![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shreyas Talpade: 'आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊन प्रार्थना केली...'; जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात श्रेयसचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यानं एक आठवण सांगितली आहे.
![Shreyas Talpade: 'आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊन प्रार्थना केली...'; जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक Khupte Tithe Gupte promo Jitendra Joshi tell about shreyas talpade struggle days promo viral social media Shreyas Talpade: 'आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊन प्रार्थना केली...'; जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/09/ac8a39b889c141dd095845eb529b1f081686292952682259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा हजेरी लावणार आहे. सध्या खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात श्रेयसचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशी ( Jitendra Joshi) हा एक आठवण सांगतो. ती आठवण ऐकून श्रेयस हा भावूक होतो.
खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, जितेंद्र जोशी हा एका व्हिडीओमध्ये श्रेयससोबतची एक आठवण प्रेक्षकांना सांगत आहे. तो म्हणतो, 'श्रेयस, मनामध्ये अनेक भावना आहेत. मला जेव्हा काम नव्हतं तेव्हा सतीश राजवाडे या आपल्या मित्राकडे असिस्टंट म्हणून मला घेऊन जाणारा तुच होतास. मला एक किस्सा आठवतो, जेव्हा तुझ्या आईनं तुला सांगितलं होतं की, आता नोकरी कर या नाटकामध्ये काही होत नाही. तेव्हा आपण दोघे मिळून स्वामींच्या मठात गेलो होतो आणि आपण प्रार्थना केला होती.'
जितेंद्रनं सांगितलेली ही आठवण ऐकून श्रेयस हा भावूक झाला, असं प्रोमोमध्ये दिसत आहे.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये दिसत आहे की, श्रेयस म्हणतो, 'मला एका सीरिअलच्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं. तेव्हा मी बोलायला सुरुवात करणार तितक्यात कॅमेरामन म्हणाला, थांब. प्रॉब्लेम झाला आहे. अर्धा तास गेला तरी कॅमेरा काही केल्या सुरु होत नव्हता. तेव्हा तो कॅमेरामन मला म्हणाला 'पनौती है ये' मला तेव्हा वाटलं असेन मी कादाचित पनौती कारण तेव्हा कामच नव्हतं.'
श्रेयस हा मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. इक्बाल, पोस्टर बॉईज, गोलमाल 3, ओम शांती ओम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यानं 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. श्रेयसच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)