एक्स्प्लोर

'सामना'तून टीका बंद होत नाही तोवर शिवसेनेशी भाजप चर्चा करणार नाही : सूत्र

आधी निकालांच्या आकड्यांवरून तर आज आर्थिक मंदीवरून ऐन दिवाळीत टीकेचे बाण सुटत असल्याने भाजपमध्ये शिवसेनेविरोधातील मत प्रवाह सक्रिय झाला आहे. अशीच टीका कायम राहिल्यास भाजप सेनेकडे सत्तास्थापनेसाठी कुठलाही प्रस्ताव न देण्याच्या विचारात असल्याचे देखील बोलले जात आहे.

मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर सत्तास्थापनेपूर्वी भाजप-शिवसेनेत मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण, सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी टीका थांबत नाही तोपर्यंत शिवसेनेशी चर्चा करायची नाही अशी भूमिका भाजपनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा उद्याचा मुंबई दौराही अनिश्चित मानला जात आहे. विधानसभा निकालानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजप श्रेष्ठींवर होत असलेल्या टीकेमुळे भाजपात अस्वस्थता परसली आहे. राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर सत्तास्थापनेची बोलणी सुरू होण्याआधीच पंतप्रधानांना लक्ष्य केलं जातं असल्याने भाजपमधल्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. आधी निकालांच्या आकड्यांवरून तर आज आर्थिक मंदीवरून ऐन दिवाळीत टीकेचे बाण सुटत असल्याने भाजपमध्ये शिवसेनेविरोधातील मत प्रवाह सक्रिय झाला आहे. अशीच टीका कायम राहिल्यास भाजप सेनेकडे सत्तास्थापनेसाठी कुठलाही प्रस्ताव न देण्याच्या विचारात असल्याचे देखील बोलले जात आहे. अडीच - अडीच वर्षं मुख्यमंत्रीपदाची मागणी करत असलेल्या शिवसेनेला डावलून सत्ता स्थापन करण्याच्या मागणीला जोर वाढला आहे. 2014 प्रमाणे सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करून सभागृहात बहुमताचा आकडा स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी पक्षात चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. काल सामनाच्या अग्रलेखात म्हटलं होतं की, 2014 साली स्वतंत्र लढूनही भाजपानं 122 शिवसेनेनं 63 जागा जिंकल्या. यावेळी स्वतःकडे सत्ता, युतीचं पाठबळ असूनही शिवसेना 56 वर थांबली. हा आकडा लहान वाटत असला तरी सत्तेचा रिमोट उद्धव ठाकरेंच्या हाती आला आहे. आयारामांचा जो बाजार भरवला तो शेअर बाजारासारखा कोसळला. 106 जागा जिंकूनही भाजपाच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, असं शिवसेनेनं सामनात म्हटलंय. महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल आणि तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हातात महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल आणि तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हातात आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल एबीपी माझाशी बोलताना केला होतं.  विविध आमदार शिवसेनेला समर्थन देत आहेत असंही राऊतांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेनेची ताकद नक्कीच वाढली असल्याचंही राऊतांनी सांगितलं होतं. शिवसेनेला कोणतीही अडचण नाही, असे ते म्हणाले.  उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे महाराष्ट्राला लवकर कळेल पण शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे राऊत म्हणाले. होते सगळेजण आमचे मित्र आहेत. प्रत्येकालाच महाराष्ट्रात परिवर्तन हवं आहे. म्हणून असे निकाल लागले आहेत, असे देखील राऊत म्हणाले होते. राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, एकूण बलाबल पाहता सत्तेचा रिमोट कन्ट्रोल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे  संजय राऊत यांनी परवाच्या सामनाच्या एका लेखातून म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget