Veen Doghantali Hi Tutena Zee Marathi Serial Promo: समर राजवाडे 'बावळट', 'बिनडोक', 'हे सगळं थांबवायला पाहिजे'; तेजश्री प्रधान, सुबोध भावेंच्या मालिकेवर संतापले प्रेक्षक
Veen Doghantali Hi Tutena Zee Marathi Serial Promo: सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत एकापाठोपाठ एक ट्वीस्ट येतायत. स्वानंदी समरचं लग्न झाल्यापासून राजवाडेंच्या घरात कारस्थानांची मालिकाच सुरू झालीय.

Veen Doghantali Hi Tutena Zee Marathi Serial Promo: झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghantali Hi Tutena) सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि सुबोध भावेची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेत तेजश्री स्वानंदीची भूमिका आणि सुबोध भावे समर राजवाडेंची भूमिका साकारतोय. पण, आपल्या सर्वांनाच माहितीय, प्रेक्षक जेवढं प्रेम करतात, तेवढंच चुकल्यावर झोडपूनही काढतात.
सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत एकापाठोपाठ एक ट्वीस्ट येतायत. स्वानंदी समरचं लग्न झाल्यापासून राजवाडेंच्या घरात कारस्थानांची मालिकाच सुरू झालीय. अंशुमनचा पर्दाफाश करण्यासाठी स्वानंदी प्रत्यन करते, पण, अंशुमन आणि त्याची आई स्वानंदीचे सर्व प्रयत्न हाणून पाडतायत.
अंशुमन राजवाडेंच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला (श्वेता) अश्लील मेसेज पाठवतो. हे सगळं श्वेता स्वानंदीला सांगते. स्वानंदी, श्वेताला समरकडे घेऊन जाते आणि तिला अंशुमननं जे काही केलंय, ते सगळं खरं खरं सांगायला सांगते. पण, श्वेता अंशुमनला घाबरते आणि त्याच्या भितीपोटी समरसमोर खोटं सांगते. मला स्वानंदीने अंशुमनचं नाव घ्यायला सांगितलं, असं श्वेता सांगते आणि स्वानंदी सर्वांसमोर खोट्यात पडते. समर स्वानंदीवरच चिडतो आणि दोघांमधील गैरसमजाची दरी आणखी वाढते. पण, स्वानंदी अजिबातच हार मानत नाही. ती अंशुमनचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा निर्धार करते. त्यात ती श्वेता, निकीताची समजूत काढण्याचं ठरवते.
View this post on Instagram
मालिकेत हा एपिसोड रिलीज झाल्यानंतर चाहत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नेटकऱ्यांनी समर राजवाडेला बावळट म्हटलंय, तर काहींनी समर राजवाडे बावळट असल्याचंही म्हटलंय. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मालिकेचा चांगलाच समाचार घेतलाय. 'झी मराठीला टीआरपी कमी होऊ नये असं वाटत असेल तर, हे सगळं थांबवायला पाहिजे', असं एका युजरनं म्हटलंय. तर आणखी एका युजरनं 'फालतुगिरी', अशी कमेंट करत एकाच शब्दात विषय संपवला आहे. 'हा समर खरंच बिनडोक आहे.', 'त्या अर्पिताला स्वतःचा संसार नाही सर्व सोडून आली', असंही काही युजर्स म्हणाले आहेत.























