एक्स्प्लोर

Sanju Rathod : सई ताम्हणकरचा 'गुलाबी साडी'वाल्या संजू राठोडला माझा महाकट्टावर प्रश्न, संजू म्हणाला, नेक्स्ट टाईम कळेलच, धमाल घेऊन येतो!

Sanju Rathod on Abp Majha Mahakatta : संपूर्ण जगाला ज्या गुलाबी साडीने वेड लावलं त्या संजू राठोडने माझा महाकट्टावर दिलखुलास संवाद साधला. 

Sanju Rathod on Abp Majha Mahakatta : प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यामध्ये प्रतीक्षा असते ती केवळ एका संधीची. ती संधी कधी, कुठे आणि कशी दार ठोठावेल हे कोणालाच माहित नसतं. असेच दोन गायक युट्युबवर शिकत त्या दोघांनीही संपूर्ण जगाला वेड लावलं. अगदी सर्वसामान्य गृहिणींपासून ते बॉलीवूडच्या सिनेतारकांपर्यंत गुलाबी साडी (Gulabi Sadi) या गाण्याने सगळ्यांना भुरळ घातली. इतकचं नव्हे तर याच संजूच्या गुलाबी साडी या गाण्यावर अंबानींची वरात देखील थिरकली. त्याच संजू राठोडने (Sanju Rathod) माझा महाकट्ट्यावर दिलखुलास संवाद साधला. 

माझा महाकुट्टासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील हजेरी लावली. त्यावेळी तिने देखील संजूला एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर संजू उत्तर देताना त्याच्या आगमी कामाविषयी देखील भाष्य केलं आहे. तसेच संजूने त्याचा प्रवास देखील माझा महाकट्टावर उलगडला आहे. त्याने त्याच्या आयुष्यात गाणं लिहिण्यास कशी सुरुवात केली याविषयी देखील त्याने सांगितलं आहे. 

गाणं लिहायला कशी सुरुवात केली?

संजूने यावर म्हटलं की, गुलाबी साडीच्या आधी माझं एक गाणं आहे नऊवारी साडी, त्याचं 140 मिलियन्स व्ह्युज आहे. गुलाबी साडी ही प्रत्येकीसाठी खास असते. त्यामुळे मी गुलाबी साडीवर गाणं लिहियाचं ठरवलं. मी गाणं आधी कंपोज करतो, मग ते गाणं लिहितो. माझ्या भावाचा विश्वास आहे की, जे पहिल्यांदा बनतं तेच चांगलं होतं. जेव्हा त्याने मला गाणं पाठवलं तेव्हा मी त्यानंतर एका तासामध्ये तयार केलं. पण गाणं बनवायच्या आधी मी तीन ते चार दिवस घेतले, त्यानंतर एका तासामध्ये हे गाणं तयार केलं. 

संजूचा थक्क करणारा प्रवास

संजूने त्याच्या प्रवासाविषयी सांगताना म्हटलं की, मी जळगांव जिल्ह्यामधील धानवड तांडा येथील आहे. संगीताचा वारसा नाही, पण घरी माझे वडील  आणि आजोबा भजन वैगरे करायचे. ते मी ऐकायचो आणि तेव्हा मला वाटलं की, आपणही हेच करावं. माझे बाबा तेव्हा दहावी नापास होते आणि माझ्या गावात माझे वडील सगळ्यात जास्त शिकलेले होते. त्यानंतर चौथीनंतर मला बुलढाण्यात आश्रमात पाठवलं. माझे वडील वेल्डिंगचं काम करतात. सुरुवातीला काय करायचं काहीच माहित नव्हतं. घरच्यांकडूनही खूप पैसे घेतले होते. मी अत्यंत मजेत या क्षेत्रात आलो. पण तेव्हा कळलं की कष्ट काय असतात, नातेवाईक काय असतात. मी इंजिनिअरिंग करत होतो. अशी वेळ आली की, मी घरुन खूप पैसे घेतले होते. म्हणजे एक वेळ अशी आली की, मी मागे वळू शकत नव्हतो.

सईचा संजूला प्रश्न

आमच्या मित्रांना युट्युबवर काही बघत असताना तुझी ओळख झाली. तेव्हा आम्ही एका रात्रीत तुझी सगळी गाणी ऐकली. तुझ्या गाण्यांचं चित्रीकरण हे टेक्निकली खूप जास्त चांगलं आहे,मराठी सिनेमांमध्ये जशी गाणी असतात त्याच्याचसारखी किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात चांगलं तुझं चित्रीकरण असतं हे सगळं कोण बघतं? असा प्रश्न सईने संजूला केला. त्यावर संजूने उत्तर देताना म्हटलं की, जवळपास 99 टक्के भाग हे आम्ही दोघं मिळूनच करतो. गोष्ट, दिग्दर्शन हे सगळं मी सांभाळून घेतो, हे मी सांभाळतो, बाकी सगळं एडिटिंग वैगरे गौरवच सांभाळून घेतो. मग हे चित्रीकरण सगळं कोण पाहतं? असाही प्रश्न सईने विचारला. त्यावर संजूने म्हटलं की,  चित्रीकरणासाठी आम्हाला आमचे मित्रच मदत करतात. आता आणखी काहीतरी आम्ही भन्नाट घेऊन येतोय. 

'आयुष्यात गौरव खूप जास्त महत्त्वाचा'

गौरवविषयी बोलताना संजूने म्हटलं की, गौरव माझ्या आयुष्यात आला तेव्हा सुरुवातीचा असा काळ होता की, दोन वर्ष आम्हाला खायला देखील पैसे नव्हते. आम्हाला रेंटवर राहायला जागा नव्हती, कुणी घर द्यायचं नाही. त्यामध्ये गौरव माझ्यासोबत असायचा. त्याने मला आयुष्यात खूप मदत केली,त्यामुळे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. इंजिनीअरिंगचा अभ्यास हा डोक्याच्या वरुन जायचा, त्यानंतर मग मी ह्या क्षेत्रात आलो. 

संजूचा सुरुवातीचा काळ कसा होता?

संजूने त्याच्या सुरुवातीच्या काळाविषयी बोलताना म्हटलं की, मी जळगांव जिल्ह्यामधील धानवड तांडा येथील आहे. संगीताचा वारसा नाही, पण घरी माझे वडिल आणि आजोबा भजन वैगरे करायचे. ते मी ऐकायचो आणि तेव्हा मला वाटलं की, आपणही हेच करावं. माझे बाबा तेव्हा दहावी नापास होते आणि माझ्या गावात माझे वडिल सगळ्यात जास्त शिकलेले होते. त्यानंतर चौथीनंतर मला बुलढाण्यात आश्रमात पाठवलं. मी दहावीला असताना मला एक मुलगी आवडायची. तिने मला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात एक शायरी होती, जी अत्यंत हास्यास्पद होती. तेव्हापासून मी दोन-चार ओळी लिहायला लागलो. मी तिलाही एक शायरी लिहून पाठवली. मला सुरुवातीला वाटलं की, मी दहावीनंतर मस्त म्हशीवैगरे घेईन, शेती करेन, दुधाचा व्यवसाय करेन असं ठरवलं. 

पुढे त्याने म्हटलं की, मी घरातून पळून जाताना कुणाला कळू नये म्हणून शर्टवर शर्ट, पॅन्टवर पॅन्टवर चढवली. माझी आई तांदळाच्या डब्यात पैसे ठेवायची. मी जळगांववरुन निघालो आणि ट्रेनमध्ये बसलो. ती ट्रेन भुसावळला थांबली. मी बराच वेळ बसून होतो, नंतर मला कळलं की, ती मुंबईवरुन भुसावळला आली होती. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीचे दिवस सीएसटीला झोपायचो. पैसे कसे कमवायचे असा प्रश्न सारखा होता. त्यासाठी मी कर्जावर कर्ज घेत गेलो. जवळपास 15 ते 20 लाख रुपये कर्ज माझ्यावर झालं. युट्युबवर बघून मी गाणं शिकलो. मी सुरुवातीला कॉलेजमध्ये रॅप बोलायचो. माझं ब्रेकअप झालं होतं. तिच्यामुळे रॅप लिहायला लागलो. तिने मला डीच केलं होतं. तेव्हा मी एक रॅप लिहिला होता. तिथून खरी सुरुवात झाली. 

ही बातमी वाचा : 

Arshad Warsi :  दादा कोंडकेंचा फॅन अर्शद वारसी बॉलिवूडमध्ये कसा आला? 'माझा महाकट्टा'वर 'सर्किट'ची कहाणी 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget