एक्स्प्लोर

संविधान बदलणार असल्याचा काँग्रेस विषारी प्रचार करतेय, मात्र स्वतः च्या सोईकरिता त्यांनीच संविधानाच्या धज्जीया उडविल्या: नितीन गडकरी 

Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस संविधान बदलणार असल्याचा विषारी प्रचार करीत आहे. मात्र स्वतः च्या सोईकरिता काँग्रेसने संविधानाच्या धज्जीया उडविल्या असल्याची टीका नितीन गडकरी यांनी केलीय.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस संविधान बदलणार असल्याचा विषारी प्रचार करीत आहे. संविधानाचे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्वे कुणीही बदलू शकत नाही. मात्र स्वतः च्या सोईकरिता काँग्रेसने संविधानाच्या धज्जीया उडविल्या आहेत. त्यामुळे उलटा चोर कोतवाल को दाटे, असा प्रकार काँग्रेसचा (Congress) असल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यवतमाळच्या राळेगाव येथील सभेत केली. भाजप उमेदवार अशोक उईके याच्या प्रचारार्थ सभेत गडकरी बोलत होते. 

काँग्रेस मुसलमानांना देखील खोट्या प्रचारातून भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी बोलतांना केले. काँग्रेसवाले म्हणत आहे संविधान बदलणार आहे. मात्र घटनेचे मूलभूत तत्त्व मुळात कोणी बदलू शकत नाही. असे असले तरी घटनेची खरी मोडतोड 1975 मध्ये  आणीबाणीच्या काळात काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने संविधान तोडले आणि ते आता आरोप करत फिरत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे, असे झाले आहे. सबका साथ सबका विश्वास असे महायुतीचे सरकार आहे. भाकरी बदलली उईके यांना निवडणून दिले आणि बदल झाला. राळेगावच्या विकासाकरिता उईके यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे म्हणत यवतमाळच्या राळेगाव येथील सभेत नितीन गडकरी यांनी मतदारांना साद घातली आहे. 

काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केलं 

गडकरी पुढे म्हणाले की, सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष असो वा नसो, पण राज्य, सरकार आणि प्रशासन हे धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. आर्वी येथील निवडणूक सभेत गडकरींनी काँग्रेसवर ग्रामीण भागाचा विकास होत नसल्याचा आरोप केला. गडकरी म्हणाले की, काँग्रेसने ग्रामीण भारताच्या विकासाचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. ग्रामीण भारताला प्राधान्य दिले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या आणि खेड्यात गरिबी नसती. भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती 

देश चालवायचा असेल तर चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार का तर यांना संविधान बदलायचे होते, असा घणाघाती प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आज शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.  

शरद पवार म्हणाले की, या राज्यात 900 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार केले गेले हे अतिशय दुर्दैवी आहे. आयुष्यभर बबनराव ढाकणे यांनी जनतेसाठी दिलं, त्यांच्याच मुलाच्या मागे आपण ताकद उभं केली पाहिजे. बबनराव ढाकणे यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी उभ आयुष्य लोकांसाठी घातलं. त्यांची पुढची पिढी देखील विधिमंडळात आली पाहिजे. आज देशाची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हातात आहेत. त्यांची बोलण्याची भाषा एक आणि करण्याची एक आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी एक घोषणा केली चारशे पारची. देश चालवण्यास चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार कशासाठी तर यांना संविधान बदलायचे होते, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget