एक्स्प्लोर

Uttar Pradesh Assembly Election 2022: भाजपने मित्रपक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला केला निश्चित, पाहा कोणत्या पक्षाला किती जागा?

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. या निवडणुकांसाठी भाजपने आपले मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टी आणि अपना दल यांना जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे.

UP Assembly Election 2022 : विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीने जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. अशातच भाजपने आता सावध पवित्रा घेतला आहे. या निवडणुकांसाठी भाजपने आपले मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टी आणि अपना दल यांना जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निषाद पार्टीला भाजपने 10 जागा दिल्या आहेत. तर अपना दल या पक्षाला 18 जागा देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. या दोन्ही पक्षांनी काही काही ठिकाणच्या आपल्या उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा केली आहे.

दरम्यान, भाजपने यापूर्वीच सांगतिले होते की, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा निषाद पार्टी आणि अपना दल यांच्याबरोबर लढवणार आहोत. मागच्या काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत मित्र पक्षांबरोबर भाजपची चर्चा सुरू होती.  मात्र, कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत खुलासा झालेला नव्हता. अखेर सुत्रांच्या माहितीनुसार जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. दरम्यान, या निवडणुकांबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये यावेळी एनडीए 300 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला आहे. तसेच कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर देखील चर्चा झाल्याची माहिती नड्डा यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास घेऊन पुढे गेले आहेत.  उत्तर प्रदेशसाही त्यांनी पुढे घेऊन जाण्याचे काम केले असल्याचे नड्डा यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री आणि अपना दलाच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांनी एनडीएची आघाडी म्हणजे विकास आणि सामाजिक न्यायाचे उत्तम कॉकटेल असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी दिर्घकाळ प्रलंबीत असेलेले मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवले आहेत. तर संजय निषाद यांनी दोन वर्षांपूर्वीच मित्रपक्ष म्हणून ठराव घेतल्याचे सांगितले होते. सबका साथ सबका विकास हा पंतप्रधान मोदींचा संकल्प सर्वापर्यंत न्यायचा आहे. उत्तर प्रदेशमधील आधीचे सरकार हे भेदभावाने काम करत असल्याचा आरोपही यावेळी पटेल यांनी लगावला. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget