एक्स्प्लोर

छत्रपती-पेशव्यांच्या तुलनेचं 'ते' वक्तव्य पवारांना भोवतंय?

पेशवे आता छत्रपतींची नेमणूक करू लागले, अशा प्रकारचं विधान शरद पवारांनी काही काळापूर्वी केलं होतं. कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर खासदारकी दिली जाण्याचा त्याला संदर्भ होता. मात्र, याच विधानानं मराठा समाज दुखावला गेला आणि आता मराठा समाजासह कोल्हापूर व साताऱ्यातील छत्रपतीही विकासाच्या मुद्यावरून भाजपसोबत येत आहेत, असा दावा संघ विचारक सुधीर पाठक यांनी केलाय.

नागपूर: पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करायचे. आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करतात, अशा प्रकारचं विधान २०१६मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात केलं होतं. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारकी मिळण्याची या वक्तव्याला पार्श्वभूमी होती. यामुळे मोठा वादंगही झाला होता. मात्र, पवारांच्या अशा विधानामुळे मराठा समाज दुखावला गेला आणि आता तर मराठा समाजासह कोल्हापूर व साताऱ्याचे छत्रपती हेही विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत येतायत. असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थकांकडून केला जातोय. संघाशी संबंधित विश्व संवाद केंद्राचे पदाधिकारी सुधीर पाठक यांनी नागपूरमध्ये 'एबीपी माझा'शी बोलताना हा दावा केलाय.  पाठक म्हणाले की, पवारांच्या त्या वक्तव्यानं दुखावलेलं मराठा मन आता एकत्र येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मराठा नेते एवढेच नाही तर कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही ठिकाणचे छत्रपती  हे सुद्धा भाजपमध्ये आले आहेत. सध्या भाजपमध्ये सुरु असलेले मराठा नेत्यांचे पक्ष प्रवेश यामुळे मराठा मनावरील शरद पवारांचा दबदबा कमी होतोय की काय, असं वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.  पाठक पुढे म्हणाले की, आधी 'धर्मनिरपेक्षता' या शब्दाभोवती भाजपविरोधी राजकारण चालायचे. मात्र, आता 'विकास' या शब्दाभोवती भाजपमध्ये लोक येत आहेत. त्यामुळे सध्या भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगला विकासाच्या नावाखाली सुरु असलेली जनदिंडी समजलं पाहिजे. एकदा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की सर्वच पक्षात सुरु असलेली पक्षांतरं बंद होतील.
शरद पवारांच्या त्या वक्तव्यामुळे पवारांवर जातीयवादाचाही आरोप झाला. पवारांनी फक्त फडणवीस यांच्यावरच नव्हे तर छत्रपती संभाजीराजे यांच्यावरही टीका केली.  राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधत म्हटलं की, छत्रपती शिवाजी राजे आणि शाहू महाराज हे केवळ एका जातीचे अथवा जातीयवादी विचारांचे नव्हते. अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी बहुजनांचे नेतृत्व केले. पण, कोल्हापूरचे छत्रपती 'जातीयवादी‘ पक्षाच्या व्यासपीठावर गेले. या प्रकरणानंतर कोल्हापुरातीलच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तरही दिलं. "मी छत्रपतींचा सेवक आहे. मी केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले. छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवरील नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांनीच केली", असंही फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत पाठक यांनी भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या इनकमिंग-पक्षप्रवेशांवरून संघ नाराज नसल्याचाही दावा केला. भाजपची ताकद वाढत असल्यास संघाला आनंदच असेल, असं ते म्हणाले. ज्या ठिकाणी आपली ताकद नाही तिथे प्रस्थापित नेतृत्वाला सोबत घ्यावे लागते असं सांगतानाच पाठक यांनी नागपुरात बनवारीलाल पुरोहित यांच्या भाजपप्रवेशाची आठवणही जागवली. २०१४पूर्वी धर्मनिरपेक्षता हा मुख्य मुद्दा होता. आताही तो महत्वाचा असला तरी आता विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी येत असल्याचं निरिक्षणही पाठक यांनी मांडलं.
  हे ही वाचा: पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न : शरद पवार
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP : महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?

व्हिडीओ

Anjali Damania Pc : चाकणकरांचे खरातला 177 फोनकॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, दमानियांचा गौप्यस्फोट
Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
Embed widget