एक्स्प्लोर

अकोले विधानसभा मतदारसंघ | राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले पिचड पिता-पुत्र बालेकिल्ला राखणार?

मधूकर पिचड आणि वैभव पिचड राष्ट्रवादीत असेपर्यंत शिवसेनेकडून सतीश भांगरे, मधुकर तळपाडे आणि भाजपकडून अशोक भांगरे, किरण लहामटे अकोले मतदारसंघातून इच्छूक उमेदवार होते. मात्र आता पिचडांना भाजप प्रवेश केल्याने विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. याशिवाय भंडारदरा, हरिश्चंद्रगड यांसारखे अनेक पर्यटन स्थळं याठिकाणी आहेत. त्यामुळे हा भाग महाराष्ट्राला चांगलाच परिचित आहे. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर मधुकर पिचड याचं नाव अकोले तालुक्यात अग्रस्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड 1980 ते 2014 पर्यंत सलग सात वेळा अकोले मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यानंतर 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना मतदारांनी आमदारकीची संधी दिली. अशारीतीने गेली जवळपास 40 वर्ष याठिकाणी पिचड कुटुंबिय आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र मधुकर पिचड आणि विद्यमान आमदार वैभव पिचड यांनी आता भाजप प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचा हा गड हातून निसटण्याची दाट शक्यता आहे.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

अकोले तालुक्याची आदिवासी तालुका अशी ओळख आहे. त्यामुळे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहे. मात्र मधुकर पिचड यांच्याशिवाय या मतदारसंघातून कोणतंही मोठं नेतृत्व तयार झालं नाही. 35 वर्ष या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दित आघाडीची सत्ता असताना अनेक मंत्रिपदं भूषवली. त्यानंतर 2014 विधानसभा निवडणुकीत मधुकर पिचड यांनी आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुत्र वैभव पिचड यांना निवडलं.

वैभव पिचड यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मधुकर तळपाडे यांना धुळ चारत विधासभेत एन्ट्री केली.  2014 विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांनी तळपाडे यांचा 20,062 मतांनी पराभव केला. शिवसेना-भाजप 2014 ची निवडणूक स्वतंत्रपणे लढल्याने मतांची विभागणी झाली होती, याचा फायदा वैभव पिचड यांना झाला. अकोले विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 38 हजार 420 मतदार आहेत.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल
  • वैभव पिचड (राष्ट्रवादी) - 67, 696 (विजयी)
  • मधूकर तळपाडे, (शिवसेना) - 47,634
  • अशोक भांगरे, भाजपा - 27,446
  • गंगा भांगरे (माकप) - 11,861
  • सतीश भांगरे (काँग्रेस) - 4391
 

पिचड पिता-पुत्र भाजप प्रवेशाने विरोधकांची कोंडी

पिचड पिता-पुत्रांनी भाजप प्रवेश केल्याने आज तरी विरोधकांना कोंडीत पकडण्यात ते यशस्वी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. दुसरीकडे पिचड यांचे परंपरागत विरोधक समजले जाणारे अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे हे भाजपात असून त्यांची आगामी राजकीय भूमिका काय राहणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे. किरण लहामटे यांनी पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार यांची भेट घेतली असून ते पिचड विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

मधूकर पिचड आणि वैभव पिचड राष्ट्रवादीत असेपर्यंत शिवसेनेकडून सतीश भांगरे, मधुकर तळपाडे आणि भाजपकडून अशोक भांगरे, किरण लहामटे अकोले मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छूक उमेदवार होते. मात्र आता पिचडांनी भाजप प्रवेश केल्याने विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला वैभव पिचड यांच्याविरोधात तगडा उमेदवार शोधणंही मोठं आव्हान असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत युतीकडून किंवा भाजपकडून (युती न झाल्यास) वैभव पिचड यांना उमेदवारी जळवपास निश्चित आहे. मधूकर पिचड यांचा या मतदारसंघावर दबदबा असल्याने काँग्रेसचंही नेतृत्व याठिकाणी निर्माण होऊ शकलं नाही. तसेच काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत असलेले चांगले संबंध वैभव पिचड यांना आगामी निवडणुकीत फायदेशीर ठरु शकतात.

किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी मोठं शेतकरी आंदोलन याठिकाणाहून उभं केलं होतं. मुख्यमंत्र्यांनाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. त्यानंतरही सातत्याने नवले यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने केली. त्यामुळे मोठा शेतकरी वर्ग अजित नवले यांच्या मागे उभा आहे. याचा फायदा माकपच्या उमेदवारांना मिळून काहीअंशी मतविभाजन होऊ शकतं. तसेच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही येथे महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो.

बालेकिल्ला राखण्यासाठी पिचडांसमोरील आव्हान

पिचड पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना आदिवासी मतांवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. कारण भाजप प्रवेशानंतर पिचड पिता-पुत्रांविरोधात अनेक मोर्चे अकोल्यात निघाले होते. या मोर्चांमध्ये आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. पिचड यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अशोक भांगरे यांनी केली. आघाडीची सत्ता येणार नाही म्हणून मतदारसंघातील विकामकामे व्हावी, यासाठी भाजपमध्ये जात असल्याचं पिचड पिता-पुत्रांनी सांगितलं होतं. मात्र आता मतदारसंघातून त्यांना मोठा विरोध होत आहे. महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांनीही त्यांना विरोध दर्शवला आहे. याचा फटका वैभव पिचड यांना निवडणुकीत बसू शकतो.

मतदारसंघातील समस्या

अकोले विधानसभा मतदार संघ पर्यटनाचं मोठं केंद्र आहे. एकीकडे राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना अकोले सारख्या पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष होत आहे. अकोले, भंडारदरा, घाटघर याठिकाणच्या मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आदिवासी तालुका म्हणून ओळख असली तरी आदिवासींच्या समस्या जैसे थे आहेत.

भाजप प्रवेशानंतर मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्यासमोर स्थानिक भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचं मोठं आव्हान आहे. भाजप प्रवेशानंतर आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या मतदार संघात शिवसेनेच्या भूमिकेला महत्व असून युती होणार की नाही, यावर अनेक गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे पिचड कुटुबियांचा हा बालेकिल्ला अजिंक्य राहणार का? हे आगामी विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
Satara Zilla Parishad: साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
Baramati And Rahuri Constituency By Election 2026: सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?; बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार, सर्व्हे आला समोर
सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?; बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार, सर्व्हे समोर
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget