एक्स्प्लोर

Satej Patil : 'सतेज' वाटचालीत कोल्हापूर उत्तरमध्ये बंटी पाटलांचा स्वकियांनीच आठ दिवसात दोनदा पाय ओढला! ज्यांच्या घरात दोनदा आमदारकी दिली ते सुद्धा शिंदे गटात

ज्या पाटलांनी कोल्हापूरच्या जागावाटपामध्ये 10 पैकी पाच जागा काँग्रेससाठी खेचून आणल्या होत्या आणि त्यांच्या विजयाची सुद्धा जबाबदारी घेतली होती त्याच पाटलांचा स्वकीयांनीच पाय ओढल्याचे दिसून आले.  

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापुरात उत्तरच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व कलाटणी आठ दिवसात दोनदा मिळाली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा सर्वाधिक तापलेला आणि सर्वाधिक उत्कंठा लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार? इथंपासून सुरू झालेल्या प्रवास ते दोनदा उमेदवार देऊनही काँग्रेसकडे अधिकृत उमेदवार नाही आणि शेवटी ज्याची उमेदवारी रद्द केली त्यालाच पाठिंबा देण्याची वेळ अशी स्थिती काँग्रेसची कोल्हापूर उत्तरला झाली आहे. 

कार्यालयावर दगडफेकीपासून घटनाक्रमाला सुरुवात 

या मतदारसंघांमध्ये महायुतीने महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणी उमेदवारीवरून वाद रंगला होता. महायुतीमधून पहिल्यांदा राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना त्यांना सुद्धा शिंदे गटाच्या पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ते मुंबई गाठीभेटी करत आपली उमेदवारी निश्चित केली. दुसरीकडे काँग्रेसकडून राजेश लाटकर सारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये काँग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला. उमेदवारी जाहीर झाली त्याच रात्री काँग्रेस कमिटी कार्यालयावर हल्ला करण्यात आला. दगडफेक करून काळं फासण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आणि चव्हाण पॅटर्न असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसच्या 26 माजी नगरसेवकांनी हा लादलेला उमेदवार म्हणत राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आणि आमदार सतेज पाटील यांना पत्र लिहिले. या पत्रावर माजी 26 नगरसेवकांच्या सह्या होत्या. यामध्ये व सतेज पाटील यांचे खंदे समर्थक शारगंधर देशमुख, सचिन चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांचा सुद्धा समावेश होता. 

राजेश लाटकरांची बंडखोरी, काँग्रेसमध्ये टेन्शन

त्याच दिवशी कोल्हापूरपासून ते पार दिल्लीपर्यंत पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडल्या आणि राजेश लाटकर यांच्या उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय झाला आणि ऐनवेळी मधुरिमाराजे छत्रपती यांची उशिरा उमेदवारीची घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या तीन मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीचा वाद मिटला असं दिसून येत होतं. मात्र, राजेश लाटकर यांनी उमेदवारी जाहीर झालेली नाकारल्याने बंडाचा झेंडा फडकावला. त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजेश लाटकर यांची मनधरणी सुरू होती. मात्र, राजेश लाटकर यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आज (4 नोव्हेंबर) उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा राजेश लाटकर यांच्या घरी सतेज पाटील जाऊन पोहोचले. मात्र राजेश लाटकर त्यापूर्वीच घरातून निघून गेले होते आणि ती नाॅटरिचेबल असल्याने ते अर्ज माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झालं. 

समजून घालूनही राजेश लाटकरांचा बंडाचा पवित्रा

दुसरीकडे रविवारी सुद्धा छत्रपती कुटुंबाकडून राजेश लाटकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे आदींनी जाऊन राजेश लाटकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, षड्यंत्र रचून माझी उमेदवारी रद्द करण्यात आली, असा आरोप राजेश लाटकर यांनी केला. आज दिवसभर राजेश लाटकर यांची उमेदवारी माघार घेतली जाईल अशी चर्चा असतानाच थेट दुपारी अर्ज माघारीवेळी पंधरा मिनिटे अभूतपूर्व असा घटनाक्रम कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घडला. छत्रपती कुटुबांचं आगमन झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ सुर झाली. राजेश लाटकर यांची उमेदवारी माघार घेतली जाणार ही चर्चा होते त्याच ठिकाणी मधुरिमाराजे यांनीच अर्ज माघार घेतल्याची बातमी धडकली आणि कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. त्यामुळे दोन उमेदवार जाहीर करून सुद्धा काँग्रेसचा उमेदवारच मतदारसंघामध्ये नाही अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली.

सतेज पाटलांचा राग अनावर 

गेल्या काही दिवसांपासून स्वकीयांचा घटनाक्रम घटनाक्रम पाहिल्यानंतर सतेज पाटील यांचा सुद्धा संताप अनावर झाला. त्यांनी थेट आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. जागावाटपात ज्या पाटलांनी कोल्हापूरच्या जागावाटपामध्ये 10 पैकी पाच जागा काँग्रेससाठी खेचून आणल्या होत्या आणि त्यांच्या विजयाची सुद्धा जबाबदारी घेतली होती त्याच पाटलांचा स्वकीयांनीच पाय ओढल्याचे दिसून आले.  

मधुरिमाराजेंचा पहिल्यांदा नकार, मग एन्ट्री अन् आता तडकाफडकी माघार

विशेष म्हणजे कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटील यांच्या सुद्धा नावाची चर्चा सुरू होती. मात्र कार्यकर्त्यालाच पसंती दिली जाईल असे स्वतः त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे राजेश लाटकरसारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. मात्र, कार्यकर्त्यांनाच कार्यकर्ता नको झाला आहे का? अशी सुद्धा स्थिती राजेश लाटकरांना झालेल्या विरोधाने लक्षात आलं. दुसरीकडे, छत्रपती घराण्यामध्येही दोन महिन्यांपूर्वी उमेदवारी संदर्भात विचारण्यात करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. मात्र, राजेश लाटकर यांच्या उमेदवाराला विरोध झाल्यानंतर लढण्यासाठी पुन्हा होकार दिला आणि आता थेट अर्जच माघार घेतला. कोल्हापूर उत्तरच्या पडद्यामागील घटनांची चर्चा अजूनही होत असताना छत्रपती घराण्याच्या भूमिकेमुळेही आता सतेज पाटील यांचा पाय अडखळल्याचे दिसून येत आहे. 

जाधवांच्या घरात दोनदा उमेदवारी दिली, पण जयश्री जाधव शिंदे गटात

हा घटनाक्रम सुरू असतानाच विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी सुद्धा सतेज पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा न करताच थेट शिंदे गटांमध्ये मुंबईत जाऊन पक्षप्रवेश केला. हा सुद्धा सतेज पाटील यांना धक्काहोता त्याचं कारण 2019 मध्ये सतेज पाटील यांनी आपली स्वतःची यंत्रणा वापरून चंद्रकांत जाधव यांच्यासारख्या उद्योजकाला आमदारकीची संधी दिली. मात्र दुर्दैवाने 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांचे निधन झालं आणि ती जागा रिक्त झाली. त्यानंतर कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीमध्ये 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची करताना राज्य पातळीवरील सर्व नेते कोल्हापुरात आणले. साम, दाम, दंड, भेद वापरत ही जागा कोणत्याही परिस्थितीत भाजप स्वत:कडे खेचण्यासाठी भाजपने यंत्रणा लावली होती. मात्र या यंत्रणेला भेदून सतेज पाटील यांनी जागा काँग्रेसकडे खेचली होती व जयश्री जाधव आमदार झाल्या. त्याच आमदार जयश्री जाधव यांनी 2024 मध्ये मात्र उमेदवारी नाकारण्यात आल्याने आणि मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीला विरोधत थेट शिंदे गटामध्ये प्रवेश केला. ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांनी किमान बोलायला हवं होतं, अशी खंत सतेज पाटील यांनी बोलून दाखवली. त्यामुळे दोनवेळा तोंडावर पडायची वेळ आल्यानंतर त्याचाच परिपाक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सतेज पाटलांच्या रागात दिसून आला. 

लाटकरांची उमेदवारी एकतर्फी झाली का?

राजेश लाटकर यांच्या उमेदवारीमागे सतेज पाटालांचे लोकसभा निवडणुकीतून आलेल्या अनुभवावर बेरजेचं गणित होतं हे दिसून येत होतं. कदमवाडी, सदर बाजार भागातून राजेश लाटकर यांची व्होट बँक आहे. त्यांनी शाहू महाराज यांना मताधिक्य दिले होते. त्यामुळे उमेदवारीसाठी हा त्यांच्यासाठी प्लस पाँईंट ठरला. कोल्हापूर उत्तरमध्ये पेठा आणि बावड्याचा भाग निर्णायक आहे. मात्र, लाटकरांची उमेदवारी निश्चित करताना ज्या माजी नगरसवेकांच्या उमेदवारीने बॅकफूटवर जावं लागलं त्यांच्याशी सतेज पाटील यांनी विश्वासात घेतलं नव्हतं का? किंवा गृहित धरून उमेदवारी देण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित होतो. जयश्री जाधव यांचा शिंदे गटात प्रवेश, लाटकरांनी माघारीसाठी तंगवल्याने आणि पेठांमधील गणिताचा विचार करून छत्रपती घराण्याने धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला का? असाही प्रश्न उपस्थित होतो. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Embed widget