एक्स्प्लोर

कळवा-मुंब्रा मतदारसंघ | जितेंद्र आव्हाडांचा गड सर करण्याचे युतीसमोर आव्हान

आव्हाडांचे नाव कोणत्याही घोटाळ्यात न आल्याने त्यांच्या विरोधात प्रचार करायला देखील खूप कमी वाव आहे. तरी वंचित आघाडीकडून जर मोठ्या प्रमाणात मते विभागली गेली तर आव्हाडांची सीट धोक्यात येऊ शकते.

कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा ठाणे शहराच्या बाजूलाच आहे. ठाणे महानगर पालिकेचा भाग आहे. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग मात्र नाही. हा मतदारसंघ आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे यामध्ये कळवा आणि मुंब्रा हे दोन्ही भाग मोडतात. कळवा भागातील पश्चिमेचा पूर्ण भाग, रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, पूर्वेकडील विटावा, सूर्या नगर, मुंब्रा, कौसा हे सर्व भाग या मतदार संघात येतात. या मतदारसंघातील कळव्यात भूमिपुत्र असलेले आगरी आणि कोळी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत तर मुंब्रा आणि कौसा भागात मुस्लिम वस्ती खूप आहे. इतिहास काय सांगतो कळवा मुंब्रा मतदारसंघ हा 2009 साली बनलेला मतदारसंघ आहे. त्याआधी तो बेलापूर या भल्यामोठ्या मतदारसंघाचा हिस्सा होता. बेलापूर मतदारसंघात आताच्या बेलापूरपासून ते वाशी आणि ऐरोली, कळवा-मुंब्रा, घोडबंदरचा पूर्ण पट्टा आणि थेट भाईंदर-उत्तनपर्यंत सर्व विभाग यायचा. एकेकाळचा तो सर्वात मोठा मतदारसंघ होता. तरीही गणेश नाईक या मतदारसंघातून निवडून यायचे. 2009 ला त्याचे पुनर्विभाजन होऊन अनेक वेगवेगळे मतदारसंघ तयार झाले. त्यात कळवा-मुंब्रा हा एक मतदासंघ. इथे मुख्यतः 2 मतदार आहेत. मुंब्र्यात असलेला मुस्लिम समाज आणि कळव्यात असलेला आगरी-कोळी समाज. हे दोन समाज ज्याच्या बाजूने तो हमखास निवडून येतो. हे ही वाचा - वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ | मातोश्रीच्या अंगणातला गड वाचवण्यासाठी शिवसेनेला जोर लावावा लागणार काय आहे सद्यस्थिती कळवा मुंब्रा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. आधी गणेश नाईक यांना तर 2009 पासून जितेंद्र आव्हाड यांना इथल्या मतदार राजाने निवडून दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे या विभागात काम देखील खूप आहे. कळव्यात अनेक नवीन संकल्पना त्यांनी राबवल्या. म्हणून की काय 2014 साली जेव्हा मोदी लाट होती. त्यावेळी 47 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून आले होते. आता पुन्हा त्यांनाच राष्ट्रवादी म्हणजे आघाडीकडून तिकीट मिळणार यात शंका नाही. मात्र 2014 प्रमाणे आता थोडे चित्र बदलले आहे. युती आणि आघाडी यांच्यात लढत असल्याने शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आव्हाड यांना पाडण्यासाठी जोर लावू शकतात. युतीकडून इथे शिवसेनेला तिकीट दिले जाते. गेल्यावेळी दशरथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा प्रचंड मतांनी पराभव झाल्याने आता सेना नवीन चेहरा देण्याची जास्त शक्यता आहे. राजेंद्र सापते यांचे नाव देखील चर्चेत आहे. जर युती नाहीच झाली तर भाजपकडून मनोहर सुखदरे, अशोक भोईर यांची नावे पुढे आहेत. काँग्रेसला तर 2014 साली इथे फक्त 4 हजारपेक्षा कमी मतांचा टप्पा गाठता आला होता. त्यामुळे आघाडी तुटली तर काँग्रेसला मजबूत उमेदवार शोधावा लागेल. या सर्व पक्षांसोबत इथे एमआयएमचा प्रभाव देखील आहे. वंचित बहुजन आघाडीकडून इथे एमआयएमच्या उमेदवाराला तिकीट मिळेल. 2014 साली देखील तिसऱ्या क्रमांकाला एमआयएमचा उमेदवार होता. यावर्षी देखील मोठ्या संख्येने मत खेचण्यात हा उमेदवार यशस्वी होईल असे चिन्ह आहे. हे देखील वाचा -चांदिवली विधानसभा मतदारसंघ | नसीम खान यांच्यासमोर यंदा तगडे आव्हान इथल्या समस्या वाहतूक कोंडी हा सर्वात मोठा विषय इथे आहे. कळव्यात जुन्या खाडी पुलाच्या बाजूने नवीन पुलाचे काम सुरू आहे. तो सुरू झाला की मोठ्या प्रमाणात ही समस्या कमी होईल. मात्र मुंब्रा भागात अशा एखाद्या प्रकल्पाच्या प्रतीक्षेत लोकं आहेत. वीज इथे नेहमीच नसते. वीज चोरी आणि बिल न भरणे यामुळे एमएसइबीने जणू या विभागाला वाळीत टाकले आहे. तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या लोड शेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. काही भागात पावसात पाणी देखील साचते. या सर्वांसोबत राजकीय वरदहस्त आणि भ्रष्टाचार यामुळे अनधिकृत वस्ती मोठ्या प्रमाणात इथे निर्माण झाली आहे. जी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यावर काहीही तोडगा काढताना कोणीही दिसत नाही. त्यामुळे नागरी सुविधांवर मोठा ताण येतोय. 2019 ची शक्यता गेल्या 10 वर्षात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा येथील चेहरा मोहरा बद्दलण्यासाठी काम केले आहे, जे नाकारता येणार नाही. अनेक डोळ्यांना दिसतील असे बदल या भागात घडले आहेत. तर लोकांना हवा तेव्हा उपलब्ध असलेला आमदार म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. मात्र युती असल्याने आव्हाड यांनी सीट पाडण्याचा पूर्ण प्रयत्न सेना भाजप करेल. त्यात भाजप विरोधात खुलेआम पणे टीका करणारे आमदार म्हणून देखील आव्हाड प्रसिद्ध आहेत. त्यांचे नाव कोणत्याही घोटाळ्यात न आल्याने त्यांच्या विरोधात प्रचार करायला देखील खूप कमी वाव आहे. तरी वंचित आघाडीकडून जर मोठ्या प्रमाणात मते विभागली गेली तर आव्हाडांची सीट धोक्यात येऊ शकते. एकूण मतदार 3,48,482 पुरुष 185749 स्त्रिया 152593 एकूण मतदान केंद्रे 310 2014 चा निकाल ( पहिले तीन ) जितेंद्र आव्हाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) 86,533 दशरथ पाटील ( शिवसेना ) 38,850 अश्रफ मुलानी ( एमआयएम ) 16,374 विजयी - जितेंद्र आव्हाड - 47,683 मतांनी विजयी जाणून घ्या या मतदारसंघाविषयी  

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget