एक्स्प्लोर

सलमानला शिक्षेपर्यंत पोहोचवणारा बिष्णोई समाज कोण आहे?

या खटल्यात सलमान खानला शिक्षा देण्यात बिष्णोई समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवलं. त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला. तर या प्रकरणातील इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात सलमान खानला शिक्षा देण्यात बिष्णोई समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बिष्णोई समाज कोण आहे, ते पाहूया 29 नियमांचं पालन करणारा बिष्णोई समाज खरंतर बिष्णोई समाज 29 नियमांचं पाल करतो. 29 नियमांचं पालन करत असल्यानेच बिष्णोई शब्द 20(बीस) आणि 9(नौ) बनतो. 1485 मध्ये गुरु जम्भेश्वर भगवान यांनी बिष्णोई समाजाची स्थापना केली होती. हा समाज वन्यजीवांना आपल्या कुटुंबाप्रमाणेच मानतो आणि पर्यावरण संरक्षणात या समाजाचं योगदान मोठं आहे. या समाजाचे लोक जाती-पातीवर विश्वास ठेवत नाहीत.त्यामुळे हिंदू किंवा मुस्लीम दोन्ही धर्मातील लोक त्याचा स्वीकार करतात. सर्वच जाती-धर्माचे लोक या समाजाची दीक्षा घेतात. महिला हरिणांच्या पाडसांना स्वत:च दूध पाजतात सलमानला शिक्षेपर्यंत पोहोचवणारा बिष्णोई समाज कोण आहे? बिष्णोई समाजाची महिला हरिणांच्या पाडसांना आपल्या मुलांसारखंच मानतात. हा समाज राजस्थानच्या मारवाडमध्ये आहे. निसर्गावर, विशेषत: हरिणावर या गावात अतोनात प्रेम केलं जातं. महत्त्वाचं म्हणजे पुरुषांना जंगल परिसरात एखादं हरिण किंवा हरिणाचं पाडस दिसलं तर ते त्यांना घरी घेऊन येतात. स्वत:च्या मुलांप्रमाणे त्यांची सगळी कामं करतात. इतकंच नाही तर महिला हरिणांच्या पाडसांना स्वत:चं दूध पाजतात. एका आईचं कर्तव्य त्या पार पाडतात. मागील 500 वर्षांपासून या समाज ही परंपरा पाळत आहे. चिपको आंदोलनाची ठिणगी हा समाज पर्यावरण प्रेमी आहे. 1736 साली जोधपूर जिल्ह्याच्या खेजडली गावात बिष्णोई समाजाचे 300 हून जास्त लोकांनी वृक्ष वाचवण्यासाठी आपले प्राण दिले. राजाच्या दरबारातील लोक या गावातील झाडं कापण्यासाठी आले होते. पण विरोध म्हणून या समाजाच्या लोकांनी झाडांना मिठी मारली. या समाजाच्या 300 पेक्षा लोकांना शहीदाचा दर्जा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या नायिका अमृता देवी, ज्यांच्या नावावर आजही राज्य सरकार अनेक पुरस्कार देतं. सलमानला शिक्षेपर्यंत पोहोचवणारा बिष्णोई समाज कोण आहे? जोधपूर, बीकानेरमध्ये समाजाची मंदिरं राजस्थानमध्ये जोधपूर आणि बीकानेरमध्ये या समाजाची मंदिरं मोठ्या प्रमाणात आहेत. मुकाम नावाच्या ठिकाणी या समाजाचं मुख्य मंदिर आहे. इथे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या आमावस्येला मोठी जत्रा भरते, जिथे हजारो लोक सहभागी होतात. काळवीटाच्या शिकारीवर बंदी सलमानला शिक्षेपर्यंत पोहोचवणारा बिष्णोई समाज कोण आहे? काळवीट भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळणारी हरिणाची एक प्रजात आहे. काळवीट मुख्यत: भारतात प्रमाणात आढळतात. तर बांगलादेशमधून ही प्रजात नामशेष झाली आहे. 20व्या दशकात अवास्ताव शिकार, वृक्षतोडीमुळे काळवीटांच्या संख्या वेगाने घटली. भारतात 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायदा I अंतर्गत काळवीटाच्या शिकारीवर बंदी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
Eetha Film Viithabai Narayangaonkar: 'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget