एक्स्प्लोर

शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू, 'सामना'त युतीबाबत स्पष्टीकरण

देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.

मुंबई : शिवसेना हे अडगळीतले भांडे कधीच नसल्याने सत्य, देशहित व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमचे भांडे भांड्यास लागून वाजत राहिले व खणखणीत नाणे गाजत राहिले. दबाव आणि मुस्कटदाबी ही भुते आम्ही शिवसेनेच्या मानगुटीवर कधीच बसू दिली नाहीत. आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही, असे शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. शिवसेनेची स्वबळाची तलवार म्यान झाल्यानंतर लोकसभा-विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली आहे. युती होईपर्यंत भाजपवर 'सामना'च्या अग्रलेखातून खुलेआम टीका केली जात होती. त्यामुळे 'सामना'च्या अग्रलेखात युतीबाबत काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही, असे 'सामना'त म्हटले आहे. काय म्हटले आहे 'सामना'त महाराष्ट्रात ‘युती’च्या चर्चेला तसा पूर्णविराम मिळाला आहे. काही पोटावळ्यांना युती झाली तरी, ‘का झाली?’ असा मुरडा उठला होताच व होत नव्हती तेव्हा, “छे, छे, शिवसेना फारच ताणून धरते बुवा. हे काय सुरू आहे!’’ असले प्रश्न पडतच होते. असल्या पडेल प्रश्नांना उत्तरे देत बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी जी नवी जुळवाजुळव केली आहे ती घेऊन पुढे जावे यातच सगळ्यांचे हित आहे. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली आहे. अमित शहा हे स्वतः ‘मातोश्री’वर आले. आम्हाला जे सांगायचे, बोलायचे ते ‘ठाकरे’ पद्धतीने ठोकून सांगितले. ज्या चुका आधी झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत यावर किमान एकमत झाले. त्यातून ‘युती’ला आणखी एक संधी देण्याचा निर्णय झाला. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत तसे वैर नव्हते. मुळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे ‘एनडीए’ला ‘कल्हई’ करण्याचे प्रयत्न गेल्या महिनाभरापासून सुरू झाले. या एनडीएचे जनकत्व भाजपइतकेच शिवसेना, अकाली दलाकडे आहेच. नितीश कुमार यांच्यासारख्या सध्याच्या भरोसेमंद साथीनेही दोन वेळा ‘एनडीए’ त्याग केला आहे. अगदी राममंदिर, गोध्रा वगैरे प्रकारांवर शरसंधान करणाऱ्या नितीश कुमारांना तर मोदी हे प्रकरण अजिबात चालणारे नव्हते. पण शेवटी विचार, भूमिका जुळत नसल्या, माणसांशी टोकाचे भांडण असले तरी राजकारणात पुन्हा एकत्र येण्यासाठी जे परवलीचे शब्द आहेत ते म्हणजे ‘राष्ट्रीय व्यापक हित’, ‘जनहित’ व ‘जनतेची  इच्छा’. या इच्छेनुसार काँग्रेसची महाआघाडी बनू शकते, नितीश कुमार वगैरे पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत बसू शकतात, मग शिवसेना तर त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बरोबरीची हिस्सेदारच आहे. 2014 सालातली परिस्थिती वेगळी होती. लाटांचे उसळणे व कायमचे जिरणे देशात नवीन नाही. तसे नसते तर राजनारायणसारख्या विदूषकाने इंदिरा गांधींचा पराभव केला नसता. एका चिडीतून, संतापातून जनता भल्याभल्यांना पटकते व त्यांच्या विरोधात नव्यांना डोक्यावर घेते. 2014 या वर्षात काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होताच. मोदी यांचा उदय व त्यांचे सादरीकरण लोकांना भिडले व एक लाट काँग्रेस, त्यांच्या बगलबच्च्यांविरोधात निर्माण झाली. मात्र आता त्या लाटेची उंची व तुफान कमी झाले आहे आणि 2019 ची स्थिती ही लाटेवर निवडणुका लढण्याची नसून विचार, काम व भविष्य यावर लढण्याची आहे. राहुल गांधी यांचे प्रगतिपुस्तक 2014 च्या तुलनेत नक्कीच सुधारले आहे. मदतीला प्रियंका आलीच आहे, पण मोदी यांच्या नेतृत्वाशी त्यांची तुलना करता येणार नाही. तथापि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर नवे आव्हान उभे आहे. भारतीय जनता पक्ष स्वबळावर बहुमताचा आकडा पार करणे आज तरी शक्य नाही याची जाणीव त्यांना दोन वर्षांपूर्वीच झाली आणि एनडीएच्या अडगळीतील भांड्यांना कल्हई करणे हाच मार्ग बरा असे त्यांना वाटले. पण शिवसेना हे अडगळीतले भांडे कधीच नसल्याने सत्य, देशहित व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमचे भांडे भांड्यास लागून वाजत राहिले व खणखणीत नाणे गाजत राहिले. दबाव आणि मुस्कटदाबी ही भुते आम्ही शिवसेनेच्या मानगुटीवर कधीच बसू दिली नाहीत. आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही. 2014 मध्ये भाजपकडून रीतसर काडीमोड झाला असतानाही पुन्हा एकत्र कसे? नक्की कोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहात? राममंदिर उभे राहील काय? शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल काय? असे अनेक प्रश्न आहेत व त्याची उत्तरे सकारात्मक आहेत. लोकशाहीत व खास करून तुमच्या संसदीय लोकशाहीत ‘आकड्या’ला महत्त्व नको तितके आलेच आहे. त्यामुळे हा आकडा जसा इतर लावतात तसा आम्हालाही लावावा लागतो. युतीच्या नव्या मांडणीत नवी आकडेमोड झाली आहे. त्या आकडेमोडीपेक्षा राज्याची नवी ‘मांडणी’ झाली तर ती आम्हाला हवी आहे. 2014 नंतर तलवारी उपसल्या व पुढील चार वर्षे प्रत्येकजण तलवारीस धार काढीत राहिला. पण शिवसेनेची तलवार दुधारी आहे. आई भवानी मातेची आहे. न्याय, सत्यासाठी तळपणारी आहे. आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Election 2026 Phase 2:  विक्रमी मतदानानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; 'दीदी' आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणार की सुवेंदू अधिकारी मैदान मारणार, भवानीपुरात कौल कोणाला?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; 'दीदी' आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणार, की सुवेंदू अधिकारी मैदान मारणार?
Gujarat Local Body Election Results 2026: क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
West Bengal Election 2026: मतदानापूर्वी युपीचा एन्काऊंटर स्पेशालिस्ट पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जींच्या खास माणसाला वॉर्निंग, महुआ मोईत्रांनी एका वाक्यात 'हिरोगिरी'...
मतदानापूर्वी युपीचा एन्काऊंटर स्पेशालिस्ट पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जींच्या खास माणसाला वॉर्निंग, महुआ मोईत्रांनी एका वाक्यात 'हिरोगिरी'...
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 

व्हिडीओ

Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Watermelon Death Mumbai Pydhonie Family News: बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ
बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ
West Bengal Election 2026 Phase 2:  विक्रमी मतदानानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; 'दीदी' आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणार की सुवेंदू अधिकारी मैदान मारणार, भवानीपुरात कौल कोणाला?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; 'दीदी' आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणार, की सुवेंदू अधिकारी मैदान मारणार?
Shivsena Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून एक नाव निश्चित; दुसऱ्या जागेसाठी शेवटच्या तासांपर्यंत सस्पेन्स कायम
विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून एक नाव निश्चित; दुसऱ्या जागेसाठी शेवटच्या तासांपर्यंत सस्पेन्स कायम
Parth Pawar Travel In VSR Plane: अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
Maharashtra Live blog updates: ईडीची मोठी कारवाई, रहेजा डेव्हलपर्सची 1100 कोटींची मालमत्ता जप्त
Maharashtra Live blog updates: ईडीची मोठी कारवाई, रहेजा डेव्हलपर्सची 1100 कोटींची मालमत्ता जप्त
Pune Crime News : पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
Mumbai Watermelon Family death: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडेना, विषबाधा की घातपात, पोलिसांनी नळ बाजारातील कलिंगड विक्रेत्यांना चौकशीसाठी बोलावलं
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडेना, विषबाधा की घातपात, पोलिसांनी नळ बाजारातील कलिंगड विक्रेत्यांना चौकशीसाठी बोलावलं
Embed widget