एक्स्प्लोर

कर्जत विधानसभा मतदारसंघ | बंडाळीत लागणार राष्ट्रवादी आणि सेनेचा कस?

एकंदरीत कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकारण आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली असता मागील काही निवडणुकीत कोणी कोणाला पाडले आणि कोणी कोणाला मदत केली? यानुसार कर्जतमध्ये सर्वजण हे एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी आपली उमेदवारी दामटवत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई-पुण्याच्या लोकांचा विकएन्ड डेस्टिनेशन पॉईंट म्हणजे कर्जत. सृष्टीसौंदर्याची उधळण केलेला पश्चिम किनारपट्टीवरचा प्रदूषणमुक्त भूप्रदेश, आंब्याच्या वनातील टुमदार गावं, किल्ले, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली देवस्थाने, थंड हवेची ठिकाणं असं सारे कर्जत तालुक्याच्या परिसरात एकत्रितपणे आढळतं. शिवाय महात्मा गांधी यांच्या सन 1942 च्या ‘छोडो भारत’ चळवळीत सक्रीय सहभागी विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ वीर भाई कोतवाल हे कर्जत तालुक्याचे सुपुत्र होते. असा हा कर्जत आणि खालापूर तालुका मिळून तयार झालेला विधानसभा मतदारसंघ. कर्जत विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे.

कर्जत 2 लाख 89 हजार मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघ आहे. ज्यामध्ये 100 हून अधिक लहान मोठ्या गावांचा समावेश आहे. कर्जत प्रत्यक्ष रायगड जिल्ह्यात असलं तरी लोकसभा मतदारसंघात मावळमध्ये हा भाग येतो. त्यामुळे इथे लोकसभेत लढत बघायला मिळाली ती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांच्यात. कर्जतमधून लोकसभेला राष्ट्रवादीला 2000 चा लीड मिळाला होता.

एकेकाळी या विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी तीनवेळा आमदारकी मिळविली आहे. त्यामुळे आमचाच बालेकिल्ला म्हणणार्‍या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना लोकसभा निवडणुकीत करून दाखवता आले नसल्याने कर्जत विधानसभा निवडणुकीत चुरस आहे.

2014 ची विधानसभा निवडणूक प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढला होता. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपापली ताकद तपासून पाहाता आली होती. अगदी आकडेवारी द्यायची झाली तर बसपाच्या रुपेश डोळस यांना दोन हजार 900, भाजपच्या राजेंद्र येरुणकर यांना बारा हजार 990 तर काँग्रेसच्या शिवाजी खारीक यांना पाच हजार 939, मनसेच्या जे.डी पाटील यांना चार हजार 746 तर राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना 57 हजार 013 आणि शेकापच्या महेंद्र थोरवे यांना 55 हजार 113 आणि शिवसेनेच्या हनुमंत पिंगळे यांना 40 हजार मतं मिळाली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे अवघ्या 1900 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

एकंदरीत इथलं राजकारण आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली असता मागील काही निवडणुकीत कोणी कोणाला पडले आणि कोणी कोणाला मदत केली? यानुसार कर्जतमध्ये सर्वजण हे एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी आपली उमेदवारी दामटवत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विधानसभा निवडणुकीतील आमनेसामने उभे राहणाऱ्या दावेदार पक्षांनी आतापासून दंड थोटण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेले सुरेश लाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. परंतु सध्याचं मेगाभरतीचं चित्र आणि पक्षाला लागलेली गळती पाहता त्यांची संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे लाडांना लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कामगार पक्षाने प्रखर विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा विरोध हा आमदारकीच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अन्य पक्षात गेले आहेत. त्यामुळे सुरेश लाड यांची मते आपोआप कमी होणार आहेत.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवार यांच्यासमोर पक्षांतील नाराजी दूर करण्याचे मोठं आव्हान असणार आहे. कारण शिवसेनेमधील आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राजकीय लढतीमध्ये मतदारसंघातील अनेक विकासाचे मुद्दे प्रलंबित आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ज्या कोंढाणे धरणातल्या भ्रष्टाचारामुळे गेली तो अद्यापही लोकांच्या विरोधामुळे अर्धवट अवस्थेत आहे.

भातशेती आणि किल्ल्यांची दुरावस्था, माथेरानसारख्या भागाचा विकासही म्हणावा तसा झालेला नाही. शिवाय मुंबई, पुणे, पनवेलला जोडणारी रेल्वे अद्याप अखंडीत सेवा देऊ शकलेली नाही, तर रस्त्यांच्या अवस्थेबद्दल न बोललंच बरं. एसटी महामंडाळाशीही झगडतंच प्रवास करावा लागतो. ऐतिहासिक किल्ल्यांची अवस्था अतिशय बिकट आहे त्यावर आजपर्यंत एकाही प्रतिनिधीने मुद्दा उपस्थित करुन तो तडीस नेण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप रहिवासी आणि दुर्गप्रेमींनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातच दिसणाऱ्या प्रतिनिधींनी याही समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी मतदार राजा करणार आहे. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघ नक्की कुणाचा बालेकिल्ला? हे या विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
Embed widget