एक्स्प्लोर

Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Exit Poll : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. 

नवी दिल्ली : आज पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे. पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालासंदर्भात एक्झिट  पोल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येऊ शकते, असं बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजात म्हटलं गेलंय. तर आसाम आणि केरळमध्ये काय होणार याबाबत एक्झिट पोलनं काय अंदाज वर्तवले आहेत, ते पाहणं महत्त्वाचं आहे. आसाममध्ये गेल्या दोन टर्मपासून भाजपची सत्ता आहे, तर केरळमध्ये डाव्या पक्षांचं सरकार आहे. या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलनं काय अंदाज  वर्तवलेत ते पाहूयात.

आसाममध्ये कोणाची सत्ता?

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी 4 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. आसाममध्ये गेल्या दोन टर्म पासून भाजप सत्तेत आहे. आसाममध्ये मतदारसंघ फेररचनेनंतर निवडणूक होत आहेत. तिथं एकूण 126 जागांसाठी मतदान झालं होतं. या साठी 722 उमेदवार रिंगणात होते. एक्सिस माय इंडियानुसार आसाममध्ये भाजप 88 ते 100 जागा जिंकेल. तर काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळतील. आसाममध्ये भाजपला 48 टक्के मतं मिळू शकतात तर काँग्रेसला 39 टक्के मतं मिळतील, इतरांना 14 टक्के मतं मिळतील  असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे. 

2021 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आसाममध्ये भाजपला 75 जागांवर विजय मिळाला होता. तर, काँग्रेस आघाडीला 50 जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा कमी होत असल्याचं दिसून येत आहे.

केरळमध्ये काँग्रेसची सत्ता, डाव्या पक्षांची सत्ता जाणार?

केरळमध्ये  एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सत्तांतर होऊ शकतं. देशात सध्या डाव्या पक्षांची सत्ता एकमेव केरळ राज्यात आहे.  एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार इथं काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूडीएफला 78 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपला 0-3 जागा मिळू शकतात. डाव्या पक्षांच्या एलडीएफला 140 जागांपैकी  49 ते 62 जागा मिळू शकतात. 

दरम्यान, केरळमध्ये गेल्या दोन टर्मपासून डाव्या पक्षांचं सरकार सत्तेत होतं. यावेळी त्यांना तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी होती. केरळमधील मतदारांचा नेमका कौल काय आहे, याचं उत्तर 4  मे रोजी मिळणार आहे. एक्सिस माय इंडियानुसार केरळमध्ये 50 ते 60 जागा डाव्या पक्षांना मिळू शकतात. 

केरळमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांनी 99 जागा मिळवल्या होत्या. तब्बल 1977 नंतर केरळमध्ये सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत दाखल झालं होतं. तर, 2021 मध्ये  यूडीएफला  41 जागा मिळाल्या होत्या.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget