एक्स्प्लोर

संविधान बदलणार असल्याचा काँग्रेस विषारी प्रचार करतेय, मात्र स्वतः च्या सोईकरिता त्यांनीच संविधानाच्या धज्जीया उडविल्या: नितीन गडकरी 

Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस संविधान बदलणार असल्याचा विषारी प्रचार करीत आहे. मात्र स्वतः च्या सोईकरिता काँग्रेसने संविधानाच्या धज्जीया उडविल्या असल्याची टीका नितीन गडकरी यांनी केलीय.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस संविधान बदलणार असल्याचा विषारी प्रचार करीत आहे. संविधानाचे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्वे कुणीही बदलू शकत नाही. मात्र स्वतः च्या सोईकरिता काँग्रेसने संविधानाच्या धज्जीया उडविल्या आहेत. त्यामुळे उलटा चोर कोतवाल को दाटे, असा प्रकार काँग्रेसचा (Congress) असल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यवतमाळच्या राळेगाव येथील सभेत केली. भाजप उमेदवार अशोक उईके याच्या प्रचारार्थ सभेत गडकरी बोलत होते. 

काँग्रेस मुसलमानांना देखील खोट्या प्रचारातून भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी बोलतांना केले. काँग्रेसवाले म्हणत आहे संविधान बदलणार आहे. मात्र घटनेचे मूलभूत तत्त्व मुळात कोणी बदलू शकत नाही. असे असले तरी घटनेची खरी मोडतोड 1975 मध्ये  आणीबाणीच्या काळात काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने संविधान तोडले आणि ते आता आरोप करत फिरत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे, असे झाले आहे. सबका साथ सबका विश्वास असे महायुतीचे सरकार आहे. भाकरी बदलली उईके यांना निवडणून दिले आणि बदल झाला. राळेगावच्या विकासाकरिता उईके यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे म्हणत यवतमाळच्या राळेगाव येथील सभेत नितीन गडकरी यांनी मतदारांना साद घातली आहे. 

काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केलं 

गडकरी पुढे म्हणाले की, सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष असो वा नसो, पण राज्य, सरकार आणि प्रशासन हे धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. आर्वी येथील निवडणूक सभेत गडकरींनी काँग्रेसवर ग्रामीण भागाचा विकास होत नसल्याचा आरोप केला. गडकरी म्हणाले की, काँग्रेसने ग्रामीण भारताच्या विकासाचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. ग्रामीण भारताला प्राधान्य दिले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या आणि खेड्यात गरिबी नसती. भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती 

देश चालवायचा असेल तर चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार का तर यांना संविधान बदलायचे होते, असा घणाघाती प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आज शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.  

शरद पवार म्हणाले की, या राज्यात 900 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार केले गेले हे अतिशय दुर्दैवी आहे. आयुष्यभर बबनराव ढाकणे यांनी जनतेसाठी दिलं, त्यांच्याच मुलाच्या मागे आपण ताकद उभं केली पाहिजे. बबनराव ढाकणे यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी उभ आयुष्य लोकांसाठी घातलं. त्यांची पुढची पिढी देखील विधिमंडळात आली पाहिजे. आज देशाची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हातात आहेत. त्यांची बोलण्याची भाषा एक आणि करण्याची एक आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी एक घोषणा केली चारशे पारची. देश चालवण्यास चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार कशासाठी तर यांना संविधान बदलायचे होते, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका

व्हिडीओ

Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.
Nagar Parishad Nagar Panchayat Election : 22 Dec 2025 : धुरळा निवडणुकीचा Superfast News : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
Ajit Pawar & Satej Patil: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
Pune Election: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
BMC Election 2026: मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
Embed widget