एक्स्प्लोर

Milind Gawali: "रागावणं, चिडणं किंवा शिवीगाळ करणं याने मला..."; मिलिंद गवळी यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. मिलिंद हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या भेटीस येतात. तसेच मिलिंद हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. नुकतेच मिलिंद गवळी यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “आनंद”, प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या असतात,काही ना खाण्यापिण्यामध्ये खूप आनंद मिळतो. माझा एक मित्र आहे, खास एखाद्या हॉटेलमध्ये एखादी डिश अतिशय चांगली मिळते म्हणून खूप लांबचा प्रवास करून तिथे जाऊन तो पदार्थ खातो, काही जण असे असतात की खाण्यापेक्षा त्यांच्या खाण्यावरच्या चर्चा करायला खूप आवडतं,काहींना तर झोपण्यामध्ये आनंद मिळतो, अगदी अभिमानाने सांगतात की "आज साडेबारा-एक वाजता उठलो आणि मग नाश्ता केला. काहीना मोबाईल गेम्स खेळण्यात, वाचन लिखाण सिनेमा पाहायला, काही ना प्रवास करण्यामध्ये आनंद मिळतो, काही जणांना गाण्यांमध्ये आनंद मिळतो.काहीं ना निसर्गाच्या सानिध्यात आनंद,माझं असं लक्षात आलं आहे की आनंद हा आपल्याच मानण्यामध्ये असतो,माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये मला काही छान आनंदी माणसं भेटली होती, जी काही कारण नसलं तरी आनंदी असायची, सदैव प्रसन्न असायची, दोन पैसे कमी असतील त्यांच्याकडे पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कमी व्हायचं नाही, त्यांना भेटलं की आपोआपच आपल्याही चेहऱ्यावर एक स्मितहास्य यायचं,माझ्या वडिलांना दुसऱ्यांना मदत करान्यात फार आनंद मिळतो, दुसऱ्याला आपली गरज आहे आणि त्यांना मदत करण्यात आनंद मिळतो आणि ते प्रसन्न होतात. ते पोलीस खात्यात होते त्यावेळेला त्यांचा गैरफायदा घेणारे असंख्य लोक होते, आम्हाला ते जाणवायचं की हा माणूस त्यांचा गैरफायदा घेतो आहे, पण त्याचं त्यांना कधीच काही वाटलं नाही, आपल्याकडे मदत मागायला आलाय आणि आपण त्याला प्रामाणिकपणे मदत करावी एवढेच त्यांना माहीत होतं.त्यामुळे ते सतत प्रसन्न आणि आनंदी राहतात, कारण मनामध्ये काही कपटच नसतं."

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "प्रामाणिकपणे काम करत राहणे यात जो आनंद आहे तो आनंद कशातच नाही असं त्यांना वाटतं, मी कसा जरी असलो तरी माझ्या आई-वडिलांचे काही अतिशय चांगले गुण माझ्यामध्ये थोडीफार उतरलेले आहेत, कदाचित त्यामुळेच इतकी वर्ष मी या क्षेत्रामध्ये मी तरलोय.आनंदी प्रसन्न माणसं सगळ्यांनाच आवडतात असतात, पण रागावणाऱ्या माणसांपासून लोक थांब पळत असतात,रागावणं चिडणं किंवा शिवीगाळ करणं याने मला असं वाटतं त्याने आपल्याच शरीरामध्ये बिघाड होतो, त्यांचं स्वतःचं शरीराचे इंजिन तापल्यामुळे लवकर बंद पडायची शक्यता असते, याउलट आनंदी माणूस खूप निरोगी आणि energetic आयुष्य जगतो.मला फोटो काढायला आणि काढून घ्येण्यात आनंद मिळतो."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेतील ईशा ही भूमिका अपूर्वा गोरे  ही साकारते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Milind Gawali: 'आज माझी आई असती...'; मिलिंद गवळींनी दिला आठवणींना उजाळा, शेअर केली पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
Embed widget