एक्स्प्लोर

नरकासुराचा वध झाला, खडसेंच्या मुलीचा पराभव करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, खडसे म्हणतात...

खडसे यांनी 30 वर्षांत यांनी या मतदारसंघाचा कोणताच विकास केला नाही. त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं तर घराणेशाहीला ऊत आणला. त्यांच्या कन्येला समोर केलं याची लोकांमध्ये चिड निर्माण झाली होती आणि आज त्यांना हेच लोकांनी दाखवून दिल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

जळगाव : शिवसेनेतून बंडखोरी केलेले आणि राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान मुक्ताईनगरमध्ये ऐतिहासिक बदल झाला आहे. दिवाळीच्या निमित्ताने नरकासुराचा वध झाला आहे, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. खडसे यांनी 30 वर्षांत यांनी या मतदारसंघाचा कोणताच विकास केला नाही. त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं तर घराणेशाहीला ऊत आणला. त्यांच्या कन्येला समोर केलं याची लोकांमध्ये चिड निर्माण झाली होती आणि आज त्यांना हेच लोकांनी दाखवून दिल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. विजयी होताच चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमधून ढोल ताशाच्या तालावर मिरवणूक काढली. हजारो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून हा विजय मिळवून आणला असून तुमच्याकडून काम होऊ शकत नाही. तुम्ही यशस्वी नाही हे लोकांनी आज दाखवून दिलंय, विकास शून्य आणि घराणेशाही खडसे यांना भोवली. सिंचन, बेरोजगारी, चांगले शिक्षण यासाठी मी काम करणार आहे, असे पाटील म्हणाले. उत्तर महाराष्ट्रात भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही याची खंत : खडसे यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, हा पराभव आणि मतदारांनी दिलेला कौल आम्ही आम्ही मान्य करतो. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते झटले. इथे भाजप विरुद्ध सारे असे चित्र होते. हा मतदारसंघ हा भाजप कमी आणि नाथाभाऊंवर प्रेम करणारा अधिक होता. हे मी वरिष्ठांना सांगितलं होतं. हा मतदारसंघ प्रतिकूल परिस्थितीत मी सांभाळला.  या पराभवाची कारण शोधावी लागतील. नावाला तो बंडखोर होता मात्र पक्षातून शिवसेनेतून त्यांना बाहेर काढण्यात आलं नव्हतं. राष्ट्रवादीचा देखील आजपर्यंत शिवसेनेला छुपा पाठिंबा होता. यावेळी राष्ट्रवादीने उघड पाठिंबा दिला, असे ते म्हणाले. खडसे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही याची खंत आहे. उत्तर महाराष्ट्रात 40 जागा येतील असा अंदाज गिरीश महाजन यांनी व्यक्त केला होता., मात्र तस झालं नाही. त्यांना महापालिका आणि अन्य निवडणुकांचा अनुभव होता. मात्र तस झालं नाही,  मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष उभा करण्यात माझा महत्वाचा वाटा आहे त्यामुळं पक्ष सोडून जाण्याचा विचार नाही, असेही खडसे म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

व्हिडीओ

BJP on Nawab Malik : भाजपला राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांची 'अॅलर्जी' Special Report
Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Embed widget