एक्स्प्लोर

Abhishek Bachchan on Raja Shivaji VFX Trolling:‘राजा शिवाजी’चे VFX पाहून नेटकऱ्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया, अभिषेक बच्चनचे सडेतोड उत्तर

'राजा शिवाजी ' चित्रपटात संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारणाऱ्या अभिषेकने या ट्रोलिंगला फटकारत दिदर्शक रितेश देशमुखची बाजू घेतलीय.

Abhishek Bachchan on Raja Shivaji VFX:  रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. 100 कोटी रुपयांचा सर्वात मोठा मराठी चित्रपट, बॉलीवूड आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांची तगडी फौज, संगीत, व्हीएफएक्स अशा अनेक कारणांनी या चित्रपटाविषयी बोललं जातंय. बॉक्स ऑफिस वरही हा चित्रपट दमदार कमाई करताना दिसतोय. बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांना घेऊन केलेले आहे या चित्रपटाच्या VFX वरून सध्या सोशल मीडियावर वाद सुरूय. अनेक जण या चित्रपटाच्या व्हीएफएक्सची तुलना हॉलिवूडची करत आहेत. अनेकांनी चित्रपटावर ट्रॉलिंग सुरू केल्यानंतर या सगळ्या प्रकारावर अभिनेता अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया देत भारतीय सिनेमांची तुलना हॉलीवुड सिनेमांशी करणे योग्य नसल्याचे म्हटले. 'राजा शिवाजी ' चित्रपटात संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारणाऱ्या अभिषेकने या ट्रोलिंगला फटकारत दिदर्शक रितेश देशमुखची बाजू घेतलीय. त्याची ही प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.

राजा शिवाजी VFX वरून ट्रोल 

राजा शिवाजी हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करत आहे. विशेषतः चित्रपटातील व्हीएफएक्स, कलर ग्रेडिंग आणि काही कलाकारांच्या कास्टिंगवरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्रेलर आणि काही दृश्ये पाहिल्यानंतर अनेकांनी एक्स आणि इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया देत चित्रपटावर टीका केली.

एका युजरने पोस्ट करत लिहिले, “मराठी चित्रपटांना बजेटची समस्या असते हे माहिती आहे, पण ‘राजा शिवाजी’मधील व्हीएफएक्स अक्षरशः बनावट वाटतात. काही दृश्ये चांगली आहेत, पण खूपच कमी. फक्त अजय-अतुल यांचं संगीतच चित्रपटाला उभं करतं.”  दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “ट्रेलरमध्ये भव्यतेची कमतरता जाणवते. कमजोर व्हीएफएक्समुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो प्रभाव जाणवत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाला अभिषेक बच्चन ?

अलीकडेच न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला ' सामान्य प्रेक्षकांना कदाचित माहीत नसेल, पण व्हीएस एक्स ही अतिशय बारकाईने केलेली कला आहे. तुम्ही जितका अधिक वेळ द्याल तितकं काम उत्तम होतं. त्यात जितका पैसा गुंतवाल तितकी गुणवत्ता वाढते. पण लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी हा मराठी चित्रपट अत्यंत मर्यादित बजेटमध्ये तयार केलाय. ' त्याने पुढे सांगितलं ' हॉलीवुड स्टुडिओ केवळ व्हीएफएक्ससाठीच हजारो कोटी रुपये खर्च करतात. भारतीय सिनेसृष्टी तेवढी मोठी नाही. त्यामुळे अशा पातळीवर स्पर्धा करणे शक्य नाही ' असं तो म्हणाला.

'एका टप्प्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो ... '

अभिषेकने भारतीय आणि हॉलीवुड चित्रपटांच्या बजेट मधला मोठा फरक अधोरेखित करत सांगितलं ' भारतीय चित्रपट हे हॉलिवूडच्या व्हीएफएक्स बजेटच्या कदाचित एक टक्क्यांएवढ्या बजेटमध्ये काम करतात. गुणवत्ता ही वेळ आणि पैशांशी जोडलेली असते. ' रितेश देशमुखच्या निर्माता आणि दिग्दर्शक या दुहेरी जबाबदारीचाही त्याने उल्लेख केला . तो म्हणाला ' एका टप्प्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो की अजून किती वेळ काम सुरू ठेवायचं. जर दहा वर्षांचा वेळ द्यायचा ठरवला तर परिणामही तेवढाच अप्रतिम येईल. पण भारतात इतका वेळ आणि पैसा खर्च करणे शक्य नसतं '

राजा शिवाजी चित्रपटाच्या VFX वर सोशल मीडियावर टीका होत असतानाही या चित्रपटाच्या कथानकावर पूर्णपणे विश्वास असल्याचे अभिषेकने सांगितलं. तो म्हणाला ' हा चित्रपट मुळात भावनांचा प्रवास आहे आणि त्यात तो यशस्वी ठरतो. VFXवरील टीका काळानुसार विसरली जाईल. पण या चित्रपटाने त्याचा उद्देश पूर्ण केला का ?कथा प्रभावीपणे मांडली का ? याचे उत्तर नक्कीच हो असं आहे. ' असं अभिषेक बच्चन म्हणाला.

'राजा शिवाजी'मध्ये बॉलीवूडकरांची तगडी फौज

राजा शिवाजी हा चित्रपट जिओ स्टुडिओ आणि मुंबई फिल्म कंपनी यांच्या निर्मितीतून तयार झाला आहे. चित्रपटात रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री पटवर्धन, फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, अमोल गुप्ते, जेनेलिया देशमुख यांसारख्या दिग्दज कलाकारांची तगडी फौज आहे. विशेष म्हणजे सलमान खानही या चित्रपटात खास भूमिकेत दिसलाय.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget