मनोरंजन सिनेसृष्टी हादरली, प्रसिद्ध खलनायकाचा जगाला अखेरचा निरोप; ह्रदयविकाराच्या झटक्यानं झाले निधन
Actor Kamal Roy Passes Away at 54: मल्याळम अभिनेता कमल रॉय यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन. हृदयविकाराच्या झटक्याने चेन्नई येथे घेतला अखेरचा श्वास.

Actor Kamal Roy Passes Away at 54: मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता कमल रॉय यांचे निधन झाले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने चेन्नई येथे निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सिनेसृष्टीत सक्रीय नव्हते. मात्र, त्यांच्या भूमिका चित्रपटप्रेमींच्या आठवणींमध्ये कोरल्या गेल्या आहेत. कमल रॉय यांच्या निधनानंतर मल्याळम सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
कमल रॉय यांच्या बहिणीही सिनेसृष्टीत सक्रीय
कमल रॉय यांचा जन्म एका प्रतिष्ठित चित्रपट आणि साहित्यिक कुटुंबात झाला आहे. ते प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी, कल्पना आणि कलारंजिनी यांचे भाऊ होते. अभिनय हा त्यांना वारशाने मिळाली होती. परंतु, त्यांनी कधीही त्याचा अभिमान बाळगला नाही. त्यांच्या कुटुंबाची जितकी ओळख जितकी मजबूत होती, तितकीच कमल रॉय यांनी त्यांची कारकीर्द साधेपणाने पुढे नेली. कमल रॉय यांचे आजोबा, सूर्यनाड कुंजन पिल्लै हे मल्याळम साहित्यातील एक प्रमुख व्यक्ती होते. त्यांना आपल्या कारकिर्दीत पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. कमल रॉय यांनी आपल्या करिअरसाठी एक वेगळा मार्ग निवडून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
वयाच्या 54 व्या वर्षी जगाला निरोप
चित्रपटांमध्ये कमल रॉय हे विशेषत: त्यांच्या खलनायक आणि गंभीर भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांची पडद्यावरची उपस्थिती मर्यादित असली तरी, त्यांच्या पात्रांनी उत्तम प्रभाव सोडला. कमल रॉय यांनी आपल्या कारकिर्दीत कल्याण सौगंधिकम, वाचालम, लीडर, द किंग मेकर या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. केवळ चित्रपट नसून, टेलिव्हिजन विश्वातही आपल्या अभिनयाची साथ सोडली. त्यांच्या पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
वैयक्तिक आयुष्यात होचे साधे
वैयक्तिक आयुष्यात कमल रॉय अत्यंत साधेपणाने जगणारे होते. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल, निर्णयांबद्दल आणि पश्चातापाबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांना कायम नशिबाने साथ दिली नाही, असं त्यांनी सांगितल. करिअर घडवत असताना त्यांना बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला होता, असं त्यांनी मुलाखतीतून स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
नात्याला ब्रेक की आणखी काही... युजवेंद्र चहल अन् RJ महवशने एकमेकांना केलं अनफॉलो, नेमकं काय घडलं?..























