एक्स्प्लोर

अहिरांचा शिवसेना प्रवेश म्हणजे झोपलेल्या माणसाच्या डोक्यात दगड घालण्यासारखा : कार्यकर्त्यांच्या भावना

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सपत्नीक शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत अहिरांनी हाती शिवबंधन बांधलं.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खूप मेहनत घेतली. वयाच्या 78व्या वर्षी 75हून अधिक सभा घेतल्या. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत 15 जागा जिंकण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. पण 23 मे रोजी मात्र राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीच्या पाच जागा निवडून आल्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपचा  मार्ग पत्करला आणि विधान सभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये जाण्याची तयारी केली. लोक जाणार याची पक्ष प्रमुखांना कल्पना होती. पण आज मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या जाण्याने मात्र राष्ट्रवादीला धक्का बसला. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अवघे तीन नेते आहेत. सचिन अहिर, संजय दीना पाटील आणि नवाब मलिक, संजय दीना पाटील हे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरले. नवाब मलिक यांना पक्षात दुर्लक्षित केले जात आहे तर मुंबई अध्यक्ष असून सचिन अहिर इतके दिवस गायब होते. नुकताच शिवसेनेच्या विरोधात सचिन अहिर यांनी पार्किंगच्या दरांवरुन आंदोलन केलं होतं. जयंत पाटील यांचे विश्वासू असे सचिन अहिर हे गेले अनेक वर्षे पक्षात मुंबईला अध्यक्ष पदावर आहेत. त्यांना महामंडळ आणि मंत्री पद देखील राष्ट्रवादीने दिले. आज सचिन अहिर जाणार या बतमीनंतर बोलायला काहीच न उरल्याने राष्ट्रवादीचे नेते संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले. वरिष्ठ नेत्यांनी राजकारणात या गोष्टी होतात, त्याला इतकं महत्व द्यायचं कारण नाही सांगत विषय टाळला. अजित पवार यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाबाबत जयंत पाटील यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांच्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. तर जयंत पाटील यांना वारंवार संपर्क करुनही काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याने काय धक्का बसला हे स्पष्ट दिसत होतं. काल रात्रीपासून सचिन अहिर शिवसेनेत जाणार कळल्यापासून माध्यमांना टाळण्यासाठी जयंत पाटील यांनी आज पहाटे मुंबई सोडली आणि इस्लामपूरचा रस्ता पकडला. नेते प्रसारमाध्यमांना टाळत असले तरी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र मध्यरात्रीपासून चर्चा होती. सचिन भाऊ असे  का वागले? सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे 'झोपलेल्या माणसाच्या डोक्यात दगड घातल्याची भावना' कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. पक्षाने काय दिलं नाही या नेत्यांना आणि हे असे निघून जातात, असा सवालही काहींनी केला. इतकी वर्ष मुंबईची जबाबदारी देऊन ही सचिन अहिर यांनी मुंबईत पक्ष का वाढवला नाही याचं उत्तर आज मिळालं अशी एक खोचक प्रतिक्रिया ही ऐकायला मिळाली. आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन : सुनील शिंदे सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर नवाब मलिक यांनी मात्र ट्विटवरुन मार्मिक प्रतिक्रिया दिली.. जो जिंदा होते हैं वह प्रवाह के विरुद्ध तैरते हैं, मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं। साथियों जिंदा हो तो जिंदा नज़र आना ज़रूरी है। जयहिंद जय राष्ट्रवाद। एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला असताना सर्व पद भूषवलेले नेते असे जाणे म्हणजे पक्षाला घरघर लागण्याचं चिन्ह आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकमध्ये महायुतीला मोठे यश! भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचा नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा; संकटमोचक गिरीश महाजनांची मध्यस्थी यशस्वी
नाशिकमध्ये महायुतीला मोठे यश! भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचा नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा; संकटमोचक गिरीश महाजनांची मध्यस्थी यशस्वी
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Chhagan Bhujbal on Rajya Sabha Election 2026: 'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
'इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकच्या माघारीवर जळगावचा तिढा अडकला, गिते-हिरेंचं बंड शमवण्यासाठी महायुतीची धावपळ; भाजपच्या संकटमोचकांना यश मिळणार?
नाशिकच्या माघारीवर जळगावचा तिढा अडकला, गिते-हिरेंचं बंड शमवण्यासाठी महायुतीची धावपळ; भाजपच्या संकटमोचकांना यश मिळणार?

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Embed widget