एक्स्प्लोर

कर्जत विधानसभा मतदारसंघ | बंडाळीत लागणार राष्ट्रवादी आणि सेनेचा कस?

एकंदरीत कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकारण आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली असता मागील काही निवडणुकीत कोणी कोणाला पाडले आणि कोणी कोणाला मदत केली? यानुसार कर्जतमध्ये सर्वजण हे एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी आपली उमेदवारी दामटवत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई-पुण्याच्या लोकांचा विकएन्ड डेस्टिनेशन पॉईंट म्हणजे कर्जत. सृष्टीसौंदर्याची उधळण केलेला पश्चिम किनारपट्टीवरचा प्रदूषणमुक्त भूप्रदेश, आंब्याच्या वनातील टुमदार गावं, किल्ले, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली देवस्थाने, थंड हवेची ठिकाणं असं सारे कर्जत तालुक्याच्या परिसरात एकत्रितपणे आढळतं. शिवाय महात्मा गांधी यांच्या सन 1942 च्या ‘छोडो भारत’ चळवळीत सक्रीय सहभागी विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ वीर भाई कोतवाल हे कर्जत तालुक्याचे सुपुत्र होते. असा हा कर्जत आणि खालापूर तालुका मिळून तयार झालेला विधानसभा मतदारसंघ. कर्जत विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे.

कर्जत 2 लाख 89 हजार मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघ आहे. ज्यामध्ये 100 हून अधिक लहान मोठ्या गावांचा समावेश आहे. कर्जत प्रत्यक्ष रायगड जिल्ह्यात असलं तरी लोकसभा मतदारसंघात मावळमध्ये हा भाग येतो. त्यामुळे इथे लोकसभेत लढत बघायला मिळाली ती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांच्यात. कर्जतमधून लोकसभेला राष्ट्रवादीला 2000 चा लीड मिळाला होता.

एकेकाळी या विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी तीनवेळा आमदारकी मिळविली आहे. त्यामुळे आमचाच बालेकिल्ला म्हणणार्‍या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना लोकसभा निवडणुकीत करून दाखवता आले नसल्याने कर्जत विधानसभा निवडणुकीत चुरस आहे.

2014 ची विधानसभा निवडणूक प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढला होता. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपापली ताकद तपासून पाहाता आली होती. अगदी आकडेवारी द्यायची झाली तर बसपाच्या रुपेश डोळस यांना दोन हजार 900, भाजपच्या राजेंद्र येरुणकर यांना बारा हजार 990 तर काँग्रेसच्या शिवाजी खारीक यांना पाच हजार 939, मनसेच्या जे.डी पाटील यांना चार हजार 746 तर राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना 57 हजार 013 आणि शेकापच्या महेंद्र थोरवे यांना 55 हजार 113 आणि शिवसेनेच्या हनुमंत पिंगळे यांना 40 हजार मतं मिळाली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे अवघ्या 1900 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

एकंदरीत इथलं राजकारण आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली असता मागील काही निवडणुकीत कोणी कोणाला पडले आणि कोणी कोणाला मदत केली? यानुसार कर्जतमध्ये सर्वजण हे एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी आपली उमेदवारी दामटवत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विधानसभा निवडणुकीतील आमनेसामने उभे राहणाऱ्या दावेदार पक्षांनी आतापासून दंड थोटण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेले सुरेश लाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. परंतु सध्याचं मेगाभरतीचं चित्र आणि पक्षाला लागलेली गळती पाहता त्यांची संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे लाडांना लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कामगार पक्षाने प्रखर विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा विरोध हा आमदारकीच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अन्य पक्षात गेले आहेत. त्यामुळे सुरेश लाड यांची मते आपोआप कमी होणार आहेत.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवार यांच्यासमोर पक्षांतील नाराजी दूर करण्याचे मोठं आव्हान असणार आहे. कारण शिवसेनेमधील आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राजकीय लढतीमध्ये मतदारसंघातील अनेक विकासाचे मुद्दे प्रलंबित आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ज्या कोंढाणे धरणातल्या भ्रष्टाचारामुळे गेली तो अद्यापही लोकांच्या विरोधामुळे अर्धवट अवस्थेत आहे.

भातशेती आणि किल्ल्यांची दुरावस्था, माथेरानसारख्या भागाचा विकासही म्हणावा तसा झालेला नाही. शिवाय मुंबई, पुणे, पनवेलला जोडणारी रेल्वे अद्याप अखंडीत सेवा देऊ शकलेली नाही, तर रस्त्यांच्या अवस्थेबद्दल न बोललंच बरं. एसटी महामंडाळाशीही झगडतंच प्रवास करावा लागतो. ऐतिहासिक किल्ल्यांची अवस्था अतिशय बिकट आहे त्यावर आजपर्यंत एकाही प्रतिनिधीने मुद्दा उपस्थित करुन तो तडीस नेण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप रहिवासी आणि दुर्गप्रेमींनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातच दिसणाऱ्या प्रतिनिधींनी याही समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी मतदार राजा करणार आहे. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघ नक्की कुणाचा बालेकिल्ला? हे या विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget