एक्स्प्लोर

... तर बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती - शरद पवार

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी पूर्ण बहुमत आहे का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तेलगु देसम आणि जेडीयुमुळे मदत झाली नसती तर बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता भाजपमध्ये नव्हती, असे शरद पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी पूर्ण बहुमत आहे का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. 
 
खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीचा निकाल जर बघितला व एकंदरीत झालेले मतदान पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये जे होतं त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. त्यांची संसदेतील संख्या कमी झाली, संसदेतील त्यांचे बहुमत कमी आहे. तेलगु देसम आणि जेडीयुमुळे बिहार आणि आंध्र या भागातून मदत झाली नसती तर बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती, असे शरद पवार म्हणाले. 

बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती- 

गेल्या २५ वर्षांत आपण अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले. काही ठिकाणी संघर्षाबद्दल व काही ठिकाणी नवीन दिशा दाखवण्याबद्दल. आज वेगळ्या स्थितीतून देश चालला आहे, देशाचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये आहे. खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल जर बघितला व एकंदरीत झालेले मतदान पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये जे होतं त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. त्यांची संसदेतील संख्या कमी झाली, संसदेतील त्यांचे बहुमत कमी आहे. तेलगु देसम आणि जेडीयुमुळे बिहार आणि आंध्र प्रदेश या भागातून मदत झाली नसती तर बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती, असे शरद पवार म्हणाले. 

आता सत्तेचे विकेंद्रीकरण पूर्ण नाही 

गेली ५ वर्ष सरकार चालवलं ते त्या लोकांनी आपल्या मनाप्रमाणे चालवलं, त्यांनी देशाचा कुठलाही विचार केला नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचे सूत्र आणि आम्ही सांगेल तीच नीती, आम्ही सांगू ते धोरण, हेच सूत्र ठेवून देशामध्ये काम केलं. सुदैवाने देशातील जनतेने देशामध्ये ही नीती पुन्हा निर्माण होणार नाही, याची नोंद घेतली, त्या प्रकारे मतदान करून प्रचंड अधिकार या एक दोन लोकांच्या हातामध्ये होता, त्याला मर्यादा आणण्याबद्दलची काळजी घेतली. आता सत्तेचे विकेंद्रीकरण पूर्ण नाही, पण त्याची प्रक्रिया सुरू होणार, हे प्रशासन आता देशाला बघायला मिळेल. शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या-माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे. या देशातील लोकशाही असेल, संसदीय लोकशाही पद्धती असेल, जी काही विचारधारा आणि कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला, त्याची अंमलबजावणी करण्याबद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असू त्यापेक्षा कितीतरी पटीने हा सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी होते, असे पवार म्हणाले.

विधानसभेच्या कामाला लागा - 

गेले २५ वर्षे आपण विचारधारा वाढवायचा प्रयत्न केला. आता मजबुतीने आपण हा पक्ष आणखी पुढे नेऊया. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल, त्यात तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे, आता एकच लक्ष्य आणि ते लक्ष्य म्हणजे तीन-चार महिन्यांनी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे, ही भूमिका आपण घेणार आहोत. या गोष्टी करत असताना त्या सत्तेचा उपयोग अधिक लोकांना कसा होईल, शेवटच्या घटकाला कसा होईल, हे सूत्र घेऊन आपण काम करायचं आहे, असे पवार म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Embed widget