'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत
Tharala Tar Mag Star Pravah Marathi Serial Track: सायली आणि अर्जुनचा प्रवास प्रेक्षकांनी आपल्या घरातील मुला-मुलींसारखा जपलाय. त्यांच्या प्रत्येक आनंदात प्रेक्षक सहभागी झालेत आणि प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत भावनिकरित्या उभे राहिलेत.

Tharala Tar Mag Star Pravah Marathi Serial Track: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'ठरलं तर मग' मालिकेनं (Tharala Tar Mag Marathi Serial) प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळतोय. सायली आणि अर्जुनचा प्रवास प्रेक्षकांनी आपल्या घरातील मुला-मुलींसारखा जपलाय. त्यांच्या प्रत्येक आनंदात प्रेक्षक सहभागी झालेत आणि प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत भावनिकरित्या उभे राहिलेत. आता प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेत एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेला प्रोमो पाहुन प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.
'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत सर्वात मोठं आणि धक्कादायक वळण येणार आहे. बाळाच्या आगमनाची आनंदमयी तयारी सुरू असतानाच सायलीच्या आयुष्यात वादळ येणार आहे. ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात पोलीस येऊन सायलीला अटक करणार आहेत. अनाथाश्रमातील मुलींची तस्करी केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. आनंदाच्या क्षणात घडणारी ही अनपेक्षित घटना अर्जुन आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणार आहे.
'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारा ट्वीस्ट (Tharala Tar Mag Marathi Serial Tweest)
धक्कादायक ट्विस्टची झलक दाखवणाऱ्या नव्या प्रोमोला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या काही तासांतच प्रोमोनं 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. 350 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. सायलीच्या पाठीशी उभे राहत प्रेक्षकांनी तिच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे आणि पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
'ठरलं तर मग मालिकेला चार वर्ष पूर्ण होतील. या चार वर्षात प्रेक्षकांची साथ मोलाची होती. मालिकेतली एखादी गोष्ट आवडली तर प्रेक्षकांनी पाठ थोपटली. कधी चुकलो तर हक्कानं कान पिळले. मालिकेचा पुढचा प्रवास आता अधिक रंजक होणार आहे. डोहाळ जेवणाच्या दिवशी सायलीला अटक होण्याच्या प्रोमोला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला हे पाहून खूप भारावून गेलेत. प्रेक्षकांना एकच आवाहन आहे अशीच सोबत द्या, अशी भावना जुई गडकरीनं व्यक्त केली आहे.
मात्र, सायली इतक्यात हार मानणाऱ्यांपैकी नाही. स्वतः वरील खोटे आरोप दूर करून सत्य जगासमोर आणण्यासाठी ती खंबीरपणे लढणार आहे. कारण आई होणारी स्त्री केवळ नव्या जीवाला जन्म देत नाही, तर आपल्या बाळाच्या भविष्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाण्याचं बळही तिच्यात असतं. एक आई आपल्या मुलासाठी कोणत्याही वादळाशी दोन हात करू शकते. सायलीचाही हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या बाळाच्या सुरक्षित भविष्याकरता आणि सत्याच्या विजयासाठी असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















