Kiran Mane : "राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Kiran Mane : राजकीय नेत्यांनी कायम एक लक्षात ठेवावे. एकवेळ तुम्ही निष्क्रिय असा, जनता खपवून घेईल...पण खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी खेळू नका, असं म्हणत किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Kiran Mane : अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर ते आपलं मत मांडत असतात. अशातच आता ब्रिजभूषण कारवाईसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चालबाजी केली असल्याचं किरण माने यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. तसेच राजकीय नेत्यांना त्यांनी एक सल्ला दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत,"राजकीय नेत्यांनी कायम एक लक्षात ठेवावे. एकवेळ तुम्ही निष्क्रिय असा, जनता खपवून घेईल...पण खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी खेळू नका."
किरण माने काय म्हणाले? (Kiran Mane Post)
किरण माने म्हणाले,"महिला कुस्तीगीरांनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा', अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पाठवले आहे असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. एक वर्षापूर्वी 31 मे रोजी सोशल मीडियावर ते पत्र पोस्ट केले गेले. ते पत्र प्रचंड व्हायरल झाले होते. "ब्रिजभूषणला आम्ही मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही", असा इशाराही दिला होता. ... हा स्टंट असणार असा संशय काहीजणांना आला. ईडीच्या भितीने घाबरलेले राजजी हे धाडस करणार नाहीत अशी बऱ्याच जणांना खात्री होती. शेवटी माहितीच्या अधिकारात एकाने याविषयी अर्ज करुन विचारणा केली. पंतप्रधान कार्यालयातून असे उत्तर आले की,"राज ठाकरे यांच्याकडून असे कुठलेही पत्र पंतप्रधान कार्यालयाला आलेले नाही. केवढी मोठी चालबाजी होती ही".
View this post on Instagram
किरण माने यांनी पुढे लिहिलं आहे,"सुषमा अंधारेताईंनी काल अणुशक्तीनगर येथे हा पर्दाफाश केला तेव्हा मी तिथे हजर होतो. उपस्थित प्रचंड जनसमुदायातून 'शेSSम शेSSम असा खूप मोठा आवाज येऊ लागला. लोकांना मनापासून या फसवणुकीचे वाईट वाटलेले दिसले. राजकीय नेत्यांनी कायम एक लक्षात ठेवावे. एकवेळ तुम्ही निष्क्रिय असा. जनता खपवून घेईल. पण खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी खेळू नका. आधीच या देशातले सर्वसामान्य नोकरदार, छोटे व्यावसायिक, गोरगरीब मजूर, शेतकरी, कष्टकरी आणि महिला नाडले गेलेले आहेत. जगणं हराम झालंय..त्यात तुम्ही असा थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका".
संबंधित बातम्या
'पॉर्न'वरुन राजकारण गरम, चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर किरण मानेंनी सांगितली 'अंदर की बात'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
