एक्स्प्लोर
राज ठाकरेंच्या टीकेला अक्षय कुमारचं उत्तर
‘राज ठाकरेंनी कॅनडाच्या नागरिकत्वावरुन केलेल्या टीकेबद्वदल मला वाईट वाटले नाही. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे’

मुंबई : ‘राज ठाकरेंनी कॅनडाच्या नागरिकत्वावरुन केलेल्या टीकेबद्वदल मला वाईट वाटले नाही. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे’, अशा शब्दात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात तो बोलत होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन टीका केली होती. मात्र, तेव्हा अक्षयने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आजच्या पुरस्कार सोहळ्यात त्याने आपल्या प्रकट मुलाखती दरम्यान राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, यावेळी अक्षयने आपण जे काही आहोत ते महाराष्ट्रामुळेच अशी प्रांजळ कबुलीही दिली. ‘मी आजपर्यंत जे काही कमावलेय ते महाराष्ट्रामुळे. मी महाराष्ट्रामुळे इथपर्यंत पोहोचलोय’ असंही यावेळी अक्षय म्हणाला.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















