'वाक्य संपायच्या आधीच होकार...', 'राजा शिवाजी'मध्ये अभिषेक बच्चनचं कास्टिंग कसं झालं? फक्त म्हणाला, 'माझा भाऊ जर...'
Raja Shivaji Casting: त्याच्या कास्टिंगविषयी सांगताना रितेशने अभिषेकने एका शब्दावर दिलेला होकार आणि त्याच्या झालेल्या कास्टिंग विषयी खुलासा केला.

Raja Shivaji Abhishek Bachchan Vidya Balan casting: छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर आधारित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. 1 मे रोजी ही फिल्म देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा सर्वात मोठा बिग बजेट मराठी चित्रपट मानला जातोय. या चित्रपटातील मराठी व हिंदी कलाकारांच्या कास्टिंगचीही सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) राजा शिवछत्रपतींची भूमिका साकारतोय. तर संजय दत्त, अभिषेक बच्चन,विद्या बालनसह जेनेलिया डिसूझा व अनेक मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रत्येकाच्या कास्टिंगचा अनुभव हा वेगळा आहे. अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या कास्टिंगविषयी सांगताना रितेशने अभिषेकने एका शब्दावर दिलेला होकार आणि त्याच्या झालेल्या कास्टिंग विषयी खुलासा केला. (Raja Shivaji Casting)
अभिषेक बच्चनचं कास्टिंग कसं झालं ?( Abhishek Bachchan)
खरंतर रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची मैत्री सगळ्यांनाच माहित आहे . अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलंय. 'राजा शिवाजी' चित्रपट जेव्हा बनवायला घेतला त्यावेळी रितेशने स्वतःहून अभिषेकला सांगितलं होतं. रितेशने सांगितलं "मी अभिषेक यांना म्हणालो, मी एक फिल्म करतोय. त्यात एक रोल आहे. मला तुम्हाला .... ' एवढा म्हणेपर्यंत ते म्हणाले 'डन '. त्यांनी पुढे विचारलं सुद्धा नाही. 'डन' म्हटल्यानंतर पुढे एवढेच होत की माझा भाऊ डिरेक्ट करतोय आणि मी चित्रपट करणार. त्याने काहीही विचारलं नाही 'किती दिवस काय?' तो एवढाच म्हणाला कुठे यायचंय, कधी यायचंय एवढंच सांगा मी तिथे असेन . आणि खरंच त्या व्यक्तीने तारखा शेड्युल झालेलं उलट -सुलट एका शब्दानेही मला सांगितलं नाही. 'मी पाहिजे ? येतो ' असं होतं. " रितेश म्हणाला.
विद्या बालनचे कास्टिंग कसं झालं ? (Vidya Balan)
रितेशने विद्या बालनच्या कास्टिंग विषयीही सांगितलं. तो म्हणाला ' विद्या बालन यांना मी विचारलं की एक रोल आहे. चित्रपटासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. तुम्ही हा रोल करणार का ? कारण तो रोल तसा बडी बेगमचा आहे. अवघड रोल आहे. मराठा साम्राज्याच्या विरोधातला रोल आहे तो. हा रोल करणार का ? असं विचारल्यानंतर त्यांनी मलाच विचारलं ' हा रोल कोण चांगला करू शकेल असं तुम्हाला वाटतंय? त्यावर मी म्हणालो ' तुमच्याशिवाय हा रोल कोणी चांगला करेल असं मला वाटत नाही ' विद्या म्हणाल्या 'मी करेन' . असं रितेश ने सांगितलं.
View this post on Instagram





















