एक्स्प्लोर

खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण

भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी काल एबीपी माझाशी बोलताना गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपलं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी तिकीट वाटपाचा निर्णय हा भाजपच्या केंद्रीय कोअर कमिटीचा आहे. त्यात आमचा कोणताही संबंध नाही असे म्हटले आहे.

जळगाव : अनेक व्यासपीठावरुन उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत थेट फडणवीस आणि महाजनांचं नाव घेतलं आहे. या दोन्ही नेत्यांमुळेच आपलं तिकीट कापल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला आहे. त्यामुळं भाजपात पुन्हा एकदा फडणवीस विरुद्ध खडसे असं चित्र निर्माण झालं आहे. मात्र गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप होत असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीष महाजन म्हणाले की, नाथाभाऊंना चुकीची माहिती देण्यात आली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत असा कुठलाही विरोध किंवा चर्चा देखील झाली नाही. राज्यात चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित यांना देखील तिकीट मिळाले नाही. कुणीतरी सांगितले म्हणण्यापेक्षा चुकीच्या माहितीच्या आधारे असं बोलणं चुकीचं आहे. याचा सोक्षमोक्ष होणं गरजेचं आहे, असे महाजन म्हणाले. चुकीच्या माहितीच्या आधारे असे आरोप करणे योग्य नाही, मी याबाबत खडसे यांच्याशी बोलेन, असेही महाजन म्हणाले. खडसे यांनी व्यवस्थित माहिती घेऊन चर्चा करावी. कुठंतरी मीटिंगमध्ये चर्चा झाली किंवा आम्ही विरोध केला अशा ऐकीव गोष्टीवरून टीका करू नये. केंद्रीय निवड समितीने या सर्व लोकांचा निर्णय केला आहे. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले.
Eknath Khadse Exclusive | फडणवीस, महाजनांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव जाणीवपूर्वक आखला, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
कोअर कमिटीच्या वतीने केवळ खडसे यांचेच नव्हे तर अन्य दिग्गज नेत्यांचीही तिकीट कापली गेली आहेत. खडसे यांच्या मुलीला तरी तिकीट देण्यात आले होते. आम्ही तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केले हे आरोप चुकीचं असल्याचं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. काय म्हणाले आहेत खडसे स्वतःचं राजकारण सरळ करून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू न देऊन आपलं राजकारण जाणीवपूर्वक संपवण्याचा डाव आखल्याचा खळबळजनक आरोप एकनाथराव खडसे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला होता. मी प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलं आहे. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी माघार घेणाऱ्यातला माणूस नाही. जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे या विचारांचा मी आहे, असेही खडसे म्हणाले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला दिल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. आपल्याला तिकीट न दिल्याने आपल्यासह अजून दहा बारा जागांचं देखील पक्षाचं नुकसान एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या हट्टापाई झाल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. माझ्या आणि जेपी नड्डा यांच्या भेटीत त्यांना सर्व सांगितलं आहे. त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याचं आश्वासन मला दिलं आहे. त्यांच्या भेटीत माझं पूर्ण समाधान झालं असं नाही. मात्र मी भाजपतच आहे आणि भाजपतच राहणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपचं सरकार महाराष्ट्रात निश्चित आलं असतं. मात्र जनाधार असलेल्या निष्ठावानांना तिकीट दिलं नाही. जनाधार नसलेल्या बाहेरच्या उमेदवारांना तिकीटं देण्यात आली. आमच्याच उमेदवाराच्या समोर आमचेच बंडखोर उभे राहिले त्याचा फटका बसला. देवेंद्र फडणवीस एकटे प्रचार करीत फिरले. मात्र राज्यातील नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, गिरीश महाजन या दिग्गज नेत्यांना प्रचार करण्यास सांगण्यात आले नाही. त्यामुळे टीमवर्क उभं राहू शकले नाही त्यामुळे प्रचारावर परिणाम झाला, असेही ते म्हणाले. संबंधित बातम्या एकनाथ खडसे भविष्यात राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसतील, सुधीर मुनगंटीवारांचा दावा  निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार, एकनाथ खडसेंना   Eknath Khadse on Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या निर्मयाचं एकनाथ खडसेंकडून स्वागत  Nagpur | खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधाण, नागपूरात शरद पवारांची घेतली भेट | ABP  Eknath khadse I एकनाथ खडसेंचे तिकीट केंद्रीय नेतृत्वाने कापले - फडणवीस I एबीपी माझा  गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाबाबत खडसेंनी केलेला आरोप खोटा : देवेंद्र फडणवीस  Eknath Khadase I ज्यांना मोठे केले त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती - एकनाथ खडसे I एबीपी माझा 

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News : ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
ABP Majha Top 10, 18 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 18 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget