Deool Band 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा एकच जयघोष; प्रदर्शनानंतर अवघ्या 5 दिवसांत कलेक्शन किती?
प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळतील.

Deool Band 2 Box Office Collection: प्रवीण तरडे दिग्दर्शित व लिखित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) चित्रपटाची सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. मुंबई पुण्यात या चित्रपटाचे अनेक शो हाउसफुल होताना दिसत आहेत. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पाच दिवसातच प्रेक्षकांची मन जिंकली. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा झाला. 2.45 कोटी रुपये ओपनिंग डेला कमावल्यानंतर शनिवारी 4.85 कोटी तर रविवारी 5.90 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. भारतभरातील अवघ्या पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने 22.67 कोटी रुपये कमावले. तर भारतातील नेट कलेक्शन 19.24 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे 'देऊळ बंद 2' हा चित्रपट सध्या ब्लॉकबस्टर ठरतोय.
'देऊळ बंद 2' चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन
देऊळ बंद या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या चार दिवसात 17.47 कोटी रुपयांचा कलेक्शन केलं. रविवारी बॉक्स ऑफिसवर 6.10 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. मोहन जोशींची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात स्नेहल तरडे एका शेतकरी महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. शिवाय पहिल्या भागातील अनेक कलाकारांची दुसऱ्या भागातही हजेरी लागली आहे. प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळतील. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, प्रदर्शनानंतर पाचव्या दिवशीपर्यंत या चित्रपटाचे कलेक्शन 22.67 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
View this post on Instagram
देऊळ बंद चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे, अतुल कुदळे, रमेश परदेशी, मोहन जोशी, महेश मांजरेकर, ओम भूतकर ,महेश देसाई, प्रसाद ओक ,सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, जगन्नाथ निवंगुणे आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत.

साधारण दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.आता दुसरा भाग नव्या कथा नखासह प्रेक्षकांसमोर आला आहे..या चित्रपटात एका शेतकरी महिलेचा संघर्ष दाखवण्यात आलाय.दुष्काळ शेतकरी आत्महत्या कर्जबाजारीपणा आणि ग्रामीण भागातील गंभीर वास्तव यावर थेट भाष्य करणारा हा चित्रपट व्यवस्थेला जाब विचारतो. 'मी तुमचं अस्तित्व मान्य करेन, पण तुम्ही आधी परीक्षा द्या ' असा आवाहन करणारी ही हतबल महिला थेट स्वामींना प्रश्न करते.आणि तिथून पुढे सुरू होतो देवाच्या परीक्षेचा हा प्रवास.शेतात दर्यापूर यामध्ये एसटीने माणसांनी खचाखच भरलेल्या गाडीतून या महिलेचा आणि देवाचा प्रवास सुरू होतो.






















