एक्स्प्लोर

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ : जितके नेते तितके गट, तरीही विखेंच्या हातात आमदारकीची चावी

बेलापूर स्टेशनच्या अवती-भवती पसरलेली वस्ती पुढे श्रीरामपूर शहर म्हणून आकाराला आली. आज हे शहर जिल्हा मुख्यालयाची मागणी करतंय. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे. बॅरिस्टर आदिक, भानुदास मुरकुटे आणि ससाणे यांचा हा मतदारसंघ. आता राखीव आहे, पण विखे पाटलांचा प्रभाव वादातीत आहे.

राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून स्वतंत्र मुख्यालय करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ. माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक, गोविंदराव आदिक, जयंत ससाणे आणि भानुदास मुरकुटे यांच्याच भोवती तालुक्याचं राजकारण फिरत राहिलंय.
भानुदास मुरकुटे यांच्या ताब्यातील अशोक सहकारी साखर कारखाना वगळता कोणत्याही नेत्याकडे मोठी संस्था नाही. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अनेक संस्थावर ससाणे समर्थकांची पकड असली तरी, यावेळच्या निवडणुकीत स्व. गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांनी ससाणे गटाचा पराभव करीत श्रीरामपूरचं नगराध्यक्ष पद मिळवलं आहे. याचं निवडणुकीनंतरच तालुक्यातील सत्तासंघर्ष तीव्र झाला.
लोकसभा निवडणुकीत स्थानिक आमदार भाऊसाहेब कांबळे उमेदवार असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांना २१ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार कोण यावर निवडणूक रंजक होणार आहे.
श्रीरामपूर तालुका हा ऊस आणि कांदा उत्पादकांचा तालुका. जिल्हा मुख्यालयास लागणाऱ्या सर्व कार्यालये आणि त्यांच्या इमारती तालुक्यात आहेत. श्रीरामपूरला स्वतंत्र आर टी ओ आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था तसेच  रेल्वेची उपलब्धता आहे. यामुळेच अहमदनगर जिल्हयाचं विभाजन होऊन श्रीरामपूर हा जिल्हा व्हावा अशी मागणी सातत्याने पुढे येत असते.
अपवाद वगळता जिल्हयाचं राजकारण हे आदिक, मुरकुटे आणि ससाणे या गटांभोवतीच फिरत असतं. दिवंगत आमदार आणि साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जयंतराव ससाणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकारणातील राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जायचं. जयंत ससाणे हे गोविंदराव आदिक आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या तालमीत वाढलेले. 1999 साली राष्ट्रवादी स्थापन झाली आणि जयंत ससाणे यांनी राष्ट्रवादीचे त्यावेळचे उमेद्वार भानुदास मुरकुटे यांचा अवघ्या 500 मतांनी पराभव केला. त्यानंतर ससाणे 2004 सालीही पुन्हा आमदार झाले. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर, श्रीरामपूर अनुसुचित जातीसाठी राखीव झालं आणि ससाणे आणि विखे समर्थक म्हणून ओळख असणारे नगरसेवक भाऊसाहेब कांबळे हे सलग दोन वेळा आमदार झाले.
२०१४ साली मिळलेली मते
भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)    ५७११८ भाऊसाहेब वाकचौरे (भाजप)   ४५६३४
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली खरी पण नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानं त्याचा परिणाम शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिसून आला. विखे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आमदार कांबळेनी विखेंचा हात सोडत बाळासाहेब थोरात यांना साथ दिली, आणि लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांना पराभव पत्करावा लागला. जयंत ससाणे यांच्या निधनानंतर राजकीय गणित बदलली आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेस ऐवजी शिर्डी लोकसभेत कांबळे यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उघड प्रचार केला. बाळासाहेब थोरातांनी जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे याला काँग्रेस जिल्हाध्यक्ष केलं. मात्र आठच दिवसात विखेंच्या सांगण्यावरून करण ससाणे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत, राधाकृष्ण विखे पाटलांनी ससाणेंना जवळ करण्यात यश मिळवलं. काय होईल यावेळी 
लोकसभा निवडणुकीनंतर श्रीरामपूर विधानसभा मतदार संघावर विखे पाटलांनी पुन्हा एकदा लक्ष केद्रिंत केल आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र  राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ सोडल्याने कांबळे यांना भानुदास मुरकुटे आणि आदिक गटानं साथ दिली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र चेतन लोखंडे या मतदार संघातून इच्छुक आहेत. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या या मतदार संघात काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्याने, शिवसेनेच्या वतीने प्रचारास सुरवात झालीय.
वंचित बहुजन आघाडीची ताकदही या मतदारसंघात मोठी आहे. वंचितने जिल्ह्यातील सर्व 12 जागा लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. मतदार संघातील महत्वाचे प्रश्न  शेतीसाठी पाणी.. अहमदनगर जिल्हयाच विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा.. वाढती गुन्हेगारी.. श्रीरामपूर - नेवासा जोडणारा रस्ता चौपदरीकरण
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
Embed widget