एक्स्प्लोर

संविधान बदलणार असल्याचा काँग्रेस विषारी प्रचार करतेय, मात्र स्वतः च्या सोईकरिता त्यांनीच संविधानाच्या धज्जीया उडविल्या: नितीन गडकरी 

Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस संविधान बदलणार असल्याचा विषारी प्रचार करीत आहे. मात्र स्वतः च्या सोईकरिता काँग्रेसने संविधानाच्या धज्जीया उडविल्या असल्याची टीका नितीन गडकरी यांनी केलीय.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस संविधान बदलणार असल्याचा विषारी प्रचार करीत आहे. संविधानाचे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्वे कुणीही बदलू शकत नाही. मात्र स्वतः च्या सोईकरिता काँग्रेसने संविधानाच्या धज्जीया उडविल्या आहेत. त्यामुळे उलटा चोर कोतवाल को दाटे, असा प्रकार काँग्रेसचा (Congress) असल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यवतमाळच्या राळेगाव येथील सभेत केली. भाजप उमेदवार अशोक उईके याच्या प्रचारार्थ सभेत गडकरी बोलत होते. 

काँग्रेस मुसलमानांना देखील खोट्या प्रचारातून भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी बोलतांना केले. काँग्रेसवाले म्हणत आहे संविधान बदलणार आहे. मात्र घटनेचे मूलभूत तत्त्व मुळात कोणी बदलू शकत नाही. असे असले तरी घटनेची खरी मोडतोड 1975 मध्ये  आणीबाणीच्या काळात काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने संविधान तोडले आणि ते आता आरोप करत फिरत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे, असे झाले आहे. सबका साथ सबका विश्वास असे महायुतीचे सरकार आहे. भाकरी बदलली उईके यांना निवडणून दिले आणि बदल झाला. राळेगावच्या विकासाकरिता उईके यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे म्हणत यवतमाळच्या राळेगाव येथील सभेत नितीन गडकरी यांनी मतदारांना साद घातली आहे. 

काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केलं 

गडकरी पुढे म्हणाले की, सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष असो वा नसो, पण राज्य, सरकार आणि प्रशासन हे धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. आर्वी येथील निवडणूक सभेत गडकरींनी काँग्रेसवर ग्रामीण भागाचा विकास होत नसल्याचा आरोप केला. गडकरी म्हणाले की, काँग्रेसने ग्रामीण भारताच्या विकासाचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. ग्रामीण भारताला प्राधान्य दिले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या आणि खेड्यात गरिबी नसती. भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती 

देश चालवायचा असेल तर चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार का तर यांना संविधान बदलायचे होते, असा घणाघाती प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आज शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.  

शरद पवार म्हणाले की, या राज्यात 900 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार केले गेले हे अतिशय दुर्दैवी आहे. आयुष्यभर बबनराव ढाकणे यांनी जनतेसाठी दिलं, त्यांच्याच मुलाच्या मागे आपण ताकद उभं केली पाहिजे. बबनराव ढाकणे यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी उभ आयुष्य लोकांसाठी घातलं. त्यांची पुढची पिढी देखील विधिमंडळात आली पाहिजे. आज देशाची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हातात आहेत. त्यांची बोलण्याची भाषा एक आणि करण्याची एक आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी एक घोषणा केली चारशे पारची. देश चालवण्यास चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार कशासाठी तर यांना संविधान बदलायचे होते, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
ठाकरे बंधूंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकण्याचा कॉन्फिडन्स का? सांगितलं कारण

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
ठाकरे बंधूंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकण्याचा कॉन्फिडन्स का? सांगितलं कारण
Baramati Crime News: पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Video : रोहित मी तुला कर्णधारच बोलणार, कारण....; सूर्यकुमार यादव, शाहरुख खानसमोर जय शाह मनातलं सगळं बोलले, VIDEO
रोहित मी तुला कर्णधारच बोलणार, कारण....; सूर्यकुमार यादव, शाहरुख खानसमोर जय शाह मनातलं सगळं बोलले, VIDEO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Embed widget