एक्स्प्लोर

कळवा-मुंब्रा मतदारसंघ | जितेंद्र आव्हाडांचा गड सर करण्याचे युतीसमोर आव्हान

आव्हाडांचे नाव कोणत्याही घोटाळ्यात न आल्याने त्यांच्या विरोधात प्रचार करायला देखील खूप कमी वाव आहे. तरी वंचित आघाडीकडून जर मोठ्या प्रमाणात मते विभागली गेली तर आव्हाडांची सीट धोक्यात येऊ शकते.

कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा ठाणे शहराच्या बाजूलाच आहे. ठाणे महानगर पालिकेचा भाग आहे. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग मात्र नाही. हा मतदारसंघ आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे यामध्ये कळवा आणि मुंब्रा हे दोन्ही भाग मोडतात. कळवा भागातील पश्चिमेचा पूर्ण भाग, रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, पूर्वेकडील विटावा, सूर्या नगर, मुंब्रा, कौसा हे सर्व भाग या मतदार संघात येतात. या मतदारसंघातील कळव्यात भूमिपुत्र असलेले आगरी आणि कोळी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत तर मुंब्रा आणि कौसा भागात मुस्लिम वस्ती खूप आहे. इतिहास काय सांगतो कळवा मुंब्रा मतदारसंघ हा 2009 साली बनलेला मतदारसंघ आहे. त्याआधी तो बेलापूर या भल्यामोठ्या मतदारसंघाचा हिस्सा होता. बेलापूर मतदारसंघात आताच्या बेलापूरपासून ते वाशी आणि ऐरोली, कळवा-मुंब्रा, घोडबंदरचा पूर्ण पट्टा आणि थेट भाईंदर-उत्तनपर्यंत सर्व विभाग यायचा. एकेकाळचा तो सर्वात मोठा मतदारसंघ होता. तरीही गणेश नाईक या मतदारसंघातून निवडून यायचे. 2009 ला त्याचे पुनर्विभाजन होऊन अनेक वेगवेगळे मतदारसंघ तयार झाले. त्यात कळवा-मुंब्रा हा एक मतदासंघ. इथे मुख्यतः 2 मतदार आहेत. मुंब्र्यात असलेला मुस्लिम समाज आणि कळव्यात असलेला आगरी-कोळी समाज. हे दोन समाज ज्याच्या बाजूने तो हमखास निवडून येतो. हे ही वाचा - वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ | मातोश्रीच्या अंगणातला गड वाचवण्यासाठी शिवसेनेला जोर लावावा लागणार काय आहे सद्यस्थिती कळवा मुंब्रा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. आधी गणेश नाईक यांना तर 2009 पासून जितेंद्र आव्हाड यांना इथल्या मतदार राजाने निवडून दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे या विभागात काम देखील खूप आहे. कळव्यात अनेक नवीन संकल्पना त्यांनी राबवल्या. म्हणून की काय 2014 साली जेव्हा मोदी लाट होती. त्यावेळी 47 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून आले होते. आता पुन्हा त्यांनाच राष्ट्रवादी म्हणजे आघाडीकडून तिकीट मिळणार यात शंका नाही. मात्र 2014 प्रमाणे आता थोडे चित्र बदलले आहे. युती आणि आघाडी यांच्यात लढत असल्याने शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आव्हाड यांना पाडण्यासाठी जोर लावू शकतात. युतीकडून इथे शिवसेनेला तिकीट दिले जाते. गेल्यावेळी दशरथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा प्रचंड मतांनी पराभव झाल्याने आता सेना नवीन चेहरा देण्याची जास्त शक्यता आहे. राजेंद्र सापते यांचे नाव देखील चर्चेत आहे. जर युती नाहीच झाली तर भाजपकडून मनोहर सुखदरे, अशोक भोईर यांची नावे पुढे आहेत. काँग्रेसला तर 2014 साली इथे फक्त 4 हजारपेक्षा कमी मतांचा टप्पा गाठता आला होता. त्यामुळे आघाडी तुटली तर काँग्रेसला मजबूत उमेदवार शोधावा लागेल. या सर्व पक्षांसोबत इथे एमआयएमचा प्रभाव देखील आहे. वंचित बहुजन आघाडीकडून इथे एमआयएमच्या उमेदवाराला तिकीट मिळेल. 2014 साली देखील तिसऱ्या क्रमांकाला एमआयएमचा उमेदवार होता. यावर्षी देखील मोठ्या संख्येने मत खेचण्यात हा उमेदवार यशस्वी होईल असे चिन्ह आहे. हे देखील वाचा -चांदिवली विधानसभा मतदारसंघ | नसीम खान यांच्यासमोर यंदा तगडे आव्हान इथल्या समस्या वाहतूक कोंडी हा सर्वात मोठा विषय इथे आहे. कळव्यात जुन्या खाडी पुलाच्या बाजूने नवीन पुलाचे काम सुरू आहे. तो सुरू झाला की मोठ्या प्रमाणात ही समस्या कमी होईल. मात्र मुंब्रा भागात अशा एखाद्या प्रकल्पाच्या प्रतीक्षेत लोकं आहेत. वीज इथे नेहमीच नसते. वीज चोरी आणि बिल न भरणे यामुळे एमएसइबीने जणू या विभागाला वाळीत टाकले आहे. तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या लोड शेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. काही भागात पावसात पाणी देखील साचते. या सर्वांसोबत राजकीय वरदहस्त आणि भ्रष्टाचार यामुळे अनधिकृत वस्ती मोठ्या प्रमाणात इथे निर्माण झाली आहे. जी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यावर काहीही तोडगा काढताना कोणीही दिसत नाही. त्यामुळे नागरी सुविधांवर मोठा ताण येतोय. 2019 ची शक्यता गेल्या 10 वर्षात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा येथील चेहरा मोहरा बद्दलण्यासाठी काम केले आहे, जे नाकारता येणार नाही. अनेक डोळ्यांना दिसतील असे बदल या भागात घडले आहेत. तर लोकांना हवा तेव्हा उपलब्ध असलेला आमदार म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. मात्र युती असल्याने आव्हाड यांनी सीट पाडण्याचा पूर्ण प्रयत्न सेना भाजप करेल. त्यात भाजप विरोधात खुलेआम पणे टीका करणारे आमदार म्हणून देखील आव्हाड प्रसिद्ध आहेत. त्यांचे नाव कोणत्याही घोटाळ्यात न आल्याने त्यांच्या विरोधात प्रचार करायला देखील खूप कमी वाव आहे. तरी वंचित आघाडीकडून जर मोठ्या प्रमाणात मते विभागली गेली तर आव्हाडांची सीट धोक्यात येऊ शकते. एकूण मतदार 3,48,482 पुरुष 185749 स्त्रिया 152593 एकूण मतदान केंद्रे 310 2014 चा निकाल ( पहिले तीन ) जितेंद्र आव्हाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) 86,533 दशरथ पाटील ( शिवसेना ) 38,850 अश्रफ मुलानी ( एमआयएम ) 16,374 विजयी - जितेंद्र आव्हाड - 47,683 मतांनी विजयी जाणून घ्या या मतदारसंघाविषयी  

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Assam Election : आसाममध्ये भाजपची हॅटट्रिक की काँग्रेसचा उलटफेर? काहीच वेळात होणार फैसला
आसाममध्ये भाजपची हॅटट्रिक की काँग्रेसचा उलटफेर? काहीच वेळात होणार फैसला
Tamil Nadu : सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?
सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??

व्हिडीओ

Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?
Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?
New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget