एक्स्प्लोर

Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!

मुंबईमध्ये मोर्चा आल्यानंतर शिंदे यांनी सांगितलं जा, दिलं आरक्षण तुमच्या हातात तरी आहे का? राज्याच्या हातात तरी आहे का अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांनी फटकारले.

Raj Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वाधिक मराठवाड्यामध्ये तापला असतानाच आणि मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर मराठवाड्यामध्ये किती फटका देणार याची चर्चा रंगली असतानाच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला हात घालत हे न शक्य नसल्याचं पुन्हा एकदा सांगितले. लातूरमध्ये आज राज ठाकरे यांची मनसे उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी रेनापुरात बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांसह निविरोधकांसह हल्लाबोल केला. 

मग आजपर्यंत आरक्षण का मिळालं नाही? यांना कोणी अडवलं?

राज ठाकरे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने इतिहास सांगताना म्हणाले की, मुंबईमध्ये 1999 मध्ये पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी मोर्चा आला होता. या मोर्चामध्ये कोण कोण होतं हे मला आजही आठवतं. त्यावेळी विधिमंडळ अधिवेशन सुरू होते. व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेची लोकं गेली होती. या सर्वांनी मराठा आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. मग आजपर्यंत आरक्षण का मिळालं नाही? यांना कोणी अडवलं? अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की एकाचवेळी चौघांनी आरक्षण देणार सांगितले होते,तर ते का दिले गेले नाही? या सर्व घडामोडींना वीस पंचवीस वर्ष झाली आहेत, आतापर्यंत यांनी फक्त झुलवण्याचं काम केलं असल्याचं आरोप देखील राज ठाकरे यांनी केला.

तुमच्या हातात तरी आहे का? 

मुंबईमध्ये मोर्चा आल्यानंतर शिंदे यांनी सांगितलं जा, दिलं आरक्षण तुमच्या हातात तरी आहे का? राज्याच्या हातात तरी आहे का अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांनी फटकारले. तमिळनाडूमध्ये आरक्षण दिले गेलं, पण तो विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून त्यावरती कोणताही निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. जी गोष्ट घडू शकत नाही त्यासाठी आपण भांडत आहोत. आपल्या साधून संतांनी ही आपल्याला शिकवण दिली आहे का? अशी त्यांनी विचारणा केली. मराठवाडा हा हिंदुत्वाने भारावलेला होता. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महान संत शरदचंद्र पवार यांनी हिंदुत्वाच्या गोष्टी कशा छाटायच्या याचा विचार सुरू केला आणि महाराष्ट्र जाती जातींमध्ये विभागला गेल्याची टीका राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली. जात प्रत्येकालाच प्रिय असते त्यामध्ये गैर काहीच नाही. मात्र दुसऱ्या जाती बद्दल द्वेष सुरू होतो ते वाईट असतं, असे त्यांनी सांगितलं. शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याकडे लक्ष नाही. तरुण शेतीकडे वळत नाहीत, कृषी विद्यापीठे थंडगार पडली आहेत. आत्महत्यांवर अभ्यास होत नाही. महिला तरुणींचे प्रश्न आहेत. महिलांना पळवून नेण्याचे सर्वाधिक प्रमाण मराठवाड्यामध्ये आहे, असा महाराष्ट्र कधीच नव्हता, अशी खंत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. 

जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हाच मी सांगितलं

तत्पूर्वी, राज ठाकरे म्हणाले की त्यानंतर जिल्हा जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले. अत्यंत शिस्तबद्ध निघालेले मोर्चे मी महाराष्ट्राचे इतिहासामध्ये असे कधीच पाहिले नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मात्र त्या मोर्चाचं काय झालं? का आरक्षण मिळालं नाही अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. ते म्हणाले की मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणाला बसले. आता पहिल्यांदा निवडणूक लढवणार म्हणाले, त्यानंतर आता पाडणार म्हणत आहेत. मात्र आरक्षण कसे देणार आहात ते सांगा हे मी विचारपूर्वक बोलत असल्याचा राज ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणावर फक्त झुलवण्याचं काम होत आहे. अशा प्रकारे आरक्षण मिळू शकत नसल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हाच मी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली होती. हा किचकट आणि तांत्रिक विषय असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यासाठी लोकसभेमध्ये कायदा बदलावा लागेल सुप्रीम कोर्टातून आदेश घ्यावा लागेल आणि एकट्या महाराष्ट्रासाठी, एका जातीसाठी या सर्व गोष्टी केल्यास प्रत्येक राज्यातील इतर जाती सुद्धा उठून बसतील आणि ते परवडणार नाही. हे होणार नाही हे प्रत्येक पक्षातील नेत्याला माहित असल्याचं ते म्हणाले. जर कोणी आरक्षण देतो म्हणाला तर पहिल्यांदा कस देणार हे पहिल्यांदा विचारा, असे राज ठाकरे यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget