एक्स्प्लोर

Mangesh Desai : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट म्हणजे 'धर्मवीर 2'; निर्माते मंगेश देसाई यांची माहिती

Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाच्या माध्यमातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Mangesh Desai ON Dharmaveer 2 : आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी केली आहे. 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं मंगेश देसाई म्हणाले.

'धर्मवीर 2' या सिनेमाबद्दल बोलताना एबीपी माझाशी बोलताना निर्माते मंगेश देसाई म्हणाले,"अंदाजे नोव्हेंबर महिन्यात 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोन आपले साहेब आहेत. दिघे साहेबांच्या काही गोष्टी 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. पण तरी त्यांच्या अनेक गोष्टी वेळेच्या मर्यादेमुळे सिनेमात दाखवण्यात आल्या नाहीत. या दोन्ही साहेबांचा अजेंडा हा 'हिंदुत्व' होता. त्यामुळे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट 'धर्मवीर 2'मध्ये दाखवण्यात येणार आहे".

'धर्मवीर 2'मध्ये काय पाहायला मिळणार? 

'धर्मवीर 2'मध्ये काय पाहायला मिळणार याबद्दल बोलताना मंगेश देसाई म्हणाले की,"ज्वलंत हिंदुत्वासाठी दिघे साहेबांनी अनेक आंदोलने केली आहे. दिघे साहेबांचं चरित्र दाखवताना दोन भाग नव्हे तर चार भागही पुरणार नाहीत. एवढ्या त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांच्या अनेक गोष्टी दाखवायच्या राहिल्या आहेत. मलंगगड, बाबरी मस्जिद दहावीची सराव परिक्षा दिघे साहेबांनी सुरू केलेली आहे. तसेच निवडणुकीची स्टॅटर्जी ते कशाप्रकारे आखायचे  अशा बऱ्याच मोठमोठ्या गोष्टी या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांचं प्रबोधनदेखील करेल".

'धर्मवीर' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. त्यात कोणी हिंदुत्व न मानणाऱ्यांसोबत गेलं तर कोणी बाळासाहेबांच्या विचारावर ठाम राहिलं आणि वेगळा मार्ग निवडला. तरी आमचंच हिंदुत्व खरं, असं तेही आणि हेही म्हणतात. त्यामुळे आता 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या माध्यमातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट जाणीवपूर्वक स्पष्ट करणार आहात का? याबद्दल बोलताना मंगेश देसाई म्हणाले,"राजकारण आणि सिनेमा हे दोन्ही माझ्यासाठी वेगवेगळे भाग आहेत. 'धर्मवीर' सिनेमा बनवताना माझा कोणताही अजेंडा नव्हता. मनोरंजनसृष्टीतला एक निर्माता म्हणून मी या सिनेमाची निर्मिती केली आहे. बऱ्याच गोष्टी योगायोगाने घडत असतात. त्यातली ही योगायोगाने घडलेली गोष्ट आहे. पण साहेबांच्या ज्या गोष्टी दाखवायच्या राहिल्या आहेत. त्या दाखवण्याचा प्रयत्न 'धर्मवीर 2' मध्ये करण्यात येईल. दिघे साहेबांच्या प्रत्येक कृतीत हिंदुत्वाची जोड आहे आणि हीच जोड आता भाग दोन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत". 

दिघे साहेब म्हणजे उत्साह : मंगेश देसाई

दिघे साहेबांकडे कसे पाहता याबद्दल बोलताना मंगेश देसाई म्हणाले,"दिघे साहेब म्हणजे उत्साह. प्रत्येकवेळेस दिघे साहेबांबद्दल बोलताना अंगावर काटा येतो. मी त्यांना एक शक्ती म्हणून घेतो. आनंद दिघे साहेबांकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोन हा शक्ती, उत्साह, निश्चय आणि आत्मविश्वास आहे. आनंद दिघे साहेबांसोबत माझी दोनदा भेट झाली आहे. माझं 'जाऊबाई जोरात' हे नाटक पाहायला दिघे साहेब आले होते. त्यानंतर माझ्या एका मित्राच्या दुकानाच्या ओपनिंगला दिघे साहेब आले होते. 

संबंधित बातम्या

Dharmaveer 2 : "उलगडणार साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..."; प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांनी केली 'धर्मवीर-2' ची घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधाननं 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून घेतला ब्रेक, पोहोचली 'या' ठिकाणी, पोस्ट शेअर करत म्हणाली...
तेजश्री प्रधाननं 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून घेतला ब्रेक, पोहोचली 'या' ठिकाणी, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Sayani Chakraborty: रोहिणी पाराध्येनंतर आणखी एका इन्फ्ल्युएंसरनं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या खोलीतच जीवन संपवलं, कारण...
रोहिणी पाराध्येनंतर आणखी एका इन्फ्ल्युएंसरनं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या खोलीतच जीवन संपवलं, कारण...
Gautami Patil: गौतमी पाटील अन् भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; 'हिल पोरी हिला' गाण्यात झळकणार, रिलीज डेटही समोर
गौतमी पाटील अन् भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; 'हिल पोरी हिला' गाण्यात झळकणार, रिलीज डेटही समोर
Deool Band 2: स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?
स्वामींची कृपा अपरंपार; 11 व्या दिवशी 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
Embed widget