एक्स्प्लोर

भाजपचे सोलापूर दक्षिणचे उमेदवार सुभाष देशमुखांची संपत्ती किती? 5 वर्षात कर्ज आणि गुन्ह्यात वाढ

भाजपकडून सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून (Solapur South Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती? याबाबतची माहिती.

Subhash Deshmukh : भाजपचे नेते आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून (Solapur South Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्जसोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्यावर मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास आठ गुन्ह्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तर त्यांच्या कर्जामध्ये  देखील वाढ झाली आहे. तसेच त्यांच्या जंगम मालमत्तेमध्ये घट झालीय. स्थावर मालमत्तेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

सुभाष देशमुखांकडे जंगम मालमत्ता 18 कोटी 20 लाख 51 हजार 485 रुपये

 सुभाष देशमुख यांनी दाखल केलेल्या शपथपत्र नुसार 2019 मध्ये त्यांच्यावर 4 गुन्ह्यांची नोंद होती. 2024 मध्ये मात्र गुन्ह्यांची संख्या 12 झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे हे कोरोना काळात केलेल्या नियमांच्या उल्लंघनामुळे दाखल करण्यात आले आहेत. सुभाष देशमुखांच्या नावावर एकही चारचाकी वाहन नाही. मात्र कुटुंबियांचे नावाने तीन ट्रॅकटर आहेत. सुभाष देशमुख यांचे शिक्षण 1971 साली 11 वी पर्यंत झाले आहे. सुभाष देशमुख यांच्या जंगम मालमत्तेमध्ये 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 1 कोटी 88 लाखांची घट झाली आहे. 2019 मध्ये सुभाष देशमुख यांच्या कुटुंबाकडे एकूण 20 कोटी 8 लाख 53 हजार 589 रुपयांची मालमत्ता होती. 2024 मध्ये मात्र जंगम मालमत्ता ही 18 कोटी 20 लाख 51 हजार 485 रुपयावर पोहोचली आहे. 

स्थावर मालमत्ते मोठ्या प्रमाणात वाढ 

सुभाष देशमुख यांच्या स्थावर मालमत्ते मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2019 च्या तुलनेत सुभाष देशमुखांच्या स्थावर संपत्तीमध्ये सुमारे 16 कोटी 17 लाख 7 हजार रुपयांची संपत्ती वाढल्याचे दिसून येतं आहे. 2019 मध्ये सुभाष देशमुखच्या संपूर्ण कुटुंबाकडे सुमारे 28 कोटी 38 लाख 14 हजारांची स्थावर मालमत्ता होती. 2024 मध्ये ही संपत्ती 44 कोटी 55 लाख 21 हजार रुपयावर पोहोचली आहे. स्थावर मालमत्तेमध्ये सुमारे 5 कोटी 3 लाखांची संपत्ती ही वडीलपोर्जित आहे. 

सुभाष देशमुख यांच्यावरील कर्जामध्ये वाढ 

सुभाष देशमुख यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असली तरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज देखील आहे. 2019 च्या तुलनेत या कर्जामध्ये वाढ झाल्याचे देखील देशमुख यांनी सादर केलेल्या शपथ पत्रमधून दिसून येतंय. सुभाष देशमुख आणि त्यांच्या कटुंबियांवर 2019 मध्ये 17 कोटी 52 लाख 55 हजार 622 रुपयांचे कर्ज होते. या कर्जमध्ये सुमारे 4 कोटी 15 लाख 73 हजार 400 रुपयांची वाढ झाली असून सध्या देशमुख यांच्या कुटुंबियांवर तब्बल 21 कोटी 68 लाख 29 हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती अर्जात दिली आहे. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
Prashant jagtap : शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget