोडीदाराशी संबंधित असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास ती व्यक्ती निराश होते. त्यामुळे नात्यात तणाव वाढू लागतो. नवीन नात्यात आल्यानंतर जोडीदाराकडून व्यक्तीच्या अपेक्षा आणि इच्छा वाढू लागतात. ,

जुन्या आठवणी 

नवीन नातेसंबंध सुरू केल्यानंतरही, बरेच लोक त्यांच्या माजी प्रियकर किंवा गर्लफ्रेंडला विसरू शकत नाहीत किंवा त्यांच्या संपर्कात राहू शकत नाहीत. यामुळे नवीन नाती जतन करून पुढे नेण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. खरं तर, जर एखाद्या व्यक्तीच्या भावना त्याच्या जुन्या जोडीदाराशी संलग्न राहिल्या तर त्याला पुढे जाण्यात अडचणी येतात. वरील कारणे नवीन जोडीदाराला तणावात टाकू शकतात.

नात्यात दुरावा

घाईघाईत नवीन नाते तयार केल्यानंतर, त्या व्यक्तीला त्या नात्याबद्दल जास्त काळ भावना असू शकत नाही. हळूहळू नात्यात दुरावा येऊ लागतो. कोणत्याही आउटिंग, पार्टी किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये नवीन जोडीदाराला समावेश करणे ते आवश्यक मानत नाहीत. त्यामुळे नात्यात गैरसमज वाढू लागतात आणि कधी कधी नाती तुटतात. कोणतेही नवीन नाते तयार करण्यापूर्वी, परस्पर संभाषण आणि भावना जुळणे आवश्यक आहे.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Relationship Tips : नातं टिकवण्यासाठी 'ब्रेक' ही आवश्यक, इथे ब्रेकचा अर्थ समजून घ्या, 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Dhananjay Mahadik Kolhapur Celebration : कॉलर उडवली, दंड थोपटले; धनंजय महाडिक यांचा तुफान जल्लोष
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
Embed widget