एक्स्प्लोर

Health Tips: आहारात मीठाचा समावेश टाळा; हृदयविकाराचा धोका 20 टक्क्यांनी होईल कमी

Health Tips: जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर आहारात मीठाचा समावेश अजिबात करु नये, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. मीठाचं सेवन कमी केल्यास हृदयविकाराचा धोकाही टळतो.

Health Tips: आहारात मिठाचा (Salt) समावेश न केल्यास किंवा कमी प्रमाणात मिठाचं सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका पाचपटीने कमी होऊ शकतो, असं एका अभ्यासातून आढळून आलं आहे.

मिठाचा अतिवापर केल्यास हृदयविकाराचा धोका

दक्षिण कोरियातील क्यूंगपूक नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक नेहमी त्यांच्या अन्नात मीठ घालतात त्यांना एट्रियल फायब्रिलेशनची किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 22 टक्के जास्त असते. जे अन्नात मीठाचा वापर कधीही करत नाहीत किंवा कमी प्रमाणाच मीठ वापरतात, त्यांना हृदयविकाराचा धोका तितका नसतो.

एट्रियल फायब्रिलेशन ही एक अनियमित आणि बर्‍याचदा हृदयाचे ठोके खूप जलद होण्याची प्रक्रिया असते, ज्यामुळे हृदयात रक्ताच्या गाठी (Blood Clot) देखील होऊ शकतात. यामुळे स्ट्रोक, हृदय बंद पडणे आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढतो. आहारात मीठाचं प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांना स्ट्रोक होण्याची शक्यता पाच पट जास्त असते.

क्यूंगपूक नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्रमुख संशोधक यून जंग पार्क म्हणाले, “आमच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, पदार्थांमध्ये मीठाचं सेवन कमी करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो."

मिठाचा वापर कमी केल्यास हृदयविकाराचा धोका 12 टक्के कमी

गेल्या आठवड्यात अॅमस्टरडॅममध्ये झालेल्या युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्समध्ये सादर केलेल्या अभ्यासासाठी, टीमने 40 ते 70 वयोगटातील 3 लाख 95 हजार 682 लोकांचा डेटा तपासला, ज्यांचं रुटिन 11 वर्षांसाठी तपासलं गेलं. या अभ्यासातील निष्कर्ष असंही सूचित करतो की, आहारात मीठाचा वापर कमी केल्याने हृदयविकाराचा धोका 12 टक्क्यांनी कमी झाला.

“जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबासह आरोग्य समस्या उद्भवू शकतात, हे सर्वज्ञात आहे. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याचा धोका वाढण्याबरोबरच, उच्च रक्तदाबामुळे तुमच्या हृदयाचे नुकसान होऊ शकते आणि यामुळे अॅट्रियल फायब्रिलेशन होऊ शकते,” ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे प्रोफेसर जेम्स लीपर म्हणाले.

जास्त मीठ खाल्ल्याने मृत्यूचाही धोका

मीठातील सोडियम हे एक आवश्यक पोषक घटक आहे, परंतु जास्त मीठ खाल्ल्याने ते आहार आणि पोषण-संबंधित मृत्यूसाठी कारण ठरतं. सोडियमचा मुख्य स्त्रोत टेबल मीठ (सोडियम क्लोराईड) आहे, परंतु ते सोडियम ग्लूटामेट सारख्या इतर मसाल्यांमध्ये देखील समाविष्ट आहे.

डब्ल्यूएचओकडून देखील मिठाचं सेवन कमी करण्याचं आवाहन

मार्चच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) लोकांना मिठाचं सेवन कमी करण्यासाठी 'मोठ्या प्रमाणावर प्रयत्न' करण्याचं आवाहन केलं होतं, जेणेकरुन हृदयाच्या समस्या, स्ट्रोक आणि कर्करोगाचा धोका टाळता येईल.

'मिठाचा वापर टाळल्यास सात दशलक्ष जीव वाचू शकतात'

सोडियमचं सेवन कमी करण्याबाबतच्या आपल्या प्रकारच्या पहिल्या जागतिक अहवालात, जागतिक आरोग्य संस्थेने असं नमूद केलं आहे की, 2025 पर्यंत सोडियमचं सेवन 30 टक्क्यांनी कमी करण्याचं जागतिक लक्ष्य गाठण्यासाठी लोक अजून दूर आहेत. अहवालातून असं दिसून आलं आहे की, केवळ 5 टक्के देश मीठाचा वापर करणं टाळत आहे किंवा कमी प्रमाणात मीठ वापरत आहे. तर भारतासह 73 टक्के देशांना अशा धोरणांच्या सक्त अंमलबजावणीची गरज आहे. सोडियम कमी करण्याच्या धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास 2030 पर्यंत जागतिक स्तरावर अंदाजे सात दशलक्ष जीव वाचू शकतात, असं WHO नं म्हटलं आहे.

हेही वाचा:

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

About the author आयएएनएस

आयएएनएस वृत्तसंस्था (Indo-Asian News Service)
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Embed widget