एक्स्प्लोर

Dev Diwali 2020 | आज कार्तिक शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच 'देव दिवाळी'; का साजरी करतात?

Dev Diwali 2020 : धार्मिक ग्रंथानुसार देव दिवाळीचा सण दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर साजरा करतात. हा कार्तिक पौर्णिमेचा सण आहे. हा सण वाराणसीत धडक्याने साजरा केला जातो.

Dev Diwali 2020 : आज 29 नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेला 'त्रिपुरारी पौर्णिमा' किंवा 'त्रिपुरी पौर्णिमा' असं म्हणतात. तसेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला 'देव दिवाळी' म्हणूनही संबोधलं जातं. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते. अशी अख्यायिका आहे की, कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला सगळे देव दिवाळी साजरी करतात आणि याच दिवशी देवांनी काशीत प्रवेश केला होता.

धार्मिक ग्रंथानुसार देव दिवाळीचा सण दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर साजरा करतात. हा कार्तिक पौर्णिमेचा सण आहे. हा सण वाराणसीत धडक्याने साजरा केला जातो. जगातील सर्वात जुने शहर काशीची ही संस्कृती आणि परंपरा आहे. हा सण काशीच्या ऐतिहासिक गंगेच्या घाटांवर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात. काशीमध्ये दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याचसोबत देव दिवाळीच्या दिवशी दिपदान करणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. या दिवसाचं विशेष महत्त्व पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. असं मानलं जातं की, या दिवशी सगळे देव पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात.

देव दिवाळीच्या दिवशी दीप दानाचं महत्त्व :

देव दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दीप दान करणं शुभं मानलं जातं. खासकरुन मंदिरांमध्ये दीप दान करण्यात येतं. या दिवशी मंदिरांमध्ये दीप दान करावं, असं थोरामोठ्यांकडूनही अनेकदा सांगण्यात येतं. यामुळे शुभ फळाची प्राप्ती होते. देव दिवाळी कार्तिक मासच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथी रविवारी, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार असून सोमवार 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत असणार आहे.

मातीचे दिवे करा दान

मातीचे दिवे दान करण्याला या दिवशी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी दिवे दान केल्यानं भगवान विष्णु प्रसन्न होतात, असं मानलं जातं. तसेच जीवनात सुख आणि समृद्धि येते. या दिवशी मंदिर, पिंपळाचं झाड, तलावाच्या ठिकाणी दीपदान केलं जातं. परंतु, मंदिरात दीपदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

काशीमध्ये देव एकत्र येतात

पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, या दिवशी काशीमध्ये सर्व देव एकत्र पृथ्वीवर अवतरले होते. त्यांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली होती. यामागे एक कारण होतं, ते म्हणजे, असं सांगण्यात येतं की, देवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाला कंटाळून या राक्षसाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी भगवान शंकराकडे प्रार्थना केली होती. त्यानंतर भगवान शंकराने त्या राक्षसाचा वध केला होता. ज्यामुळे देव अत्यंत प्रसन्न झाले होते. सर्व देव भगवान शंकराची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीमध्ये पोहोचले. त्यांनी काशीमध्ये सर्वत्र दीप प्रज्वलन केलं. आजही ही परंपरा कायम आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आजही येथे दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

Health: कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे कधी थांबवावे? 'ही' धोक्याची लक्षणं, दुर्लक्ष करू नयेत, नेत्रतज्ज्ञ सांगतात...
कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे कधी थांबवावे? 'ही' धोक्याची लक्षणं, दुर्लक्ष करू नयेत, नेत्रतज्ज्ञ सांगतात...
Maharashtra Government: राज्यातील यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रियेच्या रुग्णांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टचा महत्त्वाचा करार
राज्यातील यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रियेच्या रुग्णांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टचा महत्त्वाचा करार
Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
Abhijeet Dipke: 'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
मोठी बातमी ! अहिल्यानगरमध्ये खासगी आरोग्य विद्यापीठ; मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय, खेळाडूंसाठी नवं बक्षिस धोरण
मोठी बातमी ! अहिल्यानगरमध्ये खासगी आरोग्य विद्यापीठ; मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय, खेळाडूंसाठी नवं बक्षिस धोरण
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोन्याच्या दरात 8 हजारांची वाढ, चांदी 10 हजारांनी महागली
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोन्याच्या दरात 8 हजारांची वाढ, चांदी 10 हजारांनी महागली
Karj Mafi 2nd Installment : मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित
मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 5086 कोटी ट्रान्सफर
Rain Update: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
तुकाराम मुंढेंसारखे साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाका; शेतकरी संघटना आक्रमक, साखर 75 रुपये अन् ऊस 3 रु किलो
तुकाराम मुंढेंसारखे साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाका; शेतकरी संघटना आक्रमक, साखर 75 रुपये अन् ऊस 3 रु किलो
Embed widget