Deool Band 2: मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...
Story Behind Casting Mohan Joshi in Deool Band 2: दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मोहन जोशी यांच्या निवडीमागची कहाणी सांगितली.

Mohan Joshi as Swami Samarth in Film Deool Band 2: मोहन जोशी (Mohan Joshi) अभिनीत आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमाच्या पहिल्या पार्टला मिळालेल्या यशानंतर दुसऱ्या पार्टची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे. सिनेमागृहात प्रदर्शित होताच 'देऊळ बंद 2' नं बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं. हा सिनेमा शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नांवर आधारीत आहे. सिनेमाचा विषय गंभीर असल्याकारणाने अनेक प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. या सिनेमात मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे. त्यांनी सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्येही श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेल्या (Entertainment) भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली. नेटकऱ्यांनीही त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. मोहन जोशी यांनी साकारलेली श्री स्वामी समर्थ यांची भूमिका जिवंत वाटते, असं काहींचं म्हणणं आहे. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची या सिनेमासाठी कशी निवड झाली? याबाबत दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी मुलाखतीत माहिती दिली.
मोहन जोशी यांची या सिनेमासाठी कशी निवड झाली? (Pravin Tarde interview about Deool Band 2 casting)
'मटा कट्टा'वर बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, 'आम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारीत सिनेमा करण्याचे ठरवले, तेव्हा आम्हाला केवळ स्वामींसारखा हुबेहूब दिसणारा कलाकार नको होता. त्या भूमिकेचं गांभीर्य पैलू शकेल असा कलाकार होता. अभिनयाची ताकद असलेला, एक कसलेला अभिनेता हवा होता. जेव्हा आम्ही याबाबत विचार करत होतो. तेव्हा संगीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी आम्हाला एक नाव सुचवले. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचं नाव सुचवलं', असं प्रवीण तरडे म्हणाले.
'सिनेइंडस्ट्रीत मोहन जोशी यांची ओळख अत्यंत शिस्तप्रिय अशी होती. चित्रपटाच्या या विषयावर आणि या भूमिकेसाठी आम्हाला त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी सुरुवातीला भीती वाटत होती. पण आम्ही त्यांना भेटायला गेलो. भेटून त्यांना चित्रपटाची स्टोरी सांगितली. तसेच त्यांना भूमिकेविषयीही सांगितलं. भूमिकेविषयी सांगितल्यानंतर मोहन जोशी यांनी आम्हाला एकच प्रश्न विचारला'.
'मी स्वामी समर्थ यांच्यासारखा दिसेन का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर यावर चर्चा झाली. मग त्यांचं मेकअप ट्रायल घेण्यात आलं. मेकअप पूर्ण झालं. मेकअप झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला आरशात पाहिलं. ते स्वत:ला पाहून थक्क झाले. त्याच क्षणी मोहन जोशी यांनी या चित्रपटासाठी आणि या भूमिकेसाठी होकार दिला होता', असं प्रवीण तरडे म्हणाले.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या:
पजामा - टी शर्ट अन् केसांचा बन, घरात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; नेटकरी म्हणाले, आधी घर साफ कर..
ABP माझाच्या बातम्या LIVE..




















