एक्स्प्लोर

Health Tips: आहारात मीठाचा समावेश टाळा; हृदयविकाराचा धोका 20 टक्क्यांनी होईल कमी

Health Tips: जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर आहारात मीठाचा समावेश अजिबात करु नये, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. मीठाचं सेवन कमी केल्यास हृदयविकाराचा धोकाही टळतो.

Health Tips: आहारात मिठाचा (Salt) समावेश न केल्यास किंवा कमी प्रमाणात मिठाचं सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका पाचपटीने कमी होऊ शकतो, असं एका अभ्यासातून आढळून आलं आहे.

मिठाचा अतिवापर केल्यास हृदयविकाराचा धोका

दक्षिण कोरियातील क्यूंगपूक नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक नेहमी त्यांच्या अन्नात मीठ घालतात त्यांना एट्रियल फायब्रिलेशनची किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 22 टक्के जास्त असते. जे अन्नात मीठाचा वापर कधीही करत नाहीत किंवा कमी प्रमाणाच मीठ वापरतात, त्यांना हृदयविकाराचा धोका तितका नसतो.

एट्रियल फायब्रिलेशन ही एक अनियमित आणि बर्‍याचदा हृदयाचे ठोके खूप जलद होण्याची प्रक्रिया असते, ज्यामुळे हृदयात रक्ताच्या गाठी (Blood Clot) देखील होऊ शकतात. यामुळे स्ट्रोक, हृदय बंद पडणे आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढतो. आहारात मीठाचं प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांना स्ट्रोक होण्याची शक्यता पाच पट जास्त असते.

क्यूंगपूक नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्रमुख संशोधक यून जंग पार्क म्हणाले, “आमच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, पदार्थांमध्ये मीठाचं सेवन कमी करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो."

मिठाचा वापर कमी केल्यास हृदयविकाराचा धोका 12 टक्के कमी

गेल्या आठवड्यात अॅमस्टरडॅममध्ये झालेल्या युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्समध्ये सादर केलेल्या अभ्यासासाठी, टीमने 40 ते 70 वयोगटातील 3 लाख 95 हजार 682 लोकांचा डेटा तपासला, ज्यांचं रुटिन 11 वर्षांसाठी तपासलं गेलं. या अभ्यासातील निष्कर्ष असंही सूचित करतो की, आहारात मीठाचा वापर कमी केल्याने हृदयविकाराचा धोका 12 टक्क्यांनी कमी झाला.

“जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबासह आरोग्य समस्या उद्भवू शकतात, हे सर्वज्ञात आहे. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याचा धोका वाढण्याबरोबरच, उच्च रक्तदाबामुळे तुमच्या हृदयाचे नुकसान होऊ शकते आणि यामुळे अॅट्रियल फायब्रिलेशन होऊ शकते,” ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे प्रोफेसर जेम्स लीपर म्हणाले.

जास्त मीठ खाल्ल्याने मृत्यूचाही धोका

मीठातील सोडियम हे एक आवश्यक पोषक घटक आहे, परंतु जास्त मीठ खाल्ल्याने ते आहार आणि पोषण-संबंधित मृत्यूसाठी कारण ठरतं. सोडियमचा मुख्य स्त्रोत टेबल मीठ (सोडियम क्लोराईड) आहे, परंतु ते सोडियम ग्लूटामेट सारख्या इतर मसाल्यांमध्ये देखील समाविष्ट आहे.

डब्ल्यूएचओकडून देखील मिठाचं सेवन कमी करण्याचं आवाहन

मार्चच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) लोकांना मिठाचं सेवन कमी करण्यासाठी 'मोठ्या प्रमाणावर प्रयत्न' करण्याचं आवाहन केलं होतं, जेणेकरुन हृदयाच्या समस्या, स्ट्रोक आणि कर्करोगाचा धोका टाळता येईल.

'मिठाचा वापर टाळल्यास सात दशलक्ष जीव वाचू शकतात'

सोडियमचं सेवन कमी करण्याबाबतच्या आपल्या प्रकारच्या पहिल्या जागतिक अहवालात, जागतिक आरोग्य संस्थेने असं नमूद केलं आहे की, 2025 पर्यंत सोडियमचं सेवन 30 टक्क्यांनी कमी करण्याचं जागतिक लक्ष्य गाठण्यासाठी लोक अजून दूर आहेत. अहवालातून असं दिसून आलं आहे की, केवळ 5 टक्के देश मीठाचा वापर करणं टाळत आहे किंवा कमी प्रमाणात मीठ वापरत आहे. तर भारतासह 73 टक्के देशांना अशा धोरणांच्या सक्त अंमलबजावणीची गरज आहे. सोडियम कमी करण्याच्या धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास 2030 पर्यंत जागतिक स्तरावर अंदाजे सात दशलक्ष जीव वाचू शकतात, असं WHO नं म्हटलं आहे.

हेही वाचा:

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

About the author आयएएनएस

आयएएनएस वृत्तसंस्था (Indo-Asian News Service)
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget