एक्स्प्लोर

12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला...निधनापूर्वी सतीश शाह यांचा सचिन पिळगांवकरांना आलेला शेवटचा मेसेज

ते पुढे म्हणाले, तुम्हाला खरोखर माहीत नसते की तुमच्या सोबत काय घडणार आहे .तुम्ही काहीही भाकीत करू शकत नाही .

Satish Shah last message to Sachin Pilgaonkar: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे जेष्ठ अभिनेते सतीश शहा (Satish Shah) यांचे काल (25 ऑक्टोबर) वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.  किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. जवळपास चार दशक सतीश शाह यांनी हिंदी चित्रपट सृष्टी आणि टेलिव्हिजन जगतात आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. चित्रपट ,नाट्य आणि टीव्ही क्षेत्रात आपल्या विनोद बुद्धी टाइमिंग आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेले सतीश शाह  यांचा मित्रपरिवार ही मोठा होता . सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र व ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . निधनापूर्वी सतीश शाह यांचा सचिन पिळगावकर यांना मेसेज आला होता असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं .

 'आज दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला होता .. '

सतीश शाह यांच्या निधनानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी निधनाच्या बातमीनं मोठा धक्का बसला असल्याचा सांगितलं . ते म्हणाले, "  सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधुला भेटून आली होती .सतीश ने कोणतेतरी गाणे ऐकवले होते .त्यावर मधु आणि सुप्रिया नाचल्या होत्या .सतीश आणि मी नेहमी बोलायचो .मेसेज करायचो .त्याचा मला आजच दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला होता . त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता .पण त्याचा निधनाची अचानक बातमी आली .हे बातमी मुळे मला मोठा धक्का बसला आहे असं सचिन पिळगावकर म्हणाले .

गंमत जंमत मराठी चित्रपटात एकत्र काम

1987 मध्ये आलेल्या गंमत जंमत या मराठी चित्रपटात अभिनेते सचिन पिळगावकर आणि सतीश शाह यांनी एकत्र काम केलं होतं .या चित्रपटादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली . सतीश शाह यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस कसे होते याविषयी सांगताना सचिन पिळगावकर म्हणाले, " गंमत जंमत हा त्यांचा पहिला चित्रपट होता .आम्हाला एकत्र येण्यासाठी एक कारण हवे होते आणि 1987 चा हा चित्रपट ते कारण ठरला .त्यानंतर आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही पण तिथेच आमची चांगली मैत्री झाली "

सचिन आणि मधून नेहमीच खूप मैत्रीपूर्ण होते .आम्ही त्यांना आमच्या सर्व चित्रपटांच्या प्रीमियर मध्ये कायम आमंत्रित करायचो .ते आमच्या पाहुण्यांच्या यादीत कायम असायचे .त्यांच्याशिवाय कधीच काहीही आम्ही साजरे केले नाही .दुर्दैवाने  मधुचि ही तब्येत ठीक नाही .  तिला अल्झायमर आहे . यावर्षी सतीश नाही किडनी प्रत्यारोपण करून घेतले होते .जेणेकरून त्याला मधुची काळजी घेता येईल .तो डायलिसिस वर होता .यापूर्वी त्याची बायपास सर्जरीही यशस्वी झाली होती . " 

ते पुढे म्हणाले, तुम्हाला खरोखर माहीत नसते की तुमच्या सोबत काय घडणार आहे .तुम्ही काहीही भाकीत करू शकत नाही .आनंदी राहणं आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना आनंदी ठेवणं हाच हेतू आहे .जो त्याने केला .तुमची वेळ कधी येईल हे तुम्ही नाही सांगू शकत असेही सचिन पिळगावकर म्हणाले .

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Lock Upp: 52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...
52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget