एक्स्प्लोर

राफेलच्या प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी एबीपीवर भडकले

तुम्ही सर्व दाखवता पण अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राहुल आणि प्रियंका गांधींवर आरोप करणारी पत्रकार परिषद घेतली ती मात्र व्यवस्थित दाखवली नाही, असे मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : शुक्रवारी एबीपीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 'एबीपी'वरही चिडले. राफेलच्या मुद्द्यावरून केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी एबीपीवर आगपाखड केली. एबीपी ग्रुपला नरेंद्र मोदींनी आज एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते.
EXCLUSIVE |  राफेलच्या प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी एबीपीवर भडकले | नवी दिल्ली | एबीपी माझा
राफेलमध्ये अंबानींचा फायदा करून दिलाय का? असा प्रश्न त्यांना विचारला असता तुम्हाला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही का असे म्हणत मोदी यांनी एबीपीवर बायस असल्याचा आरोप केला. तुम्ही सर्व दाखवता पण अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राहुल आणि प्रियंका गांधींवर आरोप करणारी पत्रकार परिषद घेतली ती मात्र व्यवस्थित दाखवली नाही, असे मोदी म्हणाले.
त्या पत्रकार परिषदेत बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राहुल आणि प्रियंका गांधींवर गंभीर आरोप केले होते. गांधी घराण्याचे दिल्लीतील फार्महाऊस सध्या या भावंडांच्या मालकीचे आहे. त्यांच्यासाठी मालमत्ता निर्मितीचा पद्धतशीर कार्यक्रम राबवला गेल्याचं सांगत जेटली यांनी फार्महाऊसच्या भाडेकरारांकडे लक्ष वेधलं होतं, असे मोदी म्हणाले.
यावेळी उदाहरण म्हणून त्यांनी एफटीआयएल घोटाळ्यातील आरोप जिग्नेश शाह, संजय चंद्राच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या युनिटेक बिल्डरचा उल्लेख केला. काहीही कामधंदा न करता ऐशोआरामाचे जीवन जगणं आणि प्रामाणिक असणाऱ्यांवर आरोप लावण्याची यांची राजकीय शैली आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी चिढलेल्या पंतप्रधान मोदी यांनी, मी एबीपीवर बायस असल्याचा आरोप लावतो. एका खोट्या मुद्द्यासाठी एबीपी समूह देशाच्या प्रधानमंत्र्यांना प्रश्न करतो. आपली काय मजबुरी आहे हे मला कळत नाही, असे मोदी म्हणाले.
राहुल गांधींना अमेठीमध्ये पराभव दिसत आहे, त्यामुळेच ते दक्षिणेत पळाले  देशात सध्या सरकारविरोधात वातावरण नाही तर 2014 पेक्षाही चांगली स्थिती आहे, असा दावा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवरही हल्लाबोल केला. राहुल गांधींना अमेठीमध्ये पराभव दिसत आहे. त्यामुळंच  केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी दक्षिणेत पळ का काढला? असा सवालही त्यांनी केला. याशिवाय एअर स्ट्राईकच्यावेळी जातीनं मिशनवर लक्ष ठेवून होतो, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. यावेळी मोदींनी महागठबंधन, ममता बॅनर्जी, नोटबंदी, पाकिस्तान अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं दिली. यावेळी राहुल आणि प्रियांकाविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, राहुल आणि प्रियांका या दोघांनाही मी वैयक्तिक ओळखत नाही. राहुल-प्रियांका हे चांगले की वाईट हे काँग्रेस ठरवेल. राहुल गांधींना अमेठीमध्ये पराभव दिसत आहे, त्यामुळेच ते दक्षिणेत पळाले, असे मोदी म्हणाले. भाषणात राहुल यांचं नाव न घेण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्यांचं नाव घेत नाही याचं मीडियाला दुःख का होतंय. मी 'नामदार' नेत्याचं नाव कसं घेऊ. मी चहावाल्याचा घरातला माणूस आहे. ही लोकं मोठी आहेत, त्यांची नाव मी कशी घेऊ, असा टोमणा त्यांनी मारला. काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मोदींची टीका

जनतेने काँग्रेसची गेल्या 60 वर्षांची सत्ता पाहिली होती, त्यामुळे मी देशातील जनतेकडे 60 महिने मागितले होते. या 60 महिन्यातील आमच्या सरकारची कामगिरी समाधानकारक आहे. 60 महिन्यात देशातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देशाला गतीशील सरकार पाहायला मिळालं. मात्र या सगळ्याचं श्रेय जनतेला जातं, कारण त्यांच्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.

या 60 महिन्याच्या कालावधीत आम्ही अनेक मोठे निर्णय घेतले गेले. पहिल्या सरकारबद्दल लोकांच्या मनात राग होता. मात्र आमच्या सरकारची काम करण्याची पद्धत पाहून जनतेच्या आशा आणखी वाढल्या आहेत.

देश स्वंतत्र झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि मी असे पंतप्रधान आहोत, की जे काँग्रेसच्या गोत्राचे नाहीत. इतर पंतप्रधान मग ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांचं गोत्र काँग्रेसचं होतं. त्यामुळे देशाने पहिल्यांदा काँग्रेसची विचारसरणी नसलेलं सरकार पाहिलं आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

EXCLUSIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वीची ऐतिहासिक मुलाखत | भाग 1 | एबीपी माझा

काँग्रेसने जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही मोदींनी टीका केली आहे. काँग्रेसने 60 वर्ष देशावर राज्य केलं. सरकार चालवण्याचा प्रदिर्घ अनुभव काँग्रेसकडे आहे. सरकारी व्यवस्थेची बलस्थानं आणि मर्यादा काँग्रेसला माहित आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून एका चांगल्या जाहीरनाम्याची अपेक्षा होती. काँग्रेसने जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा निराशजनक असून काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे. जी आश्वासनं याआधी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिली आहेत, ती पूर्ण केलेली नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

भारतीय सैनिकांचा अपमान करणं काँग्रेसला शोभत नाही

भारतीय सैन्यदलाबाबत जगभरातील देशांना आदर आहे. मात्र देशातील काही लोकांना सैन्याच्या पराक्रमावर संशय आहे. काँग्रेससारखा मोठा राजकीय पक्ष आपल्या सैन्याचा अपमान करतो हे अशोभनीय आहे. भारतीय सैन्याबाबत जगभरातून कधीही तक्रार आली नाही, त्यामुळे सैन्याबद्दल बोलताना विचार करणे गरजेचं असल्याचं मोदींनी म्हटलं.

काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. काश्मीरमधील परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. काश्मीरमधील प्रत्येक घरात आज वीज, शौचालय इत्यादी सुविधा पोहोचल्या आहेत. जम्मू काश्मीरची आर्थिक स्थितीही सुधारली आहे. जम्मू-काश्मीरचा प्रवास योग्य दिशेने होत आहे. काश्मीरमधील क्रीडा, शैक्षणिक संस्थाही विकसित केल्या आहेत. कृषी क्षेत्रातही अनेक मोठे बदल झाले आहे. पहिल्यापेक्षा जम्मू-काश्मीरचा विकास वेगाने होते आहे, अशी माहिती मोदींनी दिली.

EXCLUSIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वीची ऐतिहासिक मुलाखत | भाग 2 | एबीपी माझा

देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे 

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका मांडली. देशविरोधी वक्तव्य आणि कारवाई करणाऱ्यांवर देशद्रोह अंतर्गतची कारवाई झालीच पाहिजे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. काँग्रेसने देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत 6 हजार जणांना कारागृहात पाठवलं. अशारीतीने काम करणारा पक्ष आज देशद्रोहाचं कलम हटवण्याची भाषा करत आहे, असं मोदींनी म्हटलं.

सरकारच्या हालचालींनंतर विजय मल्ल्या आणि नीरव मोदीवर कारवाई

देशाला हजारो कोटींचा चुना लावून पळालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावरील कारवाईबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली. आम्ही पावलं उचलली म्हणूनच देशातून पळालेल्यांवर परदेशात कारवाई झाली. सरकारच्या हालचालींमुळेच त्यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई झाली. मात्र आमचं सरकार आल्यानंतर त्यांनी देशाल लुटलं असं नाही, गेल्या दहा वर्षात त्यांनी हा पैसा जमवला. मात्र त्यांना माहित नव्हते आमचं सरकार येईल आणि त्यांना सगळा पैसा परत करावा लागेल. त्यामुळे त्यांना देशातून पळ काढावा लागला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Election 2026: रायफल हातात घेऊन 'स्वॅग' दाखवणं भोवलं, ममता बॅनर्जींच्या मतदारसंघातील पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; नेमकं काय घडलं?
रायफल हातात घेऊन 'स्वॅग' दाखवणं भोवलं, ममता बॅनर्जींच्या मतदारसंघातील पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; नेमकं काय घडलं?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार...भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत..., विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
10 जागा, 10 उमेदवार, भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...,विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी
उमेदवारी नाकारताना साधं विचारलही नाही, अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत, भविष्यातील वाटचालीचे दिले संकेत 
उमेदवारी नाकारताना साधं विचारलही नाही, अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत, भविष्यातील वाटचालीचे दिले संकेत 
Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Pune Crime Navale bridge: नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
Embed widget