एक्स्प्लोर

Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : दिल्लीला 45 पारचा आकडा दिला, त्यावर मोदींनी 400 पार दिला अन् तोंडघशी पडले: पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधून मोकळं करावं, ही विनंती पक्षनेतृत्वाला करत आहे, असं म्हटल्यानंतर यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई : महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP Defeat in Maharashtra Lok Sabha Election Result) जे अपयश आलेलं होतं त्याची जबाबदारी स्वीकारुन राज्य सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती पक्षनेतृत्त्वाला केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  “भाजपच्या राज्यातल्या पराभवाची जबाबदारी मी घेतो. मला आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यासाठी म्हणून मला राज्य सरकारमधून मोकळं करावं, ही विनंती पक्षनेतृत्वाला करत आहे.” ,असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. काँग्रेसचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला होता त्याची जबाबदारी कुणीतरी घेणं आवश्यक होतं. ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, असं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटलं. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी यापुढे म्हटलं की, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्त्वाला त्यांनी 45 पारचा आकडा दिला होता, तो आकडा गृहित धरुन तिथं मोदींनी चारशे पारची घोषणा केली आणि मोदी तोंडघशी पडले. कुणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीला जायचं असेल तर काही तरी कोर्स करेक्शन करावं लागेल. त्यांना निवृत्त करतात की नाही, त्यांचा राजीनामा स्वीकारला जातो की नाही हे पाहावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. 

ऑल इज नॉट वेल हे मला सांगता येणार नाही. सकृतदर्शनी दिल्लीच्या नेतृत्त्वाला मिस लीड केलं, खूप आशादायक चित्र निर्माण केलं त्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.  त्यामुळं मला वाटतं कुठतरी भाजपचा ग्राऊंड रिअलिटीचा टच संपलेला आहे. त्यांनी जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं, त्याला नरेंद्र मोंदींचा थेट आशीर्वाद मिळवला, त्याची जबाबदारी घ्यावी लागेल, त्याचं विश्लेषण करतील हे माहिती घ्यावी लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  

एकदंरित सर्व महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या रचनेत बदल होणारे, मुख्यमंत्रिपद बदललं जाणार आहे. फक्त देवेंद्रजी पक्षाची जबाबदारी घेऊन पुढं जातील, त्यांना सत्तेतून मुक्त करणारेत का हे भाजप ठरवेल. काही तरी चुकलंय याची जाणीव त्यांना झाली हे बरं झालं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

देवेंद्रजी बाहेर पडले तर तिथं कोण येणार: पृथ्वीराज चव्हाण

आता मात्र सरकारपुढं दुष्काळ हाताळणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे.  आचारसंहिता संपलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या दु:खाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

आता असं आहे की निवडणुका दोन महिन्यात  जाहीर होतील. त्यामुळं सरकारमध्ये फार दम राहिलेला नाही. परंतु, कुणाच्या नेतृत्त्वाखाली जायचं हा मोठा प्रश्न आहे, भाजपला त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. मंत्रिमंडळातून देवेंद्रजी बाहेर पडले तर तिथं पर्याय कोण येणार, त्याला उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल की त्याला मुख्यमंत्रिपद दिलं जाईल हे पाहावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

एकनाथ शिंदेंना विधानसभेला सामोरं जाण्याची जबाबदारी टाकली जाईल, कारण हे एकनाथ शिंदे यांचं देखील अपयश आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे,  असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी : मला उपमुख्यमंत्रिपदावरुन मुक्त करा, देवेंद्र फडणवीसांची भाजप नेतृत्त्वाला विनंती

 मित्र पक्षांसमवेत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत; महायुतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान, 'चर्चा तर होणार'

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget