एक्स्प्लोर

महाराष्ट्रात 'या' दिग्गजांना पराभवाचा धक्का

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 346 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 91 जागांवर आघाडी मिळाली आहे. 105 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 346 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 91 जागांवर आघाडी मिळाली आहे. 105 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे. आजच्या निकालात महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना मोठे धक्के बसले आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते सध्या पराभवाच्या छायेत आहेत. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी पराभव केला आहे. महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री सध्या मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे सध्या सोलापूर मतदार संघातून पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींना मोठी लीड मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी शिंदेंची मतं फोडल्यामुळे ते पिछाडीवर असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचादेखील पराभव झाला आहे. भाजपच्या प्रताप पाटील-चिखलीकर यांनी अशोक चव्हणांचा तब्बल 50 हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे.  या मतदारसरंघातही वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे नुकसान केले असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हेदेखील सध्या पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे बाळू धानोरकर आघाडीवर असले तरी त्या दोघांमध्ये जास्त मतांचा फरक नाही. त्यामुळेच येथील निकालाचा अंदाज वर्तवणे अवघड आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपमदेखील पिछाडीवर आहेत. शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांना निरुपम यांच्याविरोधात मोठी आघाडी मिळाली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरादेखील सध्या पिछाडीवर आहेत. शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी निरुपम यांना मोठा धक्का दिला आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबादचे खासदार आहेत. परंतु एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे सध्या औरंगाबादमध्ये आघाडीवर आहेत. संबधित बातम्या : राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पिछाडीवर मुंबईतल्या सर्व जागा शिवसेना-भाजपने राखल्या?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
West Bengal Elections : बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget