एक्स्प्लोर

Holiday Heart Syndrome : न्यू इअर सेलिब्रेशन बनू शकते हार्ट अटॅकचं कारण, काय आहे हे प्रकरण?

Holiday Heart Syndrome : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसांमध्ये ह्रदयविकारामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. सध्या सुट्ट्यांचा सीझन सुरु आहे. या काळात हार्ट अटॅकचा धोका असतो.

Holiday Heart Syndrome : नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. आधी नाताळ आणि नंतर नवीन वर्षाचा उत्साह आणि जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत आहे. सर्वजण न्यू इअर सेलिब्रेशनसाठी (New Year Celebration) वेगवेगळे प्लॅन करताना दिसत आहेत. पण या उत्साहाच्या वातावरणात तुमची छोटीशी चूक तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सध्या ह्रदयासंबंधित आजाराचे प्रमाण वाढले आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसांमध्ये ह्रदयविकारामुळे (Heart Problems) मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. सध्या सुट्ट्यांचा सीझन सुरु आहे. या काळात हार्ट अटॅकचा धोका असतो. या काळात हॉलिडे हार्ट सिंड्रोम नावाच्या आजाराचा धोका अधिक असतो.

हॉलिडे हार्ट सिंड्रोममुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे उत्सवाच्या काळात खाण्या-पिण्याकडे केलेले दुर्लक्ष. उत्सव किंवा सुट्ट्यांच्या काळात लोक खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींकडून दुर्लक्ष करुन कोणतीही बंधने न पाळत कोणत्याही पदार्थांचे सेवन करतात. यामुळे हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा धोका बळावतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोक लांब सुट्ट्या किंवा उत्सवावेळी आहाराकडे दुर्लक्ष करतात. बहुतेक लोक या वेळी तेलकट, मीठयुक्त, साखरयुक्त पदार्थांचे सेवन अधिक करतात. तसेच दारुचे म्हणजे अल्कोहोलचे सेवनही मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे अचानक ह्रदयावर ताण पडतो आणि त्यांचे कार्य मंदावते. या परिस्थितीमध्ये ह्रदयविकाराची झटका येण्याची शक्यता जास्त असते. ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करताना या निष्काळजीपणामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 15 टक्क्यांनी वाढतो, असे संशोधकांना आढळून आले आहे. 

हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?

हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे सुट्टीवर असताना उद्भवणार्‍या गंभीर हृदयासंबंधित समस्या आहे. हृदयविकाराची समस्या वर्षाच्या कोणत्याही वेळी उद्भवू शकते, पण हॉलिडे हार्ट सिंड्रोम ही समस्या सहसा सुट्टीच्या काळात उद्भवते. सुट्ट्यांच्या काळात लोकांमध्ये तेलकट, तिखट म्हणजेच जास्त कॅलरीच्या आहाराचे सेवन आणि अल्कोहोलयुक्त पेये यांचे सेवन यामध्ये लक्षणीय वाढ होते. यामुळे हृदयाचे ठोके वाढण्याचा त्रास जाणवू शकतो. याची वेळीच काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका असतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हॉलिडे हार्ट सिंड्रोमपासून आपला बचाव करण्यासाठी सण-उत्सवाच्या काळात सर्वांनी आपल्या खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या ह्रदयरोग तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोकांसाठी सुट्ट्या म्हणजे खाणे-पिणे आणि अल्कोहोलचे सेवन करणे हा असतो. आहारामध्ये अधिक प्रमाणात मीठ, साखर किंवा जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने ह्रदयावर परिणाम होतो. यामुळे ह्रदयाची कार्य करण्याची क्षमता बदलते. ह्रदयाचे ठोके कमी होतात, परिणामी ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
Embed widget