एक्स्प्लोर

Mayuri Wagh: शारीरिक, मानसिक छळ; पियुष रानडेसोबत लग्न अन् घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली मयुरी वाघ; म्हणाली, 'त्याला सरप्राईज द्यायला मालिकेच्या सेटवर गेले अन्...'

Mayuri Wagh: काही गोष्टी कानावर आल्या होत्या. तेव्हा मी पूर्णपणे प्रेमात होते. आपल्या माणसावर विश्वास ठेवला. एक चान्स दिला. पण जेव्हा गोष्ट माझ्या आई-वडिलांवर आले तेव्हा मात्र निर्णय घेतला.

मुंबई : मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री मयुरी वाघ (Mayuri Wagh) आणि अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade) यांचे लग्न आणि त्यानंतर झालेला घटस्फोट हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘अस्मिता’ मालिकेच्या सेटवर सुरू झालेली त्यांची मैत्री लवकरच प्रेमात बदलली, मात्र हे नातं फक्त दोन वर्षांच टिकलं. अनेक वर्षांनंतर मयुरीने (Mayuri Wagh) पहिल्यांदाच त्या काळातील भावनिक संघर्ष आणि वेदना उघडपणे व्यक्त केल्या आहेत. सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब कार्यक्रमात मयुरीने स्पष्टपणे सांगितले, “आज मला काहीच गोष्टींचा पश्चात्ताप नाही, पण लग्नाचा निर्णय थोडा घाईत घेतला, असं आता जाणवतं. आजच्या मुली लग्नाआधी जोडीदाराबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल आणि आर्थिक स्थैर्याबद्दल विचार करतात, पण मी तसं काही केलं नाही. तो एक प्रवाह होता, आणि त्यातच मी वाहत गेले.” तिने पुढे सांगितले, “आई-वडिलांनी माझा निर्णय मान्य केला, पण कदाचित त्यांच्या मनात शंका होती,” असंही ती म्हणाली.(Mayuri Wagh) 

Mayuri Wagh: ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला, ती व्यक्ती...

मयुरी पुढे म्हणाली की, सहा महिन्यांत तिला जाणवलं होतं की, तिचा लग्नाचा निर्णय चुकला आहे. पण, तिला ते स्वीकारायला खूप वेळ लागला. माझ्या आई-बाबांना ४ महिन्यांत समजले होते की, हे सगळं चुकलंय. पण, ही गोष्ट मला समजायला जवळजवळ दीड वर्षे लागली, ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला, ती व्यक्ती हे करू शकत नाही, हे समजायला मला खूप वेळ लागला. या कठीण काळात 'ती फुलराणी' नाटकाचे शूटिंग सुरू होतं, सेटवरच्या सहकलाकारांनाही तिच्या आयुष्यात काहीतरी गडबड सुरू असल्याचे जाणवत होतं असंही तिने यावेळी बोलताना सांगितलं. मयुरी पुढे म्हणाली, "मी खूप डिस्टर्ब असायचे. सीन संपला की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे, हे त्यांना दिसायचं. अनेकदा पहाटे दोन-तीन ते चार वाजेपर्यंत ते सगळे माझ्यासाठी थांबायचे, कारण तेव्हा मला झोप लागायची नाही."

Mayuri Wagh: मी घरात मासे आणून ठेवले होते आणि त्यांच्याशी बोलायची

मुलाखतीवेळी मयुरीला पियुषसोबतच्या लग्नामध्ये शारीरिक छळ झाला का? या प्रश्नावर, तिने 'हो' असे उत्तर दिले. कोरोना काळात ती एकटी राहायची, तेव्हा तिच्या आईला तिची खूप काळजी वाटायची. ह्या सगळ्या विचारातून बाहेर पडायला मला सहा महिने लागले. मी घरात मासे आणून ठेवले होते आणि त्यांच्याशी बोलायची, कारण मी आई-वडिलांना काही सांगू शकत नव्हते, असंही ती म्हणाली, "जेव्हा मला रिअॅलिटी चेक मिळाला, तेव्हा मी ठरवलं आता कुणावर विश्वास ठेवायचा नाही असं तिने ठरवलं आणि निर्णय घेतला, असंही तिने सांगितलं."

Mayuri Wagh: कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये

'मला आता कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये. पण, मी लग्नाचा निर्णय खूप लवकर घेतला असं मला वाटतं. कारण, मी आताची पिढी पाहते, लोक खूप विचार करून लग्न करतात. हे मी केलं नाही…पण, आताच्या मुली फार सॉर्टेड आहेत. एक एक्स अमाऊंट पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं घर असायला पाहिजे, कुटुंबात या गोष्टी पाहिजेत हे अलीकडच्या काळात लग्न करताना पाहिलं जातं. पण, माझ्या बाबतीत असं झालं नाही. तो एक प्रवाह होता आणि त्यातच मी लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनी सुद्धा या निर्णयात माझी साथ दिली. त्यांना त्यावेळी कदाचित हे सगळं पटलं नसेल. पण, तरीही त्यांनी पाठिंबा दिला. सहा महिन्यांतच जाणवलं होतं आपला लग्नाचा निर्णय चुकला पण, मला ते कळायला आणि स्वीकारायला खूप वेळ लागला.' असंही मयुरीने पुढे सांगितलं.

Mayuri Wagh: मी त्याला सरप्राइज द्यायला गेले होते,पण...

तिने एक तीचा अनुभवही सांगितला. ती म्हणाली, मालिका सुरू असताना मी त्याला सरप्राइज द्यायला गेले होते. पण तो मालिकेच्या सेटवरच नव्हता. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. तेव्हाही मी तसं असेलही, असं मनाला समजवलं.

Mayuri Wagh: काही गोष्टी कानावर आल्या होत्या

ती म्हणाली, काही गोष्टी कानावर आल्या होत्या. तेव्हा मी पूर्णपणे प्रेमात होते. आपल्या माणसावर विश्वास ठेवला. एक चान्स दिला. पण जेव्हा गोष्ट माझ्या आई-वडिलांवर आले तेव्हा मात्र निर्णय घेतला. समोरचा व्यक्ती मला बोलत होता, तो पर्यंत ठीक होतं, पण जेव्हा माझ्या वडिलांना बोलला तेव्हा मी ठरवलं की, आता बस्स...त्यानंतर आई-वडील नेहमीच सोबत होते, असंही तिनं सांगितलं.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: तन्वी कोलते फक्त बोलते नाही, प्रॉमिस पूर्णही करते; तन्वीच्या आजीनं प्रभू शेळकेला टीव्ही घेऊन दिला VIDEO
तन्वी कोलते फक्त बोलते नाही, प्रॉमिस पूर्णही करते; तन्वीच्या आजीनं प्रभू शेळकेला टीव्ही घेऊन दिला VIDEO
MIMA 2026: 'मिमा 2026' सोहळा दिमाखात संपन्न! ज्येष्ठ गायक अजित कडकडेंना 'संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार'
'मिमा 2026' सोहळा दिमाखात संपन्न! ज्येष्ठ गायक अजित कडकडेंना 'संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार'
JD Majethia Remarries Wife Nipa: 57 वर्षांचा दिग्गज अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहोल्यावर; सख्खा लेकींनीच दिलीय 'बॅचरल पार्टी' VIDEO
57 वर्षांचा दिग्गज अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहोल्यावर; सख्खा लेकींनीच दिलीय 'बॅचरल पार्टी' VIDEO
Anandi Marathi Serial: 'आनंदी' सारख्या नेत्रहीन प्रेक्षकांसाठी स्टार प्रवाहचा अभिनव उपक्रम, ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग
'आनंदी' सारख्या नेत्रहीन प्रेक्षकांसाठी स्टार प्रवाहचा अभिनव उपक्रम, ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
Nagpur PNG Connection: नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
Nashik Accident News: रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Piyush Mishra: दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
Nashik Accident News : स्नेहसंमेलनाचा आनंद ठरला अखेरचा...; घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू
स्नेहसंमेलनाचा आनंद ठरला अखेरचा...; घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar news: तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
CBSE: मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती, नवीन शिक्षणक्रम जाहीर
मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती, नवीन शिक्षणक्रम जाहीर
Embed widget